ETV Bharat / bharat

गुंड विकास दुबेला ठार केलं जाऊ शकतं... चकमकीच्या काही तास आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका

author img

By

Published : Jul 10, 2020, 12:41 PM IST

महाराष्ट्रातील वकील घनश्याम उपाध्याय यांनी काल (गुरुवार) रात्री उशिरा जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. जर विकास दुबेला सुरक्षा दिली नाही तर त्याच्या इतर साथीरादारांप्रमाणे पोलिसांच्या चकमकीत हत्या होऊ शकते, असे याचिकेत म्हटले होते.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. झाशीवरून कानपूरला आणण्यात येत असताना पोलीस ताफ्यातील एका कारचा अपघात झाला, त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र हिसकावत गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. मात्र, चकमक होण्याआधी काही तास सर्वोच्च न्यायालयात एक याचिक दाखल झाली होती. विकास दुबेची पोलीस चकमकीत हत्या होऊ नये म्हणून न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला आदेश द्यावे असे, याचिकेत म्हटले होते.

महाराष्ट्रातील वकील घनश्याम उपाध्याय यांनी काल (गुरुवार) रात्री उशिरा जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. जर विकास दुबेला सुरक्षा दिली नाही तर त्याच्या इतर साथीरादारांप्रमाणे पोलिसांच्या चकमकीत हत्या होऊ शकते, असे याचिकेत म्हटले होते. उपाध्याय यांनी अनेक माध्यमांचा हवालाही दिला होता. पोलीस चकमक टाळण्यासाठी विकास दुबेने स्वत: ला अटक करून घेतले होते.

विकास दुबेच्या पाच साथीरादारांनाही पोलिसांनी चकमकीत ठार मारले, याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली होती. या सोबत विकास दुबेचे घर, शॉपिंग मॉल, महागड्या गाड्या, इमारती नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

विकास दुबे हा कुख्यात गुंड होता. त्याच्यावर 60पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. कानपुरमधील बिकारू गावात त्याने आठ पोलिसांना ठार केले होते. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. मध्यप्रदेशातील उज्जैन येथून त्याला अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली - कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. झाशीवरून कानपूरला आणण्यात येत असताना पोलीस ताफ्यातील एका कारचा अपघात झाला, त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र हिसकावत गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. मात्र, चकमक होण्याआधी काही तास सर्वोच्च न्यायालयात एक याचिक दाखल झाली होती. विकास दुबेची पोलीस चकमकीत हत्या होऊ नये म्हणून न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला आदेश द्यावे असे, याचिकेत म्हटले होते.

महाराष्ट्रातील वकील घनश्याम उपाध्याय यांनी काल (गुरुवार) रात्री उशिरा जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. जर विकास दुबेला सुरक्षा दिली नाही तर त्याच्या इतर साथीरादारांप्रमाणे पोलिसांच्या चकमकीत हत्या होऊ शकते, असे याचिकेत म्हटले होते. उपाध्याय यांनी अनेक माध्यमांचा हवालाही दिला होता. पोलीस चकमक टाळण्यासाठी विकास दुबेने स्वत: ला अटक करून घेतले होते.

विकास दुबेच्या पाच साथीरादारांनाही पोलिसांनी चकमकीत ठार मारले, याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली होती. या सोबत विकास दुबेचे घर, शॉपिंग मॉल, महागड्या गाड्या, इमारती नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

विकास दुबे हा कुख्यात गुंड होता. त्याच्यावर 60पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. कानपुरमधील बिकारू गावात त्याने आठ पोलिसांना ठार केले होते. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. मध्यप्रदेशातील उज्जैन येथून त्याला अटक करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.