ETV Bharat / city

महाराष्ट्र बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड, प्रशासनाने मागितले पोलीस संरक्षण

उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवार) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांकडे संरक्षण मागण्यात आले असून पोलीस संरक्षणात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बसेस डेपोमध्येच उभ्या असल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

author img

By

Published : Oct 11, 2021, 10:00 AM IST

8 buses of BEST vandalized in Mumbai
बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड

मुंबई - उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवार) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांकडे संरक्षण मागण्यात आले असून पोलीस संरक्षणात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बसेस डेपोमध्येच उभ्या असल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

8 buses of BEST vandalized in Mumbai
बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड

8 बसेसची तोडफोड -
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवर गाडी चालवून त्यांना चिरडून मारण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रात्रीपासून बंदला सुरुवात झाली. बंदमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बेस्ट कामगार सेनेने केले होते. या दरम्यान बेस्टच्या बसेस डेपो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच धारावी, शिवाजी नगर, मालवणी आदी ठिकणी बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. यामुळे बेस्टच्या 8 बसेसचे नुकसान झाले आहे.

8 buses of BEST vandalized in Mumbai
बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड
पोलीस सुरक्षेची मागणी - बंद दरम्यान बेस्ट डेपो बाहेर काढण्यात येणाऱ्या बसेसवर दगडफेक होऊन 8 बसचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत बेस्ट प्रशासनाने बस सेवा सुरू ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांकडून सुरक्षा मिळताच बेस्ट सेवा सुरू केली जाणार आहे अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. बेस्टच्या बसेसची तोडफोड झाल्याने बहुतेक बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळी बस सेवा तुरळक सुरू असल्याने मुंबईकर नागरिकांचे हाल झाले आहेत.

मुंबई - उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवार) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांकडे संरक्षण मागण्यात आले असून पोलीस संरक्षणात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बसेस डेपोमध्येच उभ्या असल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

8 buses of BEST vandalized in Mumbai
बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड

8 बसेसची तोडफोड -
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवर गाडी चालवून त्यांना चिरडून मारण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रात्रीपासून बंदला सुरुवात झाली. बंदमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बेस्ट कामगार सेनेने केले होते. या दरम्यान बेस्टच्या बसेस डेपो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच धारावी, शिवाजी नगर, मालवणी आदी ठिकणी बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. यामुळे बेस्टच्या 8 बसेसचे नुकसान झाले आहे.

8 buses of BEST vandalized in Mumbai
बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड
पोलीस सुरक्षेची मागणी - बंद दरम्यान बेस्ट डेपो बाहेर काढण्यात येणाऱ्या बसेसवर दगडफेक होऊन 8 बसचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत बेस्ट प्रशासनाने बस सेवा सुरू ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांकडून सुरक्षा मिळताच बेस्ट सेवा सुरू केली जाणार आहे अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. बेस्टच्या बसेसची तोडफोड झाल्याने बहुतेक बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळी बस सेवा तुरळक सुरू असल्याने मुंबईकर नागरिकांचे हाल झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.