ETV Bharat / bharat

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; एका जवानाला वीरमरण

author img

By

Published : Jun 11, 2020, 11:46 AM IST

पाकिस्तानी सैनिकांनी पुंछ आणि राजौरी जिल्ह्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार केला असून एक भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. तर एक नागरिकही जखमी झाला.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार

श्रीनगर - पाकिस्तानी सैनिकांनी पुंछ आणि राजौरी जिल्ह्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. तर एक नागरिकही जखमी झाला. आज सकाळपासूनच पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हुतात्मा जवानाचा मृतदेह वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकतांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. पाकिस्तानने बुधवारी रात्री उशिरा नौशेरा आणि बालाकोट क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील गावांवर गोळीबार आणि तोफांचा मारा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांनी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. जोरदार गोळीबार झाल्यामुळे सीमावासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी अधिकांऱ्यांना अधिक बंकर उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने अॅलर्ट जारी केला असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

श्रीनगर - पाकिस्तानी सैनिकांनी पुंछ आणि राजौरी जिल्ह्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. तर एक नागरिकही जखमी झाला. आज सकाळपासूनच पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हुतात्मा जवानाचा मृतदेह वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकतांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. पाकिस्तानने बुधवारी रात्री उशिरा नौशेरा आणि बालाकोट क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील गावांवर गोळीबार आणि तोफांचा मारा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांनी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. जोरदार गोळीबार झाल्यामुळे सीमावासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी अधिकांऱ्यांना अधिक बंकर उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने अॅलर्ट जारी केला असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.