ETV Bharat / city

..त्यामुळे राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार? मंत्री अस्लम शेख यांचे संकेत

author img

By

Published : May 26, 2021, 10:16 AM IST

Updated : May 26, 2021, 11:49 AM IST

महाराष्ट्रामध्ये 50 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन हटवने हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. परंतु येणाऱ्या दिवसात सर्व बाबी तपासून दुकानांसंदर्भामध्ये काही शिथिलता देता येईल का? याबाबत टास्क फोर्स मध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात शिथीलता देऊन १ जूननंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मंत्री अस्लम शेख यांचे संकेत
मंत्री अस्लम शेख यांचे संकेत

मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यात टप्प्याने वाढ करत तो १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात सध्या कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अनलॉक होणार की आणखी यात वाढ होणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. मात्र, मुंबई पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले आहेत.

मंत्री अस्लम शेख
जोपर्यंत मुंबई, महाराष्ट्रामध्ये 50 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन हटवने हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. परंतु येणाऱ्या दिवसात सर्व बाबी तपासून दुकानांसंदर्भामध्ये काही शिथिलता देता येईल का? याबाबत टास्क फोर्स मध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात शिथीलता देऊन १ जूननंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या नेत्यांनी मोदींना विनंती करावी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईपोटी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्या पद्धतीने इथल्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सांगून महाराष्ट्रासाठी सुद्धा पॅकेज देण्याची मागणी करावी, असा टोला त्यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. तसेच महाविकास आघाडी सरकार आपल्या परीने शक्य होईल ती मदत या तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करणार असल्याची माहिती मंत्री शेख यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट..

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नाही. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेचा लहान मुलांना आणि त्याचबरोबर युवकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईमध्ये आम्ही लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारत आहोत. कोरोनाच्या संभ्याव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्याशी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.

मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यात टप्प्याने वाढ करत तो १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात सध्या कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अनलॉक होणार की आणखी यात वाढ होणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. मात्र, मुंबई पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले आहेत.

मंत्री अस्लम शेख
जोपर्यंत मुंबई, महाराष्ट्रामध्ये 50 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन हटवने हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. परंतु येणाऱ्या दिवसात सर्व बाबी तपासून दुकानांसंदर्भामध्ये काही शिथिलता देता येईल का? याबाबत टास्क फोर्स मध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात शिथीलता देऊन १ जूननंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या नेत्यांनी मोदींना विनंती करावी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईपोटी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्या पद्धतीने इथल्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सांगून महाराष्ट्रासाठी सुद्धा पॅकेज देण्याची मागणी करावी, असा टोला त्यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. तसेच महाविकास आघाडी सरकार आपल्या परीने शक्य होईल ती मदत या तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करणार असल्याची माहिती मंत्री शेख यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट..

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नाही. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेचा लहान मुलांना आणि त्याचबरोबर युवकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईमध्ये आम्ही लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारत आहोत. कोरोनाच्या संभ्याव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्याशी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.

Last Updated : May 26, 2021, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.