ETV Bharat / bharat

कुटुंबासह सायकल रिक्षाने तरुण निघाला गावी, ११०० किलोमीटरचा आहे प्रवास

author img

By

Published : May 17, 2020, 1:39 PM IST

दिल्ली ते मुजफ्फपूर हा जवळपास ११०० किलोमीटरचा प्रवास ब्रिजेश कुमार आपल्या कुटुंबासह तीन चाकी सायकल रिक्षातून करत आहे. ब्रिजेशसह त्याच्या कुटुंबियाशी 'ईटीव्ही भारत'ने गाजियाबादमध्ये बातचित केली.

migrant worker Family travel from Delhi to Muzaffarpur by thela
दिल्ली ते मुजफ्फरपूर ११०० किलोमीटरचा प्रवास सायकलने, तेही कुटुंबासह

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्ली ते मुजफ्फपूर हा जवळपास ११०० किलोमीटरचा प्रवास ब्रिजेश कुमार आपल्या कुटुंबासह तीन चाकी सायकल रिक्षातून करत आहे. ब्रिजेशसह त्याच्या कुटुंबीयाशी 'ईटीव्ही भारत'ने गाजियाबादमध्ये बातचित केली.

कुमार कुटुंबियाशीं बातचित करताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी शहजाद आबिद...

ब्रिजेश दिवस-रात्र सायकल रिक्षा चालवून आपल्या गावी निघाला आहे. रिक्षाच्या पाठिमागे त्याची पत्नी व दोन मुलं बसलेली आहेत. तो आपल्या संसारउपयोगी साहित्यासह आपल्या गावी निघाला आहे. पत्नी रंगीला ही आपल्या मुलांना ऊनापासून वाचवण्यासाठी विविध उपाय करत आहे. मुलाला ऊन लागू नये, यासाठी मुलाच्या डोक्यावर उशी ठेवत असल्याचे तिनं सांगितलं. याशिवाय जे दुसरं लहान बाळ आहे, त्याला ऊन लागू नये, यासाठी तिने बाळाला पदराखाली झाकून ठेवलं आहे.

दरम्यान, विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू केली आहे. पण मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू यांची संख्या जास्त असल्याने, सरकारच्या सर्व उपाययोजना तोडक्या पडताना दिसत आहेत.

हेही वाचा - राहुल गांधींच्या भेटीनंतर मजुरांना ताब्यात घेतले गेले; काँग्रेसचा आरोप

हेही वाचा - कोरोना वॉरियर्ससाठी कांगडा जिल्ह्यात आयुर्वेदीक काढ्याचे वितरण

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्ली ते मुजफ्फपूर हा जवळपास ११०० किलोमीटरचा प्रवास ब्रिजेश कुमार आपल्या कुटुंबासह तीन चाकी सायकल रिक्षातून करत आहे. ब्रिजेशसह त्याच्या कुटुंबीयाशी 'ईटीव्ही भारत'ने गाजियाबादमध्ये बातचित केली.

कुमार कुटुंबियाशीं बातचित करताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी शहजाद आबिद...

ब्रिजेश दिवस-रात्र सायकल रिक्षा चालवून आपल्या गावी निघाला आहे. रिक्षाच्या पाठिमागे त्याची पत्नी व दोन मुलं बसलेली आहेत. तो आपल्या संसारउपयोगी साहित्यासह आपल्या गावी निघाला आहे. पत्नी रंगीला ही आपल्या मुलांना ऊनापासून वाचवण्यासाठी विविध उपाय करत आहे. मुलाला ऊन लागू नये, यासाठी मुलाच्या डोक्यावर उशी ठेवत असल्याचे तिनं सांगितलं. याशिवाय जे दुसरं लहान बाळ आहे, त्याला ऊन लागू नये, यासाठी तिने बाळाला पदराखाली झाकून ठेवलं आहे.

दरम्यान, विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू केली आहे. पण मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू यांची संख्या जास्त असल्याने, सरकारच्या सर्व उपाययोजना तोडक्या पडताना दिसत आहेत.

हेही वाचा - राहुल गांधींच्या भेटीनंतर मजुरांना ताब्यात घेतले गेले; काँग्रेसचा आरोप

हेही वाचा - कोरोना वॉरियर्ससाठी कांगडा जिल्ह्यात आयुर्वेदीक काढ्याचे वितरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.