ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशमध्ये रिक्षाचा मोठा अपघात; तिघे जागीच ठार

author img

By

Published : Mar 28, 2021, 2:55 PM IST

पोलीस उपनिरिक्षक टी. श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंजेरू गावातील काही कामगार रिक्षामधून वडलामन्नडू गावाकडे निघाले होते. एका रिक्षामध्ये हे सर्व मजूर जात होते. गावाजवळ पोहोचताच रिक्षा चालकाने एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात समोरुन येणाऱ्या एका वाहनाची रिक्षाला जोरदार धडक बसली...

Three killed in road mishap in Andhra's Krishna district
आंध्र प्रदेशमध्ये रिक्षाचा मोठा अपघात; तिघे जागीच ठार

अमरावती : आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर नऊ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या वडलामन्नडू गावामध्ये रिक्षाने अज्ञात वाहनाला टक्कर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती, की यात रिक्षाचा चक्काचूर झाला.

पोलीस उपनिरिक्षक टी. श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंजेरू गावातील काही कामगार रिक्षामधून वडलामन्नडू गावाकडे निघाले होते. एका रिक्षामध्ये हे सर्व मजूर जात होते. गावाजवळ पोहोचताच रिक्षा चालकाने एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात समोरुन येणाऱ्या एका वाहनाची रिक्षाला जोरदार धडक बसली.

या रिक्षामध्ये चालकासह एकूण १२ जण होते. यांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकी जखमी झाले. मृतदेहांना गुडिवाडा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, जखमींना मचिलिपटनम सरकारी रुग्णालयात पाठवण्यता आले आहे. यांपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : गुरुग्राममध्ये निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

अमरावती : आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर नऊ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या वडलामन्नडू गावामध्ये रिक्षाने अज्ञात वाहनाला टक्कर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती, की यात रिक्षाचा चक्काचूर झाला.

पोलीस उपनिरिक्षक टी. श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंजेरू गावातील काही कामगार रिक्षामधून वडलामन्नडू गावाकडे निघाले होते. एका रिक्षामध्ये हे सर्व मजूर जात होते. गावाजवळ पोहोचताच रिक्षा चालकाने एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात समोरुन येणाऱ्या एका वाहनाची रिक्षाला जोरदार धडक बसली.

या रिक्षामध्ये चालकासह एकूण १२ जण होते. यांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकी जखमी झाले. मृतदेहांना गुडिवाडा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, जखमींना मचिलिपटनम सरकारी रुग्णालयात पाठवण्यता आले आहे. यांपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : गुरुग्राममध्ये निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.