मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सुरु आहेत. मोठमोठे नेते या पक्षांमधून राजीनामे देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या तीन आणि काँग्रेसच्या एका नेत्याने आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द केले.
![resignation of congress ncp mlas continues 4 mlas have resigned since morning](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3986978_sandip-naik.jpg)
![resignation of congress ncp mlas continues 4 mlas have resigned since morning](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3986978_img-20190730-wa0007.jpg)
![resignation of congress ncp mlas continues 4 mlas have resigned since morning](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3986978_img-20190730-wa0008.jpg)
आज सकाळीच राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला होता. तर, आता राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर यांनीही आपापले राजीनामे अध्यक्षांकडे दिले.
हे चारही आमदार उद्या सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच, ५७ नगरसेवकही उद्या भाजपात प्रवेश करतील.
ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, काँग्रेस-राष्ट्रवादीमधील 'आऊटगोईंग' आणि भाजपमधील 'इनकमिंग' पाहता, येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला कोणी विरोधक उरतोय की नाही? अशी चर्चा राज्यामध्ये होते आहे.