ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा : 'नितीश कुमारांसारखी मतं खाणार दुसरा कोणी नाही' पाहा पप्पू यादव यांची खास मुलाखात

author img

By

Published : Oct 7, 2020, 9:57 PM IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ईटीव्ही भारतने जन अधिकारी पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांच्याशी खास चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

jap chief pappu yadav
पप्पू यादव

पाटणा - खूप दिवसांपूर्वी पप्पू यादव एकदा म्हणाले होते, की जर मी राजकारणात नसतो तर सामाजिक कार्यकर्ता झालो असतो. मात्र, नशिबाने पप्पू यादव राजकारणात आले तसेच त्यांनी सामाजिक कार्यही सुरू ठेवले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने जन अधिकारी पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांची खास मुलाखत घेतली आहे. 'मी एक अनपेक्षित क्षेपणास्त्र (मिसाइल) असून कधीही कोणावरही डागलं जाऊ शकतो', असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना पप्पू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश सरकार पाटणा शहराची प्रतिमा बदण्यातही अद्याप यशस्वी झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

बिहारच्या राजकारणातील 'राबिनहूड'

'मी जमीन विकून लोकांना मदत केली आहे. आजारग्रस्त असतानाही लोकांच्या हिताचे मुद्दे उठवत आलो आहे, आणि पुढेही काम करत राहीन', असे पप्पू यादव म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, जेव्हा बिहारमधील जनता संकटात होती तेव्हा कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. मी प्रत्येक वेळा बिहारच्या जनतेसाठी उभा राहिलो. मग तो कोरोना संसर्ग असो, चमकी ताप किंवा पूरस्थिती असो मी लोकांची मदत केली. मला प्रत्येक जातीचा पाठिंबा मिळत आला आहे.

मते खाणारा (वोटकटवा) कोण आहे ?

राज्यात विधानसभा निवडणुकीत मते खाणार कोण आहे ?, असा प्रश्न यादव यांना विचारला असता ते म्हणाले, नितीश कुमारांसारखे मत खाणारे दुसरे मोठे कोणीही नाही. सुशील मोदींवरही पप्पू यादव यांनी निशाणा साधला. राज्यात पूर आला तेव्हा सुशील मोदी 'हाफ पँन्ट' घालून पळून गेले. तसेच त्यांनी लोकांची मदतही केली नाही.

पाटणा - खूप दिवसांपूर्वी पप्पू यादव एकदा म्हणाले होते, की जर मी राजकारणात नसतो तर सामाजिक कार्यकर्ता झालो असतो. मात्र, नशिबाने पप्पू यादव राजकारणात आले तसेच त्यांनी सामाजिक कार्यही सुरू ठेवले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने जन अधिकारी पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांची खास मुलाखत घेतली आहे. 'मी एक अनपेक्षित क्षेपणास्त्र (मिसाइल) असून कधीही कोणावरही डागलं जाऊ शकतो', असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. ईटीव्ही भारतशी बोलताना पप्पू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश सरकार पाटणा शहराची प्रतिमा बदण्यातही अद्याप यशस्वी झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

बिहारच्या राजकारणातील 'राबिनहूड'

'मी जमीन विकून लोकांना मदत केली आहे. आजारग्रस्त असतानाही लोकांच्या हिताचे मुद्दे उठवत आलो आहे, आणि पुढेही काम करत राहीन', असे पप्पू यादव म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, जेव्हा बिहारमधील जनता संकटात होती तेव्हा कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. मी प्रत्येक वेळा बिहारच्या जनतेसाठी उभा राहिलो. मग तो कोरोना संसर्ग असो, चमकी ताप किंवा पूरस्थिती असो मी लोकांची मदत केली. मला प्रत्येक जातीचा पाठिंबा मिळत आला आहे.

मते खाणारा (वोटकटवा) कोण आहे ?

राज्यात विधानसभा निवडणुकीत मते खाणार कोण आहे ?, असा प्रश्न यादव यांना विचारला असता ते म्हणाले, नितीश कुमारांसारखे मत खाणारे दुसरे मोठे कोणीही नाही. सुशील मोदींवरही पप्पू यादव यांनी निशाणा साधला. राज्यात पूर आला तेव्हा सुशील मोदी 'हाफ पँन्ट' घालून पळून गेले. तसेच त्यांनी लोकांची मदतही केली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.