ETV Bharat / bharat

RAHUL GANDHI TARGETS MODI GOVT बिल्किस बानो प्रकरणावरून राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 17, 2022, 3:49 PM IST

गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील Bilkis Bano Case ११ बलात्कार आणि हत्येतील दोषींच्या सुटकेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर Prime Minister Narendra Modi निशाणा साधला. पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

RAHUL GANDHI
RAHUL GANDHI

नवी दिल्ली: बिल्किस बानो प्रकरणातील Bilkis Bano Case 11 बलात्कार आणि हत्या आरोपींच्या सुटकेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर Prime Minister Narendra Modi निशाणा साधला. पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. या प्रकरणावरून राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी महिलांचा आदर हा भारताच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले होते. 'नारी शक्ती'ला पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.

गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सोमवारी सुटका करण्यात आली. आता राहुल गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुलने सोशल मीडियावर ट्विट करून लिहिले की, ज्यांनी 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीची हत्या केली त्यांना 'आझादी के अमृत महोत्सवा' दरम्यान सोडण्यात आले. स्त्रीशक्तीच्या गप्पा मारणाऱ्या देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे.

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका केल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या मुद्द्यावर विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमधून सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गुजरात सरकारने आपल्या माफी धोरणानुसार बानो प्रकरणातील दोषींची सुटका केली आहे. मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

काय आहे बिल्किस बानो प्रकरण गोध्रा हत्याकांडानंतर ३ मार्च २००२ रोजी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमावाने बिल्किस बानोच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यावेळी बिल्किस पाच महिन्यांची गरोदर होती. बिल्किसवर सामूहिक बलात्कार झाला. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या करण्यात आली.

हेही वाचा - Sharad Ponkshe Controversy : शरद पोंक्षेंच्या विधानावरुन काँग्रेस आक्रमक; दिला 'हा' इशारा

नवी दिल्ली: बिल्किस बानो प्रकरणातील Bilkis Bano Case 11 बलात्कार आणि हत्या आरोपींच्या सुटकेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर Prime Minister Narendra Modi निशाणा साधला. पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. या प्रकरणावरून राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी महिलांचा आदर हा भारताच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले होते. 'नारी शक्ती'ला पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.

गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सोमवारी सुटका करण्यात आली. आता राहुल गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुलने सोशल मीडियावर ट्विट करून लिहिले की, ज्यांनी 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीची हत्या केली त्यांना 'आझादी के अमृत महोत्सवा' दरम्यान सोडण्यात आले. स्त्रीशक्तीच्या गप्पा मारणाऱ्या देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे.

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका केल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या मुद्द्यावर विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमधून सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गुजरात सरकारने आपल्या माफी धोरणानुसार बानो प्रकरणातील दोषींची सुटका केली आहे. मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

काय आहे बिल्किस बानो प्रकरण गोध्रा हत्याकांडानंतर ३ मार्च २००२ रोजी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमावाने बिल्किस बानोच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यावेळी बिल्किस पाच महिन्यांची गरोदर होती. बिल्किसवर सामूहिक बलात्कार झाला. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या करण्यात आली.

हेही वाचा - Sharad Ponkshe Controversy : शरद पोंक्षेंच्या विधानावरुन काँग्रेस आक्रमक; दिला 'हा' इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.