ETV Bharat / city

MNS MLA Raju Patil : 'तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण...' मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

author img

By

Published : Aug 8, 2022, 12:47 PM IST

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्याने महाराष्ट्राचा ( MNS MLA Raju Patil criticize CM Eknath Shinde ) विकास अधिक वेगाने होईल, महाराष्ट्रात चांगले प्रकल्प ( Eknath Shinde on cabinet expansion ) येतील आणि एकूणच महाराष्ट्राचे चित्र बदलेल, अशी वक्तव्य केली होती. यावरूनच ( MNS MLA Raju Patil Shinde cabinet expansion ) आमदार राजू पाटील यांनी 'बंड झाले, आता थंड झाले' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका ( MNS MLA Raju Patil news ) केली आहे.

MNS MLA Raju Patil Shinde cabinet expansion
मंत्रिमंडळ विस्तार मनसे आमदार राजू पाटील प्रतिक्रिया

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ( MNS MLA Raju Patil criticize CM Eknath Shinde ) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी ( Eknath Shinde on cabinet expansion ) हात मिळवणी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार स्थापन होऊन ( MNS MLA Raju Patil Shinde cabinet expansion ) आता जवळपास एक महिन्याहून अधिकचा काळ उलटला तरी या नव्या सरकारच मंत्रिमंडळ अद्याप स्थापन झालेले नाही. आता विरोधकांसोबतच या सरकारचा मित्र पक्ष असलेल्या मनसेने देखील ( MNS MLA Raju Patil news ) राज्यातील या परिस्थितीवरून या सरकारवर टीका केली आहे.

MNS MLA Raju Patil Shinde cabinet expansion
मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

हेही वाचा - Dahi handi 2022: निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यासाठी गोविंदा पथक सज्ज; सरावाची जोरदार तयारी

बंड झाले, आता थंड झाले? - महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांना आपल्या सोबत घेत उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केली. सगळीकडे एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्याच काळात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्याने महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल, महाराष्ट्रात चांगले प्रकल्प येतील आणि एकूणच महाराष्ट्राचे चित्र बदलेल, अशी वक्तव्य केली होती. यावरूनच आमदार राजू पाटील यांनी 'बंड झाले, आता थंड झाले' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

नेमके काय आहे ट्विट? - मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "बंड झाले,आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झाले, सर्वकाही ठप्प आहे. तुमचे सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?" असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे मनसेत बिनसले? - आमदार राजू पाटील यांच्या या टिकेमुळे शिंदे फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मनसेला देखील स्थान मिळेल, मनसेच्या एका नेत्याला मंत्रिपद मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. त्या अनुषंगाने फडणवीस व राज ठाकरे यांच्यात बैठकाही झाल्या. खुद्द फडणवीस दोन वेळा आणि भाजपचे इतर नेते अनेक वेळा चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवसस्थानी ठाण मांडून होते. मात्र, सध्या माध्यमांमधून जी काही संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर येते त्यात मनसेला स्थान नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मनसेत नाराजी असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे, सध्या महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यासोबतच आता मंत्रालयाचा कारभार देखील मंत्रीच नसल्याने सचिवांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे विरोधक एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. मात्र, विरोधकांसोबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील या सरकारवर टीका केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण, बहुमताच्या चाचणीत मनसेने या सरकारला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा - Protest of IIT Bombay students : अखेर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाची दखल; 4 विद्यार्थ्यांना फी ठरविणाऱ्या समितीवर घेतले

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ( MNS MLA Raju Patil criticize CM Eknath Shinde ) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी ( Eknath Shinde on cabinet expansion ) हात मिळवणी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार स्थापन होऊन ( MNS MLA Raju Patil Shinde cabinet expansion ) आता जवळपास एक महिन्याहून अधिकचा काळ उलटला तरी या नव्या सरकारच मंत्रिमंडळ अद्याप स्थापन झालेले नाही. आता विरोधकांसोबतच या सरकारचा मित्र पक्ष असलेल्या मनसेने देखील ( MNS MLA Raju Patil news ) राज्यातील या परिस्थितीवरून या सरकारवर टीका केली आहे.

MNS MLA Raju Patil Shinde cabinet expansion
मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

हेही वाचा - Dahi handi 2022: निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यासाठी गोविंदा पथक सज्ज; सरावाची जोरदार तयारी

बंड झाले, आता थंड झाले? - महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांना आपल्या सोबत घेत उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केली. सगळीकडे एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्याच काळात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्याने महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल, महाराष्ट्रात चांगले प्रकल्प येतील आणि एकूणच महाराष्ट्राचे चित्र बदलेल, अशी वक्तव्य केली होती. यावरूनच आमदार राजू पाटील यांनी 'बंड झाले, आता थंड झाले' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

नेमके काय आहे ट्विट? - मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "बंड झाले,आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झाले, सर्वकाही ठप्प आहे. तुमचे सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?" असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे मनसेत बिनसले? - आमदार राजू पाटील यांच्या या टिकेमुळे शिंदे फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मनसेला देखील स्थान मिळेल, मनसेच्या एका नेत्याला मंत्रिपद मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. त्या अनुषंगाने फडणवीस व राज ठाकरे यांच्यात बैठकाही झाल्या. खुद्द फडणवीस दोन वेळा आणि भाजपचे इतर नेते अनेक वेळा चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवसस्थानी ठाण मांडून होते. मात्र, सध्या माध्यमांमधून जी काही संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर येते त्यात मनसेला स्थान नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मनसेत नाराजी असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे, सध्या महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यासोबतच आता मंत्रालयाचा कारभार देखील मंत्रीच नसल्याने सचिवांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे विरोधक एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. मात्र, विरोधकांसोबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील या सरकारवर टीका केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण, बहुमताच्या चाचणीत मनसेने या सरकारला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा - Protest of IIT Bombay students : अखेर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाची दखल; 4 विद्यार्थ्यांना फी ठरविणाऱ्या समितीवर घेतले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.