ETV Bharat / bharat

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची माहिती

author img

By

Published : Mar 4, 2020, 12:51 PM IST

Updated : Mar 4, 2020, 1:26 PM IST

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची पत्रकार परिषद घेतली असून देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती दिली.

भारतामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 28, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची माहिती
भारतामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 28, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची माहिती

नवी दिल्ली - कोरोना विषाणूची दहशत भारतामध्येही पसरली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची पत्रकार परिषद घेतली असून देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 28 वर पोहचल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र वार्ड करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले आहे. भारतात आलेले पर्यटकांची तपासणी सुरू आहे. संशयित लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांद्वारे कोरोनाचा संसर्ग भारतात पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या देशांचे जे नागरिक अद्याप भारतात पोहोचलेले नाहीत, त्यांना मंजूर केलेले व्हिसा तात्पुरते स्थगित केले आहेत. मंत्रालयाने याबाबतची अ‌ॅडव्हायजरी मंगळवारी जारी केली.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूची दहशत भारतामध्येही पसरली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची पत्रकार परिषद घेतली असून देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 28 वर पोहचल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र वार्ड करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले आहे. भारतात आलेले पर्यटकांची तपासणी सुरू आहे. संशयित लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांद्वारे कोरोनाचा संसर्ग भारतात पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या देशांचे जे नागरिक अद्याप भारतात पोहोचलेले नाहीत, त्यांना मंजूर केलेले व्हिसा तात्पुरते स्थगित केले आहेत. मंत्रालयाने याबाबतची अ‌ॅडव्हायजरी मंगळवारी जारी केली.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला.

Last Updated : Mar 4, 2020, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.