ETV Bharat / bharat

चित्त्यांकडून शिकार करून घेतली जायची; छत्रपती घराण्यातील 'रॉयल गेम' - पाहा स्पेशल रिपोर्ट

author img

By

Published : Feb 13, 2020, 2:37 PM IST

Updated : Feb 14, 2020, 4:33 PM IST

'जवळपास ३५ चित्ते महाराजांच्या काळात शिकारीसाठी पाळले जात असल्याचे सांगितले जाते. भारतीय चित्ता जगामध्ये प्रसिद्ध होता. शिकाऱ्यानेच शिकार केल्यामुळे मात्र, आता चित्ता नामशेष झाला आहे'.

चित्ता, cheetah
चित्ता

कोल्हापूर - 'चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते'. हा बाजीराव मस्तानी चित्रपटातील डायलॉग रणवीरसिंग मोठ्या रुबाबात म्हणतो, पण विसाव्या शतकात भारतामधून हीच चित्त्याची जात कायमचीचं नामशेष झाली आहे.

चित्त्यांकडून शिकार करून घेतली जायची; छत्रपती घराण्यातील 'रॉयल गेम'

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकन चित्ता भारतात आणण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. जगातील सर्वात चपळ प्राणी म्हणून चित्त्याला ओळखले जाते. पण हे चित्ते नामशेष कसे झाले पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट.

राजर्षी शाहू महाराजांना शिकारीची प्रचंड आवड होती. चित्त्याकडून शिकार करून घेता येते हे समजल्यानंतर शाहू महाराजांनी शिकारीसाठी चित्ते पाळले होते. शिकारीचा हा एक राजेशाही खेळ होता. या चित्त्यांना प्रशिक्षणही दिले जायचे. चित्त्यांच्या निगराणीसाठी शाहू महाराजांनी हैदराबाद संस्थानामधून चित्तेवान म्हणजेच चित्ते सांभाळणाऱ्या दोघांना बोलावून घेतले होते. शिकारीसाठी पाळलेल्या चित्त्यांना चित्तेखान्यात ठेवले जायचे. कोल्हापुरातल्या बसस्थानक परिसरात आजही चित्तेखाना ही वास्तू पाहायला मिळते. या चित्त्यांचा सांभाळ करणाऱ्या चित्तेवालांचे वंशज आजही शहरातील बिंदू चौक परिसरात राहतात.

भारतीय चित्ता जगामध्ये प्रसिद्ध होता. शिकाऱ्यानेच शिकार केल्यामुळे मात्र, आता चित्ता नामशेष झाला आहे. भारतामध्ये रजूपत राजे, हैदराबादचे नवाब आणि कोल्हापूरचे राजे चित्त्यांची शिकार करण्यास प्रसिद्ध होते. शाहू महाराजांनी चित्त्यांकरवी शिकार वाढवली. चित्त्यांकडून हरणांची शिकार करून घेतली जात होती. शाहु महाराजानंतर त्यांची देखभाल घेण्यात आली नाही. १९६० साली शेवटचा चित्ता पाहिला, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

चित्त्यांची काळजी घेण्यासाठी शाहु महाराजांनी हैदराबाद संस्थानातून दोन चित्तेवानांना बोलावून घेतले होते. या चित्त्यांकडून हरिणांची शिकार करून घेतली जायची. चित्त्यांना अंघोळ घालणे त्यांची त्यांची निगा राखण्याचे काम या चित्तेवानांकडे होते, असे कोल्हापूरातील चित्तेवान खानदानातील चौथे वंशज अमजद चित्तेवाल यांनी सांगितले.

'द एन्ड ऑफ अ ट्रेल, द चिता ऑफ इंडिया' या पुस्तकात भारतातील चित्त्यांचा इतिहास मांडला आहे. यामध्ये देशातील अनेक संस्थानांचा उल्लेख केला आहे. खास करुन कोल्हापूर संस्थानांचा उल्लेख पुस्तकात आहे. चित्त्यांकडून कशा पद्धतीने शिकार करून घेतली जात होती. त्यांची निगा कशी राखली जायची, हे फोटोसहित दाखवण्यात आले आहे. जवळपास ३५ चित्ते महाराजांच्या काळात शिकारीसाठी पाळले जात असल्याचे सांगितले जाते.

अनेक वर्षांपासून भारतात चित्ते आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण प्रत्यक्षात भारतात केव्हा चित्ते येणार? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

कोल्हापूर - 'चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते'. हा बाजीराव मस्तानी चित्रपटातील डायलॉग रणवीरसिंग मोठ्या रुबाबात म्हणतो, पण विसाव्या शतकात भारतामधून हीच चित्त्याची जात कायमचीचं नामशेष झाली आहे.

चित्त्यांकडून शिकार करून घेतली जायची; छत्रपती घराण्यातील 'रॉयल गेम'

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकन चित्ता भारतात आणण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. जगातील सर्वात चपळ प्राणी म्हणून चित्त्याला ओळखले जाते. पण हे चित्ते नामशेष कसे झाले पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट.

राजर्षी शाहू महाराजांना शिकारीची प्रचंड आवड होती. चित्त्याकडून शिकार करून घेता येते हे समजल्यानंतर शाहू महाराजांनी शिकारीसाठी चित्ते पाळले होते. शिकारीचा हा एक राजेशाही खेळ होता. या चित्त्यांना प्रशिक्षणही दिले जायचे. चित्त्यांच्या निगराणीसाठी शाहू महाराजांनी हैदराबाद संस्थानामधून चित्तेवान म्हणजेच चित्ते सांभाळणाऱ्या दोघांना बोलावून घेतले होते. शिकारीसाठी पाळलेल्या चित्त्यांना चित्तेखान्यात ठेवले जायचे. कोल्हापुरातल्या बसस्थानक परिसरात आजही चित्तेखाना ही वास्तू पाहायला मिळते. या चित्त्यांचा सांभाळ करणाऱ्या चित्तेवालांचे वंशज आजही शहरातील बिंदू चौक परिसरात राहतात.

भारतीय चित्ता जगामध्ये प्रसिद्ध होता. शिकाऱ्यानेच शिकार केल्यामुळे मात्र, आता चित्ता नामशेष झाला आहे. भारतामध्ये रजूपत राजे, हैदराबादचे नवाब आणि कोल्हापूरचे राजे चित्त्यांची शिकार करण्यास प्रसिद्ध होते. शाहू महाराजांनी चित्त्यांकरवी शिकार वाढवली. चित्त्यांकडून हरणांची शिकार करून घेतली जात होती. शाहु महाराजानंतर त्यांची देखभाल घेण्यात आली नाही. १९६० साली शेवटचा चित्ता पाहिला, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

चित्त्यांची काळजी घेण्यासाठी शाहु महाराजांनी हैदराबाद संस्थानातून दोन चित्तेवानांना बोलावून घेतले होते. या चित्त्यांकडून हरिणांची शिकार करून घेतली जायची. चित्त्यांना अंघोळ घालणे त्यांची त्यांची निगा राखण्याचे काम या चित्तेवानांकडे होते, असे कोल्हापूरातील चित्तेवान खानदानातील चौथे वंशज अमजद चित्तेवाल यांनी सांगितले.

'द एन्ड ऑफ अ ट्रेल, द चिता ऑफ इंडिया' या पुस्तकात भारतातील चित्त्यांचा इतिहास मांडला आहे. यामध्ये देशातील अनेक संस्थानांचा उल्लेख केला आहे. खास करुन कोल्हापूर संस्थानांचा उल्लेख पुस्तकात आहे. चित्त्यांकडून कशा पद्धतीने शिकार करून घेतली जात होती. त्यांची निगा कशी राखली जायची, हे फोटोसहित दाखवण्यात आले आहे. जवळपास ३५ चित्ते महाराजांच्या काळात शिकारीसाठी पाळले जात असल्याचे सांगितले जाते.

अनेक वर्षांपासून भारतात चित्ते आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण प्रत्यक्षात भारतात केव्हा चित्ते येणार? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Last Updated : Feb 14, 2020, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.