ETV Bharat / bharat

YS Jagan Mohan Reddy : राजधानी अमरावतीच्या निर्णयावर उच्च न्यायालयावर सरकार नाराज

author img

By

Published : Mar 25, 2022, 3:14 PM IST

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, विधानसभेचे अध्यक्ष टी. सीताराम, विधी व कामकाज मंत्री बुग्गाना राजेंद्रनाथ आणि इतर अनेक सदस्यांनी 3 मार्चच्या निकालावर उच्च न्यायालयावर टीका केली. मात्र न्यायव्यवस्थेबद्दल आदर असल्याचेही म्हणाले.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी

अमरावती (आंध्र प्रदेश) - न्यायपालिकेने आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि तीन राजधान्यांच्या प्रकरणांमध्ये अव्यवहार्य आदेश जारी करून संघराज्याच्या आत्म्याच्या विरोधात गेले असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय.एस जगनमोहन रेड्डी गुरुवारी म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणावर अंमलबजावणी करता येत नसल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, विधानसभेचे अध्यक्ष टी. सीताराम, विधी व कामकाज मंत्री बुग्गाना राजेंद्रनाथ आणि इतर अनेक सदस्यांनी 3 मार्चच्या निकालावर उच्च न्यायालयावर टीका केली. मात्र न्यायव्यवस्थेबद्दल आदर असल्याचेही म्हणाले.

सभागृहात झाली चर्चा - उच्च न्यायालयाच्या निकालावर ज्येष्ठ आमदार धर्मा प्रसाद राव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे विधानसभेने शासनाचे विकेंद्रीकरण यावर चर्चा केली. ज्यामध्ये राज्याला अमरावती राजधानी आणि राजधानीचे बांधकाम आणि विकास करण्याचे आदेश देण्यात आले होते. चर्चा मुख्यत्वे हायकोर्टाच्या निर्णयाभोवती केंद्रित होती. त्यात राजधानी स्थलांतरण, विभाजन किंवा त्रिभाजन करण्यासाठी कोणताही कायदा करण्याची क्षमता राज्य विधानमंडळाकडे आहे की नाही, यावर मंथन करण्यात आले.

अमरावती (आंध्र प्रदेश) - न्यायपालिकेने आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि तीन राजधान्यांच्या प्रकरणांमध्ये अव्यवहार्य आदेश जारी करून संघराज्याच्या आत्म्याच्या विरोधात गेले असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय.एस जगनमोहन रेड्डी गुरुवारी म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणावर अंमलबजावणी करता येत नसल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, विधानसभेचे अध्यक्ष टी. सीताराम, विधी व कामकाज मंत्री बुग्गाना राजेंद्रनाथ आणि इतर अनेक सदस्यांनी 3 मार्चच्या निकालावर उच्च न्यायालयावर टीका केली. मात्र न्यायव्यवस्थेबद्दल आदर असल्याचेही म्हणाले.

सभागृहात झाली चर्चा - उच्च न्यायालयाच्या निकालावर ज्येष्ठ आमदार धर्मा प्रसाद राव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे विधानसभेने शासनाचे विकेंद्रीकरण यावर चर्चा केली. ज्यामध्ये राज्याला अमरावती राजधानी आणि राजधानीचे बांधकाम आणि विकास करण्याचे आदेश देण्यात आले होते. चर्चा मुख्यत्वे हायकोर्टाच्या निर्णयाभोवती केंद्रित होती. त्यात राजधानी स्थलांतरण, विभाजन किंवा त्रिभाजन करण्यासाठी कोणताही कायदा करण्याची क्षमता राज्य विधानमंडळाकडे आहे की नाही, यावर मंथन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.