ETV Bharat / city

Krupal Tumane : 'खासदारांना विनायक राऊतांचा प्रचंड त्रास, लोकसभेत बाजू मांडू देत नसत'; कृपाल तुमानेंचा आरोप

author img

By

Published : Jul 22, 2022, 5:53 PM IST

विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे दोन नेते स्वतःचा एक कलमी कार्यक्रम राबवत होते. त्याला कंटाळून आम्ही आमचा गटनेता बदलला, अशी प्रतिक्रिया कृपाल तुमाने यांनी दिली ( mp krupal tumane allegation vinayak raut ) आहे.

Krupal Tumane vinayak raut
Krupal Tumane vinayak raut

नागपूर - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रत्येक खासदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला लोकसभेत आपलं मत किंवा बाजू मांडण्याची काही संधी मिळत नसे. विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे दोन नेते स्वतःचा एक कलमी कार्यक्रम राबवत होते. त्याला कंटाळून आम्ही आमचा गटनेता बदलला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. ते आज ( 22 जुलै ) दिल्लीवरुन नागपुरला आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद ( mp krupal tumane allegation vinayak raut ) साधला.

'गटनेता बदलला तरी आम्ही शिवसेनेत' - शिवसेनेचे 12 खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेना पक्षातील अंतर्गत बंडाळीला पुन्हा तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांपूर्वी दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर बंडखोर 12 खासदारांपैकी एक असलेले रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने आज नागपूरला परत आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभेचा गटनेता बदलला असला तरी आम्ही शिवसेनेतच आहे, असा दावाही तुमाने यांनी केला आहे.

कृपाल तुमाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'सुरक्षा वाढवली नसेल तर ते...' - एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून मिळाली होती. त्यावेळी त्यांना अतिरिक्त सुरक्षा देऊ नका, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना फोन करुन दिले होते, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. 'आपल्या राज्यात ज्यांना जीव मारण्याची धमकी मिळाली आहे, त्यांना सुरक्षा पुरवली जाते. मग अश्यावेळी राज्याच्या मंत्र्याला धमकी मिळत असेल आणि त्यांची सुरक्षा वाढवली नसेल तर हे चुकीचे घडले आहे,' असं तुम्हाने यांनी स्पष्ट केलं आहे.

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं' - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कधीही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध प्रकारचे कारण देऊन त्यांना मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं, असा आरोपही कृपाल तुमाने यांनी केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका

नागपूर - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रत्येक खासदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला लोकसभेत आपलं मत किंवा बाजू मांडण्याची काही संधी मिळत नसे. विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे दोन नेते स्वतःचा एक कलमी कार्यक्रम राबवत होते. त्याला कंटाळून आम्ही आमचा गटनेता बदलला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. ते आज ( 22 जुलै ) दिल्लीवरुन नागपुरला आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद ( mp krupal tumane allegation vinayak raut ) साधला.

'गटनेता बदलला तरी आम्ही शिवसेनेत' - शिवसेनेचे 12 खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेना पक्षातील अंतर्गत बंडाळीला पुन्हा तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांपूर्वी दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर बंडखोर 12 खासदारांपैकी एक असलेले रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने आज नागपूरला परत आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभेचा गटनेता बदलला असला तरी आम्ही शिवसेनेतच आहे, असा दावाही तुमाने यांनी केला आहे.

कृपाल तुमाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'सुरक्षा वाढवली नसेल तर ते...' - एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून मिळाली होती. त्यावेळी त्यांना अतिरिक्त सुरक्षा देऊ नका, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना फोन करुन दिले होते, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. 'आपल्या राज्यात ज्यांना जीव मारण्याची धमकी मिळाली आहे, त्यांना सुरक्षा पुरवली जाते. मग अश्यावेळी राज्याच्या मंत्र्याला धमकी मिळत असेल आणि त्यांची सुरक्षा वाढवली नसेल तर हे चुकीचे घडले आहे,' असं तुम्हाने यांनी स्पष्ट केलं आहे.

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं' - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कधीही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध प्रकारचे कारण देऊन त्यांना मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं, असा आरोपही कृपाल तुमाने यांनी केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.