ETV Bharat / bharat

'पँटोए टागोरी': विश्व भारतीच्या शास्त्रज्ञांनी शेतीसाठी उपयुक्त जीवाणू शोधला; टागोरांच्या सन्मानार्थ दिलं नाव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 7:28 PM IST

Pantoea Tagorei Bacteria : विश्व भारतीच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतीला उपयुक्त जीवाणू शोधून काढलाय. याला नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर आणि त्यांचे पुत्र रथींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून 'पँटोए टागोरी' असं नाव देण्यात आलंय.

Pantoea Tagorei Bacteria
Pantoea Tagorei Bacteria
पँटोए टागोरी

बोलपुर (पश्चिम बंगाल) Pantoea Tagorei Bacteria : विश्व भारतीच्या वनस्पतिशास्त्र विभागानं एक नवीन जीवाणू शोधून काढलाय. हा जीवाणू मुळात भातशेतीसाठी उपयुक्त आहे. या जीवाणूला नोबेल पारितोषिक विजेते रविंदनाथ टागोर यांचं नाव देण्यात आलंय. असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया (AMI) नं केंद्रीय विद्यापीठ विश्व-भारतीच्या शोधाला आधीच मान्यता दिलीय.

नवीन जीवाणूमुळं कृषी क्षेत्रात घडेल क्रांती : या शोधामुळं कृषी क्षेत्रात क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे. या जिवाणूमुळं मातीतून पोटॅशियम काढण्यात कार्यक्षमता वाढण्यास, खतांचा खर्च कमी करण्यात आणि पीक उत्पादनात वाढ करण्यात मदत होईल. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शेती समृद्ध करण्यासाठी कृषी संशोधनावर भर दिला आणि नंतर त्यांनी शांतीनिकेतनची स्थापना केली. त्यांनी आपला मुलगा रथींद्रनाथ यालाही शेतीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवलं. पुढं रथींद्रनाथ टागोर हे विश्वभारतीचे पहिले कुलगुरू झाले. त्यांनी विविध कृषी संशोधन कामं सुरू केली.

पँटोए टागोरी दिलं नाव : नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे कृषी उत्पादनांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे घटक आहेत. या तीन घटकांना एकत्र NPK म्हणतात. वनस्पती हे घटक मातीतून गोळा करतात. परंतु, अनेक बाबतीत, उत्पादन घटल्यावर शेतकऱ्यांना विपणन सामग्री जमिनीत द्यावी लागते. विश्वभारतीच्या वनस्पतिशास्त्र विभागानं अशा जीवाणूंची नवीन प्रजाती शोधून काढलीय. याला 'पँटोए टागोरी' असं नाव देण्यात आलंय.

कोणी केलं संशोधन : वनस्पतिशास्त्र विभागातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. बुंबा दाम तसंच राजू बिस्वास, अभिजीत मिश्रा, अभिनव चक्रवर्ती, पूजा मुखोपाध्याय आणि संदीप घोष या त्यांच्या पाच विद्यार्थ्यांनी हा जीवाणू शोधून काढलाय.

भात आणि मिरची लागवडीसाठी हा जीवाणू उपयुक्त : भात लागवडीसाठी हा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. याशिवाय हा जीवाणू मिरची आणि मटारच्या लागवडीसाठीही उपयुक्त आहे. हे मातीतून पोटॅशियम सहजपणे गोळा करते आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करते. संशोधन करत असताना, 6 संशोधकांच्या टीमला शांतीनिकेतनच्या सोनाझुरी आणि नंतर झारखंडच्या झरिया कोळसा खाण क्षेत्राच्या जमिनीत हे जीवाणू सापडले.

हेही वाचा :

  1. Cow Urine Unfit For Human : गोमूत्र पिणे आरोग्यासाठी घातक, संशोधकांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम
  2. Cloudy Weather in Akola : ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, तूर पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला

पँटोए टागोरी

बोलपुर (पश्चिम बंगाल) Pantoea Tagorei Bacteria : विश्व भारतीच्या वनस्पतिशास्त्र विभागानं एक नवीन जीवाणू शोधून काढलाय. हा जीवाणू मुळात भातशेतीसाठी उपयुक्त आहे. या जीवाणूला नोबेल पारितोषिक विजेते रविंदनाथ टागोर यांचं नाव देण्यात आलंय. असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया (AMI) नं केंद्रीय विद्यापीठ विश्व-भारतीच्या शोधाला आधीच मान्यता दिलीय.

नवीन जीवाणूमुळं कृषी क्षेत्रात घडेल क्रांती : या शोधामुळं कृषी क्षेत्रात क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे. या जिवाणूमुळं मातीतून पोटॅशियम काढण्यात कार्यक्षमता वाढण्यास, खतांचा खर्च कमी करण्यात आणि पीक उत्पादनात वाढ करण्यात मदत होईल. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शेती समृद्ध करण्यासाठी कृषी संशोधनावर भर दिला आणि नंतर त्यांनी शांतीनिकेतनची स्थापना केली. त्यांनी आपला मुलगा रथींद्रनाथ यालाही शेतीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवलं. पुढं रथींद्रनाथ टागोर हे विश्वभारतीचे पहिले कुलगुरू झाले. त्यांनी विविध कृषी संशोधन कामं सुरू केली.

पँटोए टागोरी दिलं नाव : नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे कृषी उत्पादनांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे घटक आहेत. या तीन घटकांना एकत्र NPK म्हणतात. वनस्पती हे घटक मातीतून गोळा करतात. परंतु, अनेक बाबतीत, उत्पादन घटल्यावर शेतकऱ्यांना विपणन सामग्री जमिनीत द्यावी लागते. विश्वभारतीच्या वनस्पतिशास्त्र विभागानं अशा जीवाणूंची नवीन प्रजाती शोधून काढलीय. याला 'पँटोए टागोरी' असं नाव देण्यात आलंय.

कोणी केलं संशोधन : वनस्पतिशास्त्र विभागातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. बुंबा दाम तसंच राजू बिस्वास, अभिजीत मिश्रा, अभिनव चक्रवर्ती, पूजा मुखोपाध्याय आणि संदीप घोष या त्यांच्या पाच विद्यार्थ्यांनी हा जीवाणू शोधून काढलाय.

भात आणि मिरची लागवडीसाठी हा जीवाणू उपयुक्त : भात लागवडीसाठी हा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. याशिवाय हा जीवाणू मिरची आणि मटारच्या लागवडीसाठीही उपयुक्त आहे. हे मातीतून पोटॅशियम सहजपणे गोळा करते आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करते. संशोधन करत असताना, 6 संशोधकांच्या टीमला शांतीनिकेतनच्या सोनाझुरी आणि नंतर झारखंडच्या झरिया कोळसा खाण क्षेत्राच्या जमिनीत हे जीवाणू सापडले.

हेही वाचा :

  1. Cow Urine Unfit For Human : गोमूत्र पिणे आरोग्यासाठी घातक, संशोधकांनी सांगितले 'हे' दुष्परिणाम
  2. Cloudy Weather in Akola : ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, तूर पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.