ETV Bharat / city

पिंपळगाव कृषी बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तृतीयपंथीयांकडून लूट

जास्त दराने भाव मिळतो म्हणून शेतकरी बाजार समितीत कांदा आणतात, मात्र तृतीयपंथीय येतात आणी प्रत्येक शेतकऱ्यांकडून बळजबरीने गोणी लावून कांदा घेऊन जातात. विरोध करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते अथवा प्रसंगी मारहानदेखील केली जाते.

author img

By

Published : Jul 6, 2019, 11:54 AM IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तृतीयपंथीयांकडुन लुटमार

नाशिक - जिल्ह्यातील 'पिंपळगाव-बसवंत कृषी ऊत्पन्न बाजार समिती' कांदा व्यापाऱ्यांसाठी देशातील प्रसिद्ध बाजार समिती आहे. कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा या आशेने अनेक शेतकरी या ठिकाणी आपला माल घेऊन येतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी तृतीयपंथीयांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

कांदा लिलावात पिंपळगाव येथे जास्त भाव भेटत असतो. यामुळे धुळे, नंदुरबार, साक्री, कळवण, सटाणा, पिंपळनेर या भागातुन मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा विक्रीस आणतात. परंतु येथील स्थानिक तृतीयपंथीयांकडून शेतकऱ्यांच्या असाहाय्यतेचा गैर फायदा घेतला जातो. प्रत्येक शेतकऱ्याच्या वाहनातुन बळजबरीने आडवे टोपले लावून अथवा गोणी लावून कांदा घेतला जातो. विरोध करणाऱया शेतकऱ्याला शिव्या दिल्या जातात अथवा प्रसंगी मारहानदेखील केली जाते.

farmer-extortion-by-transgender-1
पिंपळगाव कृषी बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तृतीयपंथीयांकडुन लूट

शेतकऱ्यांच्या या लुटीचे आर्थिक वास्तव खुपच धक्कादायक आहे. पिंपळगाव मार्केटमध्ये दररोज साधारणपणे ३०० पिकअप व ३०० ट्रॅक्टर येत असतात. ३०० पिकअप व ३०० टॅक्टर यांमधून प्रत्येकी ५ किलो कांदा या प्रमाणे एकून ३००० किलो कांदा दररोज जमा केला जातो. १० रू किलो बाजारभावा प्रमाणे रोज 'तीस हजार' रूपयांचा कांदा तृतियपंथीयांकडून विकला जातो. महिन्याचे २५ दिवस मार्केट सुरू असते, म्हणजे दररोज तीस हजार रूपये या प्रमाणे महिना 'सात लाख पन्नास हजार' रूपयांचा कांदा तृतीयपंथी जमा करतात. ही सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट आहे.

या वास्तवानंतर अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. अशी लूटमार करणाऱ्या तृतियपंथीयांना मार्केट कमिटीत प्रवेश कसा काय दिला जातो? त्याच्या मागे ४-५ युवक कांदे जमा करतात, प्रत्येक रांगेत ६-७ गोण्या भरून बाजुलाच ऊभ्या असणऱ्या मालवाहतूक वाहनात भरतात. लाखो रूपयांच्या लुटीवर संचालक मंडळ, चेअरमन, व्यापारी व प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न गरीब शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

'शरदचंद्र पवार मार्केट'च्या संचालक मंडळ, चेअरमन, व्यापारी, प्रशासन आणि शेतकरी नेते यांनी याकडे लक्ष घालून कांदा उत्पादक शेताकाऱ्यांची ही रोजची होणारी लूट थांबवावी व मार्केटमधील त्या तृतियपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

अशाच एका तृतीयपंथीयाचा विडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

पिंपळगाव कृषी बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तृतीयपंथीयांकडून लूट

नाशिक - जिल्ह्यातील 'पिंपळगाव-बसवंत कृषी ऊत्पन्न बाजार समिती' कांदा व्यापाऱ्यांसाठी देशातील प्रसिद्ध बाजार समिती आहे. कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा या आशेने अनेक शेतकरी या ठिकाणी आपला माल घेऊन येतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी तृतीयपंथीयांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

कांदा लिलावात पिंपळगाव येथे जास्त भाव भेटत असतो. यामुळे धुळे, नंदुरबार, साक्री, कळवण, सटाणा, पिंपळनेर या भागातुन मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा विक्रीस आणतात. परंतु येथील स्थानिक तृतीयपंथीयांकडून शेतकऱ्यांच्या असाहाय्यतेचा गैर फायदा घेतला जातो. प्रत्येक शेतकऱ्याच्या वाहनातुन बळजबरीने आडवे टोपले लावून अथवा गोणी लावून कांदा घेतला जातो. विरोध करणाऱया शेतकऱ्याला शिव्या दिल्या जातात अथवा प्रसंगी मारहानदेखील केली जाते.

farmer-extortion-by-transgender-1
पिंपळगाव कृषी बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तृतीयपंथीयांकडुन लूट

शेतकऱ्यांच्या या लुटीचे आर्थिक वास्तव खुपच धक्कादायक आहे. पिंपळगाव मार्केटमध्ये दररोज साधारणपणे ३०० पिकअप व ३०० ट्रॅक्टर येत असतात. ३०० पिकअप व ३०० टॅक्टर यांमधून प्रत्येकी ५ किलो कांदा या प्रमाणे एकून ३००० किलो कांदा दररोज जमा केला जातो. १० रू किलो बाजारभावा प्रमाणे रोज 'तीस हजार' रूपयांचा कांदा तृतियपंथीयांकडून विकला जातो. महिन्याचे २५ दिवस मार्केट सुरू असते, म्हणजे दररोज तीस हजार रूपये या प्रमाणे महिना 'सात लाख पन्नास हजार' रूपयांचा कांदा तृतीयपंथी जमा करतात. ही सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट आहे.

या वास्तवानंतर अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. अशी लूटमार करणाऱ्या तृतियपंथीयांना मार्केट कमिटीत प्रवेश कसा काय दिला जातो? त्याच्या मागे ४-५ युवक कांदे जमा करतात, प्रत्येक रांगेत ६-७ गोण्या भरून बाजुलाच ऊभ्या असणऱ्या मालवाहतूक वाहनात भरतात. लाखो रूपयांच्या लुटीवर संचालक मंडळ, चेअरमन, व्यापारी व प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न गरीब शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

'शरदचंद्र पवार मार्केट'च्या संचालक मंडळ, चेअरमन, व्यापारी, प्रशासन आणि शेतकरी नेते यांनी याकडे लक्ष घालून कांदा उत्पादक शेताकाऱ्यांची ही रोजची होणारी लूट थांबवावी व मार्केटमधील त्या तृतियपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

अशाच एका तृतीयपंथीयाचा विडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

पिंपळगाव कृषी बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तृतीयपंथीयांकडून लूट
Intro:नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव - बसवंत क्रुषी ऊत्पन्न बाजार समिती हि देशात प्रसिद्ध बाजार समिती असुन अनेक वर्षांनपासुन येथे त्रितियपंथीकडुन कडुन शेतकऱ्यांनवर दहशत निर्माण करून कांद्याची लुट सुरू आहे .
Body:या लाखो रूपयांच्चा लुटीवर संचालक मंडळ ,चेयरमन ,व्यापारी ,प्रशासन मुग गिळुन गप्प का ? असा प्रश्न गरिब शेतकऱ्यांन कडुन विचारण्यात येतोये.कांदा लिलावात धुळे ,नंदुरबार ,साक्री ,कळवण ,,सटाणा ,पिंपळनेर या भागातुन मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग कांद्याला जास्त दराने पिंपळगाव येथे भाव भेटत असतो याकरता येथे कांदा विक्रीस आणतात याचाच गैर फायदा घेऊन स्थानिक त्रितियपंथीकडुन प्रत्येक शेतकरी वाहनातुन बळजबरीने ,दादागिरीने आडवे टोपले लावुन ,गोणी लावुन कांदा घेतला जातो शेतकरी असह्य होऊन फक्त पहातच राहतो .पण एका त्रितियपंथ्याला मार्केट कमेटीत प्रवेश कसा काय दिला जातो .तो व त्याच्चा मागे ४-५ युवक कांदे जमा करतात .प्रत्येक लाईनित ६-७ गोण्या भरतात व बाजुलाच ऊभ्या मालवाहतूक वाहनात ते भरतात याकडे मार्केट कमिटी संचालक मंडळ येथील अधिकारी का दुर्लक्ष करता आहे असा सवाल उपस्थित होतो आहे..सदर त्रितीय पंथीचा एक विडिओ आता सोसिल मीडिया वर viral होत आहे...Conclusion:मार्केट मध्ये ३०० पिक अप व ३५०ट्रँक्टर रोज येत असतात. शेतकऱ्यांचे लुटलेल्या कांद्याचे आर्थिक गणित बघा .रोज ३०० पिकअप वाहनातुन ५ किलो कांदा या प्रमाणे १५०० kg ऊचलायचा .तसेच .३०० टँक्टर मध्युन ५ kg प्रमाणे तेथुन ही १५०० kg कांदा गुंडगिरी करून ऊचलायचा एकुन ३००० kg कांदा रोज जमा होतो आजचा बाजारभाव १० रू किलो प्रमाणे रोज ३०००० तिस हजार रूपयांचा कांदा हा त्रितियपंथी विकतो .महीण्यान २५ दिवस मार्केट सुरू असते म्हणजे ३०००० ×२५ = ७५०००० लाख पन्नास हजार रू हा हि त्रितियपंथी जमा करतो हि सरळ सरळ शेतकऱ्यांची लुट आहे .हा ऐवढा पैसा जमाकरून त्रितियपंथीकडुन गुंडगिरी ,दहशत निर्माण करत आहेत .शरदचंद्र पवार मार्केट चे संचालक मंडळ ,चेयरमन ,व्यापारी ,प्रशासन आणि शेतकरी नेते याकडे कधी लक्ष घालून कांदा शेताकार्याची ही रोजची होणारी लूट थाबवावी व मार्केट मधिल त्या त्रितियपंथीचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.