ETV Bharat / bharat

'दीदी राजीनामा तयार ठेवा, 2 मे ला द्यावा लागणार'; अमित शाह यांचा हल्लाबोल

author img

By

Published : Apr 11, 2021, 9:39 PM IST

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रचाराचे रान उठवले आहे. आज अमित शाह यांनी बशीरहाट दक्षिणमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाला २०० जागांनी जिंकून द्या आणि दीदींना 'निरोप' द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह -मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह -मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची सामना पाहायला मिळत आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रचाराचे रान उठवले आहे. आज अमित शाह यांनी बशीरहाट दक्षिणमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाला २०० जागांनी जिंकून द्या आणि दीदींना 'निरोप' द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

दीदी आता गडबडल्या आहेत. रोज माझा राजीनामा मागत आहेत. जेव्हा जनता मला राजीनामा मागेल. तेव्हा तो देईल. मात्र, आता तुमचा राजीनामा जनता मागत आहे. राजीनामा तयार ठेवा येत्या 2 मेला तुम्हाला तो द्यावा लागेल, अशी टीका अमित शाह यांनी केली.

ममता दीदींच्या सुचनेनुसार काही युवकांनी मतदान केंद्रावर हल्ला केला. सीआयएसएफकडून हत्यारे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी सीआयएसएफच्या जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, असे शाह म्हणाले. ही निवडणूक महिला शक्ती आणि तृणमृल यांच्यामध्ये आहे. बंगालचे युवक, व्यापारी, गरीब आणि शेतकरी तृणमूलविरोधात आहेत. दीदींची पाठवणी करण्यासाठी बंगालची जनता तयार आहे, असेही शाह म्हणाले.

दीदी जनतेला त्रास देताय -

सध्या बंगालमध्ये दीदींच्या राज्यात तीन कायदे चालत आहेत. एका आपल्या भाच्यासाठी, दुसरा घुसखोरांसाठी, या दोन्ही कायद्यात शिक्षेचे प्रावधान नाही. तर तिसरा सामान्य नागिरकांसाठी आहे. या तिसऱ्या कायद्यात सर्व शिक्षेचे प्रावधान असून दीदी जनतेला त्रास देत आहेत, असे शाह म्हणाले.

बंगालमधील परिस्थिती बदलण्याचे उद्दीष्ट -

आम्ही बंगालच्या जनतेसाठी परिवर्तनाचा संदेश घेऊन आलो आहोत. एका मुख्यमंत्र्यांच्या जागेवर दुसऱ्याला बसवण्यासाठी नाही. एका पक्षाचे सरकार उलथवून दुसर्‍या पक्षाचे सरकार स्थापन करणे आमचे उद्दिष्ट नाही. बंगालमधील परिस्थिती बदलणे हे आमचे उद्दीष्ट आहे, असे शाह म्हणाले.

निर्वासितांना वर्षाकाठी 10,000 रुपयांची मदत -

निर्वासितांना नागरिकत्व मिळणार असल्यामुळे दीदी सीएएला विरोध करतात. सीसीएमुळे घुसखोर संतप्त याबद्दल त्यांना वाईट वाटते. आम्ही निर्वासितांसाठी निर्वासित कल्याण योजना सुरू करणार आहेत. त्यांना वर्षाकाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - छत्तीसगड : एका लाखाचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची सामना पाहायला मिळत आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रचाराचे रान उठवले आहे. आज अमित शाह यांनी बशीरहाट दक्षिणमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाला २०० जागांनी जिंकून द्या आणि दीदींना 'निरोप' द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

दीदी आता गडबडल्या आहेत. रोज माझा राजीनामा मागत आहेत. जेव्हा जनता मला राजीनामा मागेल. तेव्हा तो देईल. मात्र, आता तुमचा राजीनामा जनता मागत आहे. राजीनामा तयार ठेवा येत्या 2 मेला तुम्हाला तो द्यावा लागेल, अशी टीका अमित शाह यांनी केली.

ममता दीदींच्या सुचनेनुसार काही युवकांनी मतदान केंद्रावर हल्ला केला. सीआयएसएफकडून हत्यारे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी सीआयएसएफच्या जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, असे शाह म्हणाले. ही निवडणूक महिला शक्ती आणि तृणमृल यांच्यामध्ये आहे. बंगालचे युवक, व्यापारी, गरीब आणि शेतकरी तृणमूलविरोधात आहेत. दीदींची पाठवणी करण्यासाठी बंगालची जनता तयार आहे, असेही शाह म्हणाले.

दीदी जनतेला त्रास देताय -

सध्या बंगालमध्ये दीदींच्या राज्यात तीन कायदे चालत आहेत. एका आपल्या भाच्यासाठी, दुसरा घुसखोरांसाठी, या दोन्ही कायद्यात शिक्षेचे प्रावधान नाही. तर तिसरा सामान्य नागिरकांसाठी आहे. या तिसऱ्या कायद्यात सर्व शिक्षेचे प्रावधान असून दीदी जनतेला त्रास देत आहेत, असे शाह म्हणाले.

बंगालमधील परिस्थिती बदलण्याचे उद्दीष्ट -

आम्ही बंगालच्या जनतेसाठी परिवर्तनाचा संदेश घेऊन आलो आहोत. एका मुख्यमंत्र्यांच्या जागेवर दुसऱ्याला बसवण्यासाठी नाही. एका पक्षाचे सरकार उलथवून दुसर्‍या पक्षाचे सरकार स्थापन करणे आमचे उद्दिष्ट नाही. बंगालमधील परिस्थिती बदलणे हे आमचे उद्दीष्ट आहे, असे शाह म्हणाले.

निर्वासितांना वर्षाकाठी 10,000 रुपयांची मदत -

निर्वासितांना नागरिकत्व मिळणार असल्यामुळे दीदी सीएएला विरोध करतात. सीसीएमुळे घुसखोर संतप्त याबद्दल त्यांना वाईट वाटते. आम्ही निर्वासितांसाठी निर्वासित कल्याण योजना सुरू करणार आहेत. त्यांना वर्षाकाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - छत्तीसगड : एका लाखाचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.