ETV Bharat / city

मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांनी निर्णय घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी

author img

By

Published : Jan 22, 2021, 3:08 PM IST

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. यावर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर

नागपूर - २७ जानेवारी पासून राज्यातील वर्ग पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासंदर्भात पालकांच्या मनातील भीती अद्याप दूर झालेली नाही. या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी

दुसऱ्या टप्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय-

गेल्या महिन्यात नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ग नववी ते बारावी सध्या सुरू आहेत. या दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाय योजना सक्तीने लागू केल्यामुळे एकाही विद्यार्थ्यांला शाळेत गेल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याची तक्रार आलेली नाही. आता राज्य शासनाने दुसऱ्या टप्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २७ जानेवारी पासून वर्ग पाचवी ते वर्ग आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण-

मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. यावर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे किंवा नाही या संदर्भात सर्वस्वी निर्णय हा पालकांना घ्यायचा आहे. पहिल्या टप्प्यातील शाळा सुरू करताना खबरदारीचा उपाय म्हणून ज्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्याच प्रकारच्या उपाययोजना आता देखील केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

पालकांचे संमती पत्र आवश्यक-

तब्बल अकरा महिन्यानंतर शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात वर्ग नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाल्यानंतर आता वर्ग पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू होत आहेत. मात्र पालकांच्या मानत संभ्रम आहे,त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवता संमती पत्र देने अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आहे.

हेही वाचा- उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं! कुणी करणार का?

नागपूर - २७ जानेवारी पासून राज्यातील वर्ग पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासंदर्भात पालकांच्या मनातील भीती अद्याप दूर झालेली नाही. या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी

दुसऱ्या टप्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय-

गेल्या महिन्यात नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ग नववी ते बारावी सध्या सुरू आहेत. या दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाय योजना सक्तीने लागू केल्यामुळे एकाही विद्यार्थ्यांला शाळेत गेल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याची तक्रार आलेली नाही. आता राज्य शासनाने दुसऱ्या टप्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २७ जानेवारी पासून वर्ग पाचवी ते वर्ग आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण-

मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. यावर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे किंवा नाही या संदर्भात सर्वस्वी निर्णय हा पालकांना घ्यायचा आहे. पहिल्या टप्प्यातील शाळा सुरू करताना खबरदारीचा उपाय म्हणून ज्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्याच प्रकारच्या उपाययोजना आता देखील केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

पालकांचे संमती पत्र आवश्यक-

तब्बल अकरा महिन्यानंतर शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात वर्ग नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाल्यानंतर आता वर्ग पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू होत आहेत. मात्र पालकांच्या मानत संभ्रम आहे,त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवता संमती पत्र देने अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आहे.

हेही वाचा- उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं! कुणी करणार का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.