ETV Bharat / city

नागपूरकरांनी घेतला वळवाच्या सरींचा आनंद; उकड्यापासून दिलासा

नागपूर परिसरात तब्बल पाऊण तास वरुणराजा बरसला. त्यामुळे ४६ अंश तापमानाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

author img

By

Published : Jun 1, 2019, 8:52 PM IST

बरसणारा पाऊस

नागपूर - उकाड्य़ाने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र आज नागपूरकरांना सुखद धक्का बसला आहे. नागपूर परिसरात तब्बल पाऊण तास वरुणराजा बरसला. त्यामुळे ४६ अंश तापमानाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने अखेर एन्ट्री घेतली आहे.

बरसणारा पाऊस


चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने आज सायंकाळी सुखद धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अजून दमदार पावसाची गरज आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या शहरवासीयांना अचानकपणे आलेल्या पावसाने सुखद दिलासा मिळाला. जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला.

नागपूर - उकाड्य़ाने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र आज नागपूरकरांना सुखद धक्का बसला आहे. नागपूर परिसरात तब्बल पाऊण तास वरुणराजा बरसला. त्यामुळे ४६ अंश तापमानाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने अखेर एन्ट्री घेतली आहे.

बरसणारा पाऊस


चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने आज सायंकाळी सुखद धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अजून दमदार पावसाची गरज आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या शहरवासीयांना अचानकपणे आलेल्या पावसाने सुखद दिलासा मिळाला. जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला.

Intro:नागपूर

नागपुकरांनि घेतला पाहिल्या पाऊसाच आनंद... उकड्या पासून सुखद दिलासा


४६ अंश तापमानाच्या उकड्या पासून दिलासा देत नागपुरात पूर्व हंगामी पाऊस बरसला वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह प्री मान्सून नि अखेर एन्ट्री घेतली.
चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने आज सायंकाळी सुखद धक्का दिला.
शहरासह परिसरतील तब्बल पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैरण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अजून दमदार पावसाची गरज आहे.

Body:गेल्या अनेक दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या शहरवासीयांना सा अचानकपणे आलेल्या पाऊसाने सुखद दिलासा मिळाला जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.