हैदराबाद - अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण, अर्थ आणि गृहमंत्रालयाची जबाबदारी समर्थपणे शंकररावांनी सांभाळली. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा साधारण पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक जीवनपट मांडण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे.
![shankarrao chavan birth anniversery](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/thumnail_00136_1307newsroom_1594654399_781.jpg)
जायकवाडी, विष्णूपुरी सारख्या धरणांच्या माध्यमातून मराठवाड्यात पाणी खेळवणाऱ्या शंकररावांना भगीरथ म्हटले गेले. त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा आजचे राज्यकर्ते, विरोधक आणि सामान्य नागरिकांनाही तत्कालीन राजकारणाची ओळख करुन देणारा आहे.
- वाचा सविस्तर - निवडणूक आयोगालाही न्यायालयात खेचणारे पहिले गृहमंत्री, शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास