भोपाल। खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याकडे लैंगिक शोषणाची मागणी करणाऱ्या दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची गुपिते उघड केली आहेत. भोपाळ पोलिसांनी वजिश आणि रवीन या दोन्ही आरोपींना राजस्थानमधून अटक केली होती. दोन्ही आरोपींना भोपाळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे. (sadhvi pragya thakur said conspiracy) या प्रकरणी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनीही गुरुवारी कलम १६४ अन्वये त्यांचा जबाब नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणाला त्यांनी स्वत:विरोधातील षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
टीटी नगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार
भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना (6 फेब्रुवारी) रोजी रात्री एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला होता. त्या व्हिडीओ कॉलमध्ये संबंधित तरुणी ही नग्नावस्थेत दिसत होती. (pragya thakur recorded her statement) त्यानंतर प्रज्ञा यांना अज्ञात मोबाईल क्रमांकांवरून अश्लील फोटो आणि मेसेजेसही पाठवण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला व व्हिडिओ खासदाराला पाठवून पैशांची मागणी केली. भोपाळमधील टीटी नगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. १२ फेब्रुवारीला याप्रकरणी दोन्ही आरोपींना राजस्थानमधून अटक करण्यात आली.
ब्लॅकमेलर्सना अनेकांनी भरपूर पैसे दिले
साध्वी प्रज्ञा गुरुवारी (17 फेब्रुवारी)रोजी भोपाळ कोर्टात आपला बयाण नोंदवण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या हे एक मोठे षडयंत्र आहे. ज्या दिवसी ही घटना घडली तेव्हापासून मला देशभरातून लोकांचे फोन येत आहेत. (sadhvi pragya thakur sextortion) ज्यामध्ये लोकांनी सांगितले की सेक्सटोर्शनला कंटाळून कुणाच्या मुलाने आत्महत्या केली, तर कुणी सांगितले की त्यांचे नातेवाईक किंवा मित्र त्यांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करत आहेत. या ब्लॅकमेलर्सना अनेकांनी भरपूर पैसे दिले आहेत, तरीही त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली जात आहे.
स्फोटक साहित्यही पत्राद्वारे पाठवण्यात आले
कार्यकर्त्याने ब्लॅकमेलर्सच्या मोठ्या टोळक्याने सेक्सटोर्शनच्या नावाखाली केले जाणारे हे ब्लॅकमेलिंग हा सामाजिक गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यामुळे तरुण-तरुणींना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. ते म्हणाल्या की, मालेगावचा जो खटला त्यांच्याविरुद्ध सुरू आहे आणि त्यात ते आरोपी आहेत. अशा परिस्थितीत मला अनेक मुस्लिम लोकांकडून धमकीचे फोनही येतात. गेल्या वेळी स्फोटक साहित्यही पत्राद्वारे पाठवण्यात आले होते. दरम्यान, माझी बदनामी करण्याचे हे माझ्याविरुद्ध मोठे षडयंत्र आहे. मी या संपूर्ण प्रकरणाचा उघडपणे बदला घेण्याचे ठरवले आहे. कारण अशा घटनांमुळे संपूर्ण देश त्रस्त आहे.
हेही वाचा - Uttar Pradesh Assembly Election : पाच वर्षात पहिल्यांदाच अखिलेश, मुलायमसिंह आणि शिवपाल दिसले एकत्र