ETV Bharat / city

Minister Suresh Khade Order कोरोना काळातील बेरोजगारांना आधी नोकऱ्या; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आदेश

Minister Suresh Khade कोरोनाच्या 2 वर्षात राज्यातील हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेले आहेत. अनेक उद्योग बंद झाले, अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. अशा काळात ज्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या तरुणांना सर्वात आधी नोकरी मिळावी. Jobs first for unemployed Corona era त्यानंतर अन्य कामगारांचा विचार संबंधित उद्योगांनी करावा, अशा सूचना आपण सर्व उद्योगांना देणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे Minister Suresh Khade यांनी दिली.

author img

By

Published : Sep 8, 2022, 7:48 PM IST

Minister Suresh Khade
Minister Suresh Khade

मुंबई कोरोनाच्या 2 वर्षात राज्यातील हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेले आहेत. अनेक उद्योग बंद झाले, अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. अशा काळात ज्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या तरुणांना सर्वात आधी नोकरी मिळावी. Jobs first for unemployed Corona era त्यानंतर अन्य कामगारांचा विचार संबंधित उद्योगांनी करावा, अशा सूचना आपण सर्व उद्योगांना देणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे Minister Suresh Khade यांनी दिली. कामगार मंत्री आपण पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात आधी कामगारांच्या सुरक्षेविषयी काही मार्गदर्शक सूचना आणि योजना आणणार आहोत असेही खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

कामगार कायद्यांचे स्वागत Welcome of labor laws केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले असून कामगारांसाठी आता केवळ 4 महत्त्वाचे कायदे असणार आहेत. या चार कायद्यांमध्ये कामगारांच्या संपूर्ण हिताचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे हे कायदे अत्यंत महत्त्वाचे आणि कामगारांच्या कल्याणासाठीच आहेत, असा दावा डॉक्टर सुरेश खाडे यांनी Minister Suresh Khade Order केला आहे. दरम्यान या कायद्यांची अंमलबजावनी कशा पद्धतीने करता येईल, याबाबत आम्ही लवकरच विचार करत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.

सर्व असंघटित कामगारांची नोंदणी करणार राज्यातील सर्व असंघटित कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी त्यांची कामगार कायद्यानुसार आता कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे. कामगारांना त्यांचे किमान वेतन मिळालेच पाहिजे. मात्र त्याशिवाय त्यांचा विमा आणि अन्य लाभ त्यांना मिळावे, यासाठी आता नोंदणी करून सर्व कामगारांना लाभ देता येणार आहे. त्यासाठी सर्व स्तरातील आणि सर्व प्रकारच्या असंगठीत कामगारांची नोंदणी आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ही खाडे यांनी सांगितले आहे.

बांधकाम मंडळाच्या धर्तीवर कामगारांसाठी कल्याणकारी मंडळे स्थापना राज्यात असलेल्या बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर कामगारांसाठी मंडळ निर्माण करण्यात येतील. या मंडळांच्या माध्यमातून केवळ कामगारांचा विचार करण्यात येईल, असे नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जाईल. त्यांच्या कुटुंबालाही कशा पद्धतीने लाभ होईल यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही खाडे यांनी सांगितले आहे.

मुंबई कोरोनाच्या 2 वर्षात राज्यातील हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेले आहेत. अनेक उद्योग बंद झाले, अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. अशा काळात ज्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या तरुणांना सर्वात आधी नोकरी मिळावी. Jobs first for unemployed Corona era त्यानंतर अन्य कामगारांचा विचार संबंधित उद्योगांनी करावा, अशा सूचना आपण सर्व उद्योगांना देणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे Minister Suresh Khade यांनी दिली. कामगार मंत्री आपण पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात आधी कामगारांच्या सुरक्षेविषयी काही मार्गदर्शक सूचना आणि योजना आणणार आहोत असेही खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

कामगार कायद्यांचे स्वागत Welcome of labor laws केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले असून कामगारांसाठी आता केवळ 4 महत्त्वाचे कायदे असणार आहेत. या चार कायद्यांमध्ये कामगारांच्या संपूर्ण हिताचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे हे कायदे अत्यंत महत्त्वाचे आणि कामगारांच्या कल्याणासाठीच आहेत, असा दावा डॉक्टर सुरेश खाडे यांनी Minister Suresh Khade Order केला आहे. दरम्यान या कायद्यांची अंमलबजावनी कशा पद्धतीने करता येईल, याबाबत आम्ही लवकरच विचार करत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.

सर्व असंघटित कामगारांची नोंदणी करणार राज्यातील सर्व असंघटित कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी त्यांची कामगार कायद्यानुसार आता कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे. कामगारांना त्यांचे किमान वेतन मिळालेच पाहिजे. मात्र त्याशिवाय त्यांचा विमा आणि अन्य लाभ त्यांना मिळावे, यासाठी आता नोंदणी करून सर्व कामगारांना लाभ देता येणार आहे. त्यासाठी सर्व स्तरातील आणि सर्व प्रकारच्या असंगठीत कामगारांची नोंदणी आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ही खाडे यांनी सांगितले आहे.

बांधकाम मंडळाच्या धर्तीवर कामगारांसाठी कल्याणकारी मंडळे स्थापना राज्यात असलेल्या बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर कामगारांसाठी मंडळ निर्माण करण्यात येतील. या मंडळांच्या माध्यमातून केवळ कामगारांचा विचार करण्यात येईल, असे नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जाईल. त्यांच्या कुटुंबालाही कशा पद्धतीने लाभ होईल यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही खाडे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.