ETV Bharat / bharat

Islamnagar Now Jagdishpur: इस्लामनगरचे नाव आता झाले जगदीशपूर.. राज्य सरकारची नाव बदलास मान्यता

author img

By

Published : Feb 3, 2023, 2:30 AM IST

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 13 किलोमीटर दूर असलेले जगदीशपूर वर्षानुवर्षे खऱ्या ओळखीपासून दूर होते. आता या शहराला पुन्हा एकदा जुनी ओळख मिळाली आहे. इस्लामनगर आता जगदीशपूर म्हणून ओळखले जाणार आहे. याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Islamnagar name changed to Jagdishpur MP government gave approval
इस्लामनगरचे नाव आता झाले जगदीशपूर.. राज्य सरकारची नाव बदलास मान्यता

भोपाळ (मध्यप्रदेश): एखाद्या व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख खूप महत्त्वाची असते, असे म्हणतात. जेव्हा त्याच्यापासून ओळख हिरावून घेतली जाते, तेव्हा त्याच्या अस्तित्वावरही प्रश्न निर्माण होऊ लागतात. असाच काहीसा प्रकार राजधानी भोपाळमध्ये पाहायला मिळाला. जिथे भोपळपासून 13 किलोमीटर अंतरावरील एक जागा गेल्या 308 वर्षांपासून खऱ्या ओळखीच्या प्रतीक्षेत होती. इस्लामनगरला आता खरी ओळख मिळाली असून, ३०८ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. इस्लामनगर आता जगदीशपूर म्हणून ओळखले जाईल. राज्य सरकारने त्याचे नाव बदलून जगदीशपूर केले आहे. त्याची अधिसूचना राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाड्यांचेही नूतनीकरण केले जाणार आहे.

इतिहास काय सांगतो : हलाली नदीच्या काठावर वसलेला इस्लामनगरचा किल्ला अतिशय सुंदर आहे. इस्लामनगर पूर्वी जगदीशपूर म्हणून ओळखले जात होते. मूळतः जगदीशपूर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण स्थानिक गोंड शासक राजा विजयराम यांनी स्थापन केले होते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीस, भोपाळ संस्थानाचा संस्थापक दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूरच्या राजाचा विश्वासघात करून वध करून जगदीशपूर ताब्यात घेतले. त्यानंतर जगदीशपूरचे नाव बदलून इस्लामनगर करण्यात आले. इस्लामनगर ही दोस्त मोहम्मद खानच्या राज्याची मूळ राजधानी होती. इस्लामनगरमधील चमन महल दोस्त मोहम्मद खान याने १७१५ मध्ये बांधला होता. येथील राणीमहालही अतिशय सुंदर आहे. 1723 मध्ये, दोस्त मोहम्मद खानला थोड्या वेढा घातल्यानंतर इस्लामनगर किल्ला निजाम-उल-मुल्कच्या स्वाधीन करावा लागला. शांतता करारानंतर खानला निजामाच्या अधिपत्याखाली किल्लेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. १७२७ मध्ये त्यांनी आपली राजधानी भोपाळला हलवली.

गावकऱ्यांनी पत्र लिहून नाव बदलण्याची केली मागणी : येथील गावकऱ्यांनी इस्लाम नगर या गावाचे जुने नाव बदलून जगदीशपूर करण्याची मागणीही फार पूर्वीपासून सुरू केली होती. येथे सुमारे 17 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीनेही जगदीशपूर नावाला आक्षेप नसल्याचे पत्र शासनाला दिले होते. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आले. साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही इस्लामनगरचे नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याशी चर्चा केली होती.

केंद्राकडून आधीच मंजूरी मिळाली होती: मध्य प्रदेशच्या महसूल विभागाने बुधवारी मध्य प्रदेश राजपत्रावर एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रानंतर भोपाळ जिल्ह्यातील इस्लामनगर गावाचे नाव बदलून राज्य सरकारने जगदीशपूर केले असल्याचे सांगण्यात आले आहे. हे पत्र केंद्र सरकारने 15 सप्टेंबर 2022 रोजी जारी केले होते. ही अधिसूचना अतिरिक्त सचिव चंद्रशेखर वालिंबे यांनी मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या नावाने आणि आदेशाने जारी केली आहे. पुरातत्व विभागाने राणी महाल, चमन महाल आणि गोंड महाल येथे लावलेल्या माहिती फलकांवर इस्लामनगरचे जुने नाव जगदीशपूर असे नमूद करण्यात आले आहे. 1715 मध्ये जगदीशपूरचा ताबा घेतल्यानंतर सरदार दोस्त मोहम्मद खानने त्याचे नाव बदलून इस्लामनगर केले, असे सांगितले जाते. गोंड शासक नरसिंग देवरा याच्या नावाचाही येथे उल्लेख आहे.

हेही वाचा: इंडिया नाव बदलून भारत ठेवण्याबाबत याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली

भोपाळ (मध्यप्रदेश): एखाद्या व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख खूप महत्त्वाची असते, असे म्हणतात. जेव्हा त्याच्यापासून ओळख हिरावून घेतली जाते, तेव्हा त्याच्या अस्तित्वावरही प्रश्न निर्माण होऊ लागतात. असाच काहीसा प्रकार राजधानी भोपाळमध्ये पाहायला मिळाला. जिथे भोपळपासून 13 किलोमीटर अंतरावरील एक जागा गेल्या 308 वर्षांपासून खऱ्या ओळखीच्या प्रतीक्षेत होती. इस्लामनगरला आता खरी ओळख मिळाली असून, ३०८ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. इस्लामनगर आता जगदीशपूर म्हणून ओळखले जाईल. राज्य सरकारने त्याचे नाव बदलून जगदीशपूर केले आहे. त्याची अधिसूचना राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाड्यांचेही नूतनीकरण केले जाणार आहे.

इतिहास काय सांगतो : हलाली नदीच्या काठावर वसलेला इस्लामनगरचा किल्ला अतिशय सुंदर आहे. इस्लामनगर पूर्वी जगदीशपूर म्हणून ओळखले जात होते. मूळतः जगदीशपूर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण स्थानिक गोंड शासक राजा विजयराम यांनी स्थापन केले होते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीस, भोपाळ संस्थानाचा संस्थापक दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूरच्या राजाचा विश्वासघात करून वध करून जगदीशपूर ताब्यात घेतले. त्यानंतर जगदीशपूरचे नाव बदलून इस्लामनगर करण्यात आले. इस्लामनगर ही दोस्त मोहम्मद खानच्या राज्याची मूळ राजधानी होती. इस्लामनगरमधील चमन महल दोस्त मोहम्मद खान याने १७१५ मध्ये बांधला होता. येथील राणीमहालही अतिशय सुंदर आहे. 1723 मध्ये, दोस्त मोहम्मद खानला थोड्या वेढा घातल्यानंतर इस्लामनगर किल्ला निजाम-उल-मुल्कच्या स्वाधीन करावा लागला. शांतता करारानंतर खानला निजामाच्या अधिपत्याखाली किल्लेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. १७२७ मध्ये त्यांनी आपली राजधानी भोपाळला हलवली.

गावकऱ्यांनी पत्र लिहून नाव बदलण्याची केली मागणी : येथील गावकऱ्यांनी इस्लाम नगर या गावाचे जुने नाव बदलून जगदीशपूर करण्याची मागणीही फार पूर्वीपासून सुरू केली होती. येथे सुमारे 17 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीनेही जगदीशपूर नावाला आक्षेप नसल्याचे पत्र शासनाला दिले होते. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आले. साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही इस्लामनगरचे नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याशी चर्चा केली होती.

केंद्राकडून आधीच मंजूरी मिळाली होती: मध्य प्रदेशच्या महसूल विभागाने बुधवारी मध्य प्रदेश राजपत्रावर एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रानंतर भोपाळ जिल्ह्यातील इस्लामनगर गावाचे नाव बदलून राज्य सरकारने जगदीशपूर केले असल्याचे सांगण्यात आले आहे. हे पत्र केंद्र सरकारने 15 सप्टेंबर 2022 रोजी जारी केले होते. ही अधिसूचना अतिरिक्त सचिव चंद्रशेखर वालिंबे यांनी मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या नावाने आणि आदेशाने जारी केली आहे. पुरातत्व विभागाने राणी महाल, चमन महाल आणि गोंड महाल येथे लावलेल्या माहिती फलकांवर इस्लामनगरचे जुने नाव जगदीशपूर असे नमूद करण्यात आले आहे. 1715 मध्ये जगदीशपूरचा ताबा घेतल्यानंतर सरदार दोस्त मोहम्मद खानने त्याचे नाव बदलून इस्लामनगर केले, असे सांगितले जाते. गोंड शासक नरसिंग देवरा याच्या नावाचाही येथे उल्लेख आहे.

हेही वाचा: इंडिया नाव बदलून भारत ठेवण्याबाबत याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.