ETV Bharat / bharat

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गोवा पोलिसांचे समन्स, 27 एप्रिलला हजर राहण्याची नोटीस

author img

By

Published : Apr 14, 2023, 12:37 PM IST

गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २७ एप्रिलला हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे निवडणूक पोस्टर्स बनवल्या आणि चिकटवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

goa police summons arvind kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत, गोवा पोलिसांकडून हजर राहण्यासाठी समन्स

नवी दिल्ली : गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 27 एप्रिलला हजर राहण्यास समन्स पाठवले आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे निवडणूक पोस्टर्स बनवल्या आणि चिकटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समन्सनुसार त्यांना पेरनेम पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. आमच्याकडे तुमची चौकशी करण्यासाठी योग्य कारणे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे पेरनेम पोलिसांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे नोटीसमध्ये : केजरीवाल यांना बजावलेल्या नोटीसमध्ये गोवा पोलिसांनी म्हटले आहे की, मालमत्तेच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सध्याच्या तपासासंदर्भात तथ्ये आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुमची चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. पेरनेम पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर दिलीप कुमार हलर्णकर यांनी केजरीवाल यांना ही नोटीस पाठवली आहे.

गोवा विधानसभेत आहेत दोन आमदार : आयपीसी (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) च्या कलम ४१ (ए) अंतर्गत, पोलीस एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावू शकतात. वाजवी तक्रार असल्यास किंवा त्याने गुन्हा केला असल्याची शंका असल्यास. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरे तर, मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलीस 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर निवडणुकीचे पोस्टर चिकटवल्याप्रकरणी गोवा प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीकायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचे दोन उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

नितीश कुमारांनी घेतली भेट : आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली. सीएम केजरीवाल म्हणाले की, सध्या देश अत्यंत कठीण काळातून जात आहे. स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भ्रष्ट सरकार आज देशात आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील सरकार बदलणे अत्यंत आवश्यक आहे आणि असे सरकार आले पाहिजे जे देशाला विकास देऊ शकेल.

हेही वाचा: अतिक अहमदच्या मुलालामहाराष्ट्रातून झाली मदत

नवी दिल्ली : गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 27 एप्रिलला हजर राहण्यास समन्स पाठवले आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे निवडणूक पोस्टर्स बनवल्या आणि चिकटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समन्सनुसार त्यांना पेरनेम पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. आमच्याकडे तुमची चौकशी करण्यासाठी योग्य कारणे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे पेरनेम पोलिसांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे नोटीसमध्ये : केजरीवाल यांना बजावलेल्या नोटीसमध्ये गोवा पोलिसांनी म्हटले आहे की, मालमत्तेच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सध्याच्या तपासासंदर्भात तथ्ये आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुमची चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. पेरनेम पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर दिलीप कुमार हलर्णकर यांनी केजरीवाल यांना ही नोटीस पाठवली आहे.

गोवा विधानसभेत आहेत दोन आमदार : आयपीसी (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) च्या कलम ४१ (ए) अंतर्गत, पोलीस एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावू शकतात. वाजवी तक्रार असल्यास किंवा त्याने गुन्हा केला असल्याची शंका असल्यास. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खरे तर, मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलीस 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर निवडणुकीचे पोस्टर चिकटवल्याप्रकरणी गोवा प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीकायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचे दोन उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

नितीश कुमारांनी घेतली भेट : आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली. सीएम केजरीवाल म्हणाले की, सध्या देश अत्यंत कठीण काळातून जात आहे. स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भ्रष्ट सरकार आज देशात आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील सरकार बदलणे अत्यंत आवश्यक आहे आणि असे सरकार आले पाहिजे जे देशाला विकास देऊ शकेल.

हेही वाचा: अतिक अहमदच्या मुलालामहाराष्ट्रातून झाली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.