ETV Bharat / bharat

'पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला'

author img

By

Published : Feb 14, 2020, 11:11 AM IST

पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला आणि हल्ल्याच्या चौकशीमधून काय माहिती मिळाली?, असे सवाल राहुल गांधींनी टि्वट करुन उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय जवानांना जीव गमवावा लागला होता. पुलवामा हल्ला ही देशासाठी फार मोठी शोकांतिका असून आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे. त्यावरून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला आणि हल्ल्याच्या चौकशीमधून काय माहिती मिळाली?, असे सवाल राहुल गांधींनी टि्वट करुन उपस्थित केले आहेत.

  • Today as we remember our 40 CRPF martyrs in the #PulwamaAttack , let us ask:

    1. Who benefitted the most from the attack?

    2. What is the outcome of the inquiry into the attack?

    3. Who in the BJP Govt has yet been held accountable for the security lapses that allowed the attack? pic.twitter.com/KZLbdOkLK5

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुलवामा हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या 40 जवानांची आज आपण आठवण काढत आहोत. त्यामुळे याप्रकरणी काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला?, हल्ल्याच्या चौकशीचा काय निकाल आहे?, सुरक्षेत चुक झाल्याप्रकरणी भाजप सरकारने कोणाला जबाबदार ठरवले?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये केले आहेत.

राहुल गांधींच्या टि्वटवर भाजप नेता कपिल मिश्रा यांनी पलटवार केला आहे. 'राहुल गांधी जरा लाज बाळगा. पुलवामा हल्ल्यामुळे कुणाला फायदा झाला?, हे तुम्ही विचारत आहात. मात्र, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे कोणाला फायदा झाला, हे जर देशाने विचारले तर काय उत्तर द्याल?, इतक्या खालच्या थराचे राजकारण करु नका, असे कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे.

  • शर्म करो राहुल गांधी

    पूछते हो पुलवामा हमले से किसका फायदा हुआ?

    अगर देश ने पूछ लिया कि इंदिरा राजीव की हत्या से किसका फायदा हुआ , फिर क्या बोलोगे?

    इतनी घटिया राजनीति मत करो

    शर्म करो https://t.co/9C5AsNyMba

    — Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधला काळा दिवस आहे.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय जवानांना जीव गमवावा लागला होता. पुलवामा हल्ला ही देशासाठी फार मोठी शोकांतिका असून आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे. त्यावरून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला आणि हल्ल्याच्या चौकशीमधून काय माहिती मिळाली?, असे सवाल राहुल गांधींनी टि्वट करुन उपस्थित केले आहेत.

  • Today as we remember our 40 CRPF martyrs in the #PulwamaAttack , let us ask:

    1. Who benefitted the most from the attack?

    2. What is the outcome of the inquiry into the attack?

    3. Who in the BJP Govt has yet been held accountable for the security lapses that allowed the attack? pic.twitter.com/KZLbdOkLK5

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुलवामा हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या 40 जवानांची आज आपण आठवण काढत आहोत. त्यामुळे याप्रकरणी काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला?, हल्ल्याच्या चौकशीचा काय निकाल आहे?, सुरक्षेत चुक झाल्याप्रकरणी भाजप सरकारने कोणाला जबाबदार ठरवले?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये केले आहेत.

राहुल गांधींच्या टि्वटवर भाजप नेता कपिल मिश्रा यांनी पलटवार केला आहे. 'राहुल गांधी जरा लाज बाळगा. पुलवामा हल्ल्यामुळे कुणाला फायदा झाला?, हे तुम्ही विचारत आहात. मात्र, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे कोणाला फायदा झाला, हे जर देशाने विचारले तर काय उत्तर द्याल?, इतक्या खालच्या थराचे राजकारण करु नका, असे कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे.

  • शर्म करो राहुल गांधी

    पूछते हो पुलवामा हमले से किसका फायदा हुआ?

    अगर देश ने पूछ लिया कि इंदिरा राजीव की हत्या से किसका फायदा हुआ , फिर क्या बोलोगे?

    इतनी घटिया राजनीति मत करो

    शर्म करो https://t.co/9C5AsNyMba

    — Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधला काळा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.