ETV Bharat / city

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच होणार समायोजन, शिक्षणमंत्र्यांचा दिलासा - additional teachers in Mumbai

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन मुंबईतच केले जाईल, असा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला. त्यासोबतच संच मान्यतेलाही स्थगिती देण्यात आली आहे.

शिक्षणमंत्री आशिष शेलार
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:41 AM IST

Updated : Sep 21, 2019, 9:31 AM IST

मुंबई - विविध शाळांमध्ये संच मान्यता आणि इतर कारणांमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन मुंबईत केले जाईल, असा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला. त्यासोबतच संच मान्यतेलाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे यापुढे अतिरिक्त ठरणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांना काही दिवसांसाठी तरी दिलासा मिळणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच होणार समायोजन

शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुंबई शहराबाहेर समायोजन होणाऱ्या अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह इतर संघटनांनी स्वागत केले आहे. मुंबईत 1 हजार 35 हून अधिक अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहेत. या शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी परिपत्रक काढले आहे. मुंबईच्या बाहेर ज्या शिक्षकांचे समायोजन केले जाणार होते, त्यांचे समायोजन आता मुंबईतील शाळांमध्येच केले जाईल असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षक परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत महिनाभरापूर्वी बैठक घेतली होती. त्यात मुंबईबाहेर समायोजन होणाऱ्या शिक्षकांची व्यथा ऐकून घेत त्याविषयी तोडगा काढण्याचे स्पष्ट आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील शिक्षक संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरल्यास शिक्षकांना मुंबई बाहेर ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी समायोजन करण्यात आले होते. या शिक्षक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाणे- येणे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या सोबत बैठक घेऊन याविषयी स्पष्ट निर्णय घेतला होता. त्यावर परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

मुंबई - विविध शाळांमध्ये संच मान्यता आणि इतर कारणांमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन मुंबईत केले जाईल, असा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला. त्यासोबतच संच मान्यतेलाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे यापुढे अतिरिक्त ठरणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांना काही दिवसांसाठी तरी दिलासा मिळणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच होणार समायोजन

शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुंबई शहराबाहेर समायोजन होणाऱ्या अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह इतर संघटनांनी स्वागत केले आहे. मुंबईत 1 हजार 35 हून अधिक अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहेत. या शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी परिपत्रक काढले आहे. मुंबईच्या बाहेर ज्या शिक्षकांचे समायोजन केले जाणार होते, त्यांचे समायोजन आता मुंबईतील शाळांमध्येच केले जाईल असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षक परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत महिनाभरापूर्वी बैठक घेतली होती. त्यात मुंबईबाहेर समायोजन होणाऱ्या शिक्षकांची व्यथा ऐकून घेत त्याविषयी तोडगा काढण्याचे स्पष्ट आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील शिक्षक संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरल्यास शिक्षकांना मुंबई बाहेर ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी समायोजन करण्यात आले होते. या शिक्षक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाणे- येणे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या सोबत बैठक घेऊन याविषयी स्पष्ट निर्णय घेतला होता. त्यावर परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

Intro:मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच होणार समायोजन, शिक्षणमंत्र्यांचा दिलासा

mh-mum-01-teacher-darade-byte-7201153

मुंबई, ता. २० :

मुंबईतील विविध शाळांमध्ये संच मान्यता आणि इतर कारणांमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबईच्या बाहेर होणार नसून मुंबई समायोजन केले जाईल असा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज घेतला. त्यासोबतच संचमान्यत्रला ही स्थगिती देण्यात आल्यामुळे यापुढे अतिरिक्त ठरणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांना किमान काही दिवस जीवदान मिळणार आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुंबई बाहेर फेकल्या जाणाऱ्या अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह इतर संघटनांनी स्वागत केले आहे.मुंबईत 1 हजार 35 हून अधिक अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहेत. या शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करण्यासाठी
शालेय शिक्षण विभागाने आज परिपत्रक काढले आहे. मुंबईच्या बाहेर जा शिक्षकांचे समायोजन केले जाणार होते त्यांचे समायोजन आता मुंबईबाहेर न करता मुंबईतीलच शाळांमध्ये केले जाईल असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शिक्षक परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीत मुंबईबाहेर समायोजन होणाऱ्या शिक्षकांची व्यथा ऐकून घेत त्याविषयी तोडगा काढण्याचे स्पष्ट आश्‍वासन दिले होते त्या पार्श्‍वभूमीवर आज निर्णय घेण्यात आल्याने यासाठीचा मोठा दिलासा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मिळाला आहे.
मुंबईतील शिक्षक संच मान्यता नुसार अतिरिक्त ठरल्यास शिक्षकांना मुंबई बाहेर ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी समायोजन करण्यात आले होते. या शिक्षक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाणे- येणे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या सोबत बैठक घेऊन याविषयी स्पष्ट निर्णय घेतला होता, त्यावर आज परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.











Body:मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच होणार समायोजन, शिक्षणमंत्र्यांचा दिलासाConclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.