ETV Bharat / bharat

Agneepath Scheme:'अग्निपथ'वरून देशभर अग्नितांडव! वाचा, कोणत्या राज्यात काय घडले

नरेंद्र मोदी सरकारने लष्करात पुनर्स्थापनेसाठी 'अग्निपथ' योजना जाहीर केली आहे. ही योजना जाही झाल्यानंतर या योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेशात दिसून येत आहे. आंदोलनाला देशभर हिंसक वळन लागले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यात इंटरनेट २४ तासांसाठी बंद करण्यात आले आहे. दुसरीकडे, काही संस्थांनी राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

author img

By

Published : Jun 17, 2022, 9:06 AM IST

Updated : Jun 17, 2022, 11:10 PM IST

'अग्निपथ'वरून देशभर अग्नितांडव!
'अग्निपथ'वरून देशभर अग्नितांडव!

नवी दिल्ली - अग्निपथ योजनेच्या विरोधाची आग उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १७२ जणांना अटक केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मीडिया फुटेजच्या आधारे आंदोलकांची ओळख पटवली जात आहे. रस्त्यावरील हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,
विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,

बिहार - अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही बिहारमधील बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावर आंदोलन ( Protest In Bihar) केले. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य मार्ग ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या अनेक तास अडकून पडल्या होत्या. अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून ( Protest against Against Agnipath Scheme In Bihar ) केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बिहारमध्ये - पाटणा, सासराम, जमुई, सीतामढी, रक्सौल, समस्तीपूर, हाजीपूर, बेतिया, आरा, छप्रा यासह राज्यातील सर्व भाग जाळण्यात आला. कुठे सैन्यभरतीच्या नव्या योजनेच्या विरोधकांनी ट्रेन पेटवली, तर कुठे रस्त्यावर हिंसक निदर्शने झाली. इतकेच नाही तर यादरम्यान बिहार पोलीस फारसे सक्रिय दिसले नाहीत. नितीशकुमार आणि त्यांच्या सरकारच्या या वृत्तीमुळे ते अग्निपथवर भाजपची परीक्षा घेत आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने

तलंगणा - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दामोदर राकेश (वय २३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. कुमारस्वामी आणि पूलम्मा असे राकेशच्या आईव-डीलांचे नाव असून तो वारंगल जिल्ह्यातील खानापूरम मंडलातील डबीर पेटा गावातील रहीवाशी होता.

उत्तर प्रदेश - अग्निपथ प्रकरणात कानपूरला हादरवून सोडण्याचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये बॉयकॉट टीओडी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काही तरुण रमादेवी चौकी जाळण्याचा कट रचत होते. यासोबतच नौबस्ता हमीरपूर रोडवर जाम लावण्याचाही बेत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने अर्धा डझन मुलांची कोठडीत चौकशी सुरू केली आहे.

तीन रेल्वे डबे जाळले

अग्निपथ योजनेला विरोध करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर यूपीचे योगी सरकार गंभीर झाले आहे. दंगलखोरांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये आतापर्यंत नऊ तरुणांना अटक करण्यात आली आहे. 10 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर खुनाचा प्रयत्न, दंगल यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांवर एकूण 13 कलमे लावण्यात आली आहेत.

दिल्ली - उत्तर-पूर्व दिल्लीतील खजुरी भागातील वजीराबाद रोडवर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ अनेक तरुणांनी बसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्लेखोरांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,
विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,

ओडिशा - केंद्र सरकारच्या नव्या 'अग्निपथ योजने'विरोधातील निदर्शने शुक्रवारी ओडिशात पोहोचली. सशस्त्र दलात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी कटकमधील मुख्य रिंगरोड रोखून धरला. तसेच, सिल्व्हर सिटीच्या कॅन्टोन्मेंट परिसरात होर्डिंग्ज फाडले. आंदोलकांपैकी अनेक तरुणांनी दावा केला की त्यांनी गेल्या वर्षी सैन्यात भरती होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आम्ही सामायिक प्रवेश परीक्षेची (CEE) वाट पाहत आहोत.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी सांगितले की, भारतीय किसान युनियनचे अधिकारी आणि कामगार 30 जून रोजी देशभरात अग्निपथ भरती योजनेला विरोध करणार आहेत. या संदर्भात जिल्हास्तरावर भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देणार आहेत.

लखीसरायमध्ये रेल्वे जाळली - दुसरीकडे लखीसरायमध्ये आंदोलक ( Bihar students protest ) विद्यार्थ्यांनी विक्रमशिला एक्स्प्रेसच्या तीन बोगी जाळल्या आहेत. 5 बोगींच्या काचा फोडण्यात आल्या. पत्रकारांना व्हिडिओ बनवण्यापासून रोखले जात आहे. प्रवाशाचे मोबाईलही हिसकावून घेतले. रेल्वे ट्रॅकवर जाळपोळ झाली आहे. आंदोलकांनी संपूर्ण रेल्वे रिकामी करून प्रवाशांचे सामानही लुटले. हाजीपूरमध्येही आंदोलक रेल्वे स्थानकावर निदर्शने करत आहेत. रेल्वे स्टेशनची तोडफोड केली जात आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन
विद्यार्थ्यांचे आंदोलन

दिल्ली-कोलकाता रेल मेन रोड जाम- अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ बक्सरच्या डुमराव रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी दिल्ली-कोलकाता मुख्य रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प केला आहे. त्यामुळे अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचवेळी रेल्वे रुळावर उतरलेले विद्यार्थी सैन्यभरतीचा हा नवा नियम मागे घ्या, असे म्हणत भारत मातेचा जयघोष करत आहेत.

नवीन नियम हटवण्याची मागणी - आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, नेते असो की आमदार या सर्वांना ५ वर्षांचा कालावधी मिळतो. 4 वर्षात आमचे काय होणार? आमच्याकडे पेन्शनचीही सोय नाही. 4 वर्षांनी आम्ही रस्त्यावर येऊ. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी संवर्गात प्रवेश मिळाला तरी चालेल. उरलेल्या 75 टक्क्यांचे काय होईल? हा कुठे न्याय? त्याचवेळी या योजनेमुळे विद्यार्थी नाराज आहेत. आम्हाला नोकरीची हमी मिळत नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नवीन नियम हटविण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

किती गाड्या प्रभावित - बिहारमध्ये २० हून अधिक ठिकाणी गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. 79 गाड्या रद्द, 40 शॉर्ट टर्मिनेटेड, 3 गाड्या बदलल्या. त्याचवेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १२४ गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. आरक्षित किंवा अनारक्षित दोन्ही गाड्या रद्द करण्यासाठी कोणतेही शुल्क कापले जाणार नाही. प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. आंदोलन संपल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

किती स्टेशन्सची तोडफोड झाली - छपरा स्टेशन, समस्तीपूर स्टेशन, आरा स्टेशन, वैशाली स्टेशन, बेतिया स्टेशन, दानापूर स्टेशन, वैशाली स्टेशन, मुझफ्फरपूर स्टेशन, दानापूर स्टेशन, खगरिया स्टेशन या रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. संतप्त तरुणांनी काहीही न पाहता मोठी तोडफोड केली.

किती अटक आणि गुन्हे दाखल - आराहमध्ये १६ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. तसेच ६५५ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुझफ्फरपूरमध्ये पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीचार्ज केला. 5 जणांना अटक करण्यात आली. सीतामढीत २ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

कोणत्या नेत्यावर हल्ला झाला - भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या बेतिया येथील घरावर हल्ला करण्यात आला. बेतिया येथील उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावरही तरुणांनी हल्ला केला. बेतियाचे लॉरियाचे आमदार विनय बिहारी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. सरकारी योजनेवर येवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण नाराज झाल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.

हेल्पलाइन क्रमांक जारी - ECR झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या झोनमधील रेल्वेचे मुख्य विभाग धनबाद, दानापूर, मुघलसराय, समस्तीपूर, सोनपूर इ. हे मार्ग रेल्वेच्या या झोनशी जोडलेल्या सर्व भागांना आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांना प्रभावित करतात. अशा परिस्थितीत सुमारे 105 जिल्ह्यांतील लोकांना या हेल्पलाइन क्रमांकाची मदत मिळणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली नव्या नियमाने भरतीची घोषणा- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारपासून निदर्शनास सुरुवात झाली. आज तिसऱ्या दिवशीही अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळ अडविले आहेत. 14 जून रोजी केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी अग्निपथ भरती योजना सुरू केली. ज्या अंतर्गत तरुणांना संरक्षण दलात फक्त 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या योजनेमुळे संतप्त विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, या योजनेमुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल.

पुरुष आणि महिला दोघांचीही भरती होणार- अग्निपथ योजनेअंतर्गत पुरुष आणि महिला दोघांनाही अग्निवीर बनण्याची संधी दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. या सेवेत सामील होण्यासाठी 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण पात्र असणार आहे. भरतीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असणार आहेत 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले तरुण अग्निवीर होऊ शकतात. अग्निपथ योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे ४५ हजार तरुणांची सैन्यात भरती केली जाणार आहे.

असा मिळेल पगार - अग्निपथ योजनेत पहिल्या वर्षी भारत सरकारकडून दरमहा 21 हजार रुपये पगार म्हणून दिले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी दरमहा 23 हजार 100 रुपये आणि तिसऱ्या महिन्यात 25 हजार 580 रुपये आणि चौथ्या वर्षी 28 हजार रुपये पगारवाढ करून त्या तरुणांना सेवानिवृत्त केले जाणार आहे. मात्र, या योजनेबाबत बिहारमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.

हेही वाचा-अग्निपथ योजनेतील जवानांचे 4 वर्षानंतर काय, केंद्रासह विविध राज्यांची योजनांची खैरात

हेही वाचा-Rahul Gandhi: ईडी'कडून राहुल गांधींचा चौकशीच्या मुदतीचा अर्ज मंजूर; आता 20 जुनला होणार चौकशी

हेही वाचा-अग्निपथ योजनेसाठी सैन्य भरती प्रक्रिया पूर्वीसारखीच असेल -लेफ्टनंट जनरल

नवी दिल्ली - अग्निपथ योजनेच्या विरोधाची आग उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १७२ जणांना अटक केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मीडिया फुटेजच्या आधारे आंदोलकांची ओळख पटवली जात आहे. रस्त्यावरील हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,
विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,

बिहार - अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही बिहारमधील बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावर आंदोलन ( Protest In Bihar) केले. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य मार्ग ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या अनेक तास अडकून पडल्या होत्या. अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून ( Protest against Against Agnipath Scheme In Bihar ) केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बिहारमध्ये - पाटणा, सासराम, जमुई, सीतामढी, रक्सौल, समस्तीपूर, हाजीपूर, बेतिया, आरा, छप्रा यासह राज्यातील सर्व भाग जाळण्यात आला. कुठे सैन्यभरतीच्या नव्या योजनेच्या विरोधकांनी ट्रेन पेटवली, तर कुठे रस्त्यावर हिंसक निदर्शने झाली. इतकेच नाही तर यादरम्यान बिहार पोलीस फारसे सक्रिय दिसले नाहीत. नितीशकुमार आणि त्यांच्या सरकारच्या या वृत्तीमुळे ते अग्निपथवर भाजपची परीक्षा घेत आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने

तलंगणा - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दामोदर राकेश (वय २३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. कुमारस्वामी आणि पूलम्मा असे राकेशच्या आईव-डीलांचे नाव असून तो वारंगल जिल्ह्यातील खानापूरम मंडलातील डबीर पेटा गावातील रहीवाशी होता.

उत्तर प्रदेश - अग्निपथ प्रकरणात कानपूरला हादरवून सोडण्याचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये बॉयकॉट टीओडी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काही तरुण रमादेवी चौकी जाळण्याचा कट रचत होते. यासोबतच नौबस्ता हमीरपूर रोडवर जाम लावण्याचाही बेत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने अर्धा डझन मुलांची कोठडीत चौकशी सुरू केली आहे.

तीन रेल्वे डबे जाळले

अग्निपथ योजनेला विरोध करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर यूपीचे योगी सरकार गंभीर झाले आहे. दंगलखोरांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये आतापर्यंत नऊ तरुणांना अटक करण्यात आली आहे. 10 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर खुनाचा प्रयत्न, दंगल यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांवर एकूण 13 कलमे लावण्यात आली आहेत.

दिल्ली - उत्तर-पूर्व दिल्लीतील खजुरी भागातील वजीराबाद रोडवर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ अनेक तरुणांनी बसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्लेखोरांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,
विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने,

ओडिशा - केंद्र सरकारच्या नव्या 'अग्निपथ योजने'विरोधातील निदर्शने शुक्रवारी ओडिशात पोहोचली. सशस्त्र दलात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी कटकमधील मुख्य रिंगरोड रोखून धरला. तसेच, सिल्व्हर सिटीच्या कॅन्टोन्मेंट परिसरात होर्डिंग्ज फाडले. आंदोलकांपैकी अनेक तरुणांनी दावा केला की त्यांनी गेल्या वर्षी सैन्यात भरती होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आम्ही सामायिक प्रवेश परीक्षेची (CEE) वाट पाहत आहोत.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी सांगितले की, भारतीय किसान युनियनचे अधिकारी आणि कामगार 30 जून रोजी देशभरात अग्निपथ भरती योजनेला विरोध करणार आहेत. या संदर्भात जिल्हास्तरावर भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देणार आहेत.

लखीसरायमध्ये रेल्वे जाळली - दुसरीकडे लखीसरायमध्ये आंदोलक ( Bihar students protest ) विद्यार्थ्यांनी विक्रमशिला एक्स्प्रेसच्या तीन बोगी जाळल्या आहेत. 5 बोगींच्या काचा फोडण्यात आल्या. पत्रकारांना व्हिडिओ बनवण्यापासून रोखले जात आहे. प्रवाशाचे मोबाईलही हिसकावून घेतले. रेल्वे ट्रॅकवर जाळपोळ झाली आहे. आंदोलकांनी संपूर्ण रेल्वे रिकामी करून प्रवाशांचे सामानही लुटले. हाजीपूरमध्येही आंदोलक रेल्वे स्थानकावर निदर्शने करत आहेत. रेल्वे स्टेशनची तोडफोड केली जात आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन
विद्यार्थ्यांचे आंदोलन

दिल्ली-कोलकाता रेल मेन रोड जाम- अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ बक्सरच्या डुमराव रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी दिल्ली-कोलकाता मुख्य रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प केला आहे. त्यामुळे अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचवेळी रेल्वे रुळावर उतरलेले विद्यार्थी सैन्यभरतीचा हा नवा नियम मागे घ्या, असे म्हणत भारत मातेचा जयघोष करत आहेत.

नवीन नियम हटवण्याची मागणी - आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, नेते असो की आमदार या सर्वांना ५ वर्षांचा कालावधी मिळतो. 4 वर्षात आमचे काय होणार? आमच्याकडे पेन्शनचीही सोय नाही. 4 वर्षांनी आम्ही रस्त्यावर येऊ. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी संवर्गात प्रवेश मिळाला तरी चालेल. उरलेल्या 75 टक्क्यांचे काय होईल? हा कुठे न्याय? त्याचवेळी या योजनेमुळे विद्यार्थी नाराज आहेत. आम्हाला नोकरीची हमी मिळत नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नवीन नियम हटविण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

किती गाड्या प्रभावित - बिहारमध्ये २० हून अधिक ठिकाणी गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. 79 गाड्या रद्द, 40 शॉर्ट टर्मिनेटेड, 3 गाड्या बदलल्या. त्याचवेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १२४ गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. आरक्षित किंवा अनारक्षित दोन्ही गाड्या रद्द करण्यासाठी कोणतेही शुल्क कापले जाणार नाही. प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. आंदोलन संपल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

किती स्टेशन्सची तोडफोड झाली - छपरा स्टेशन, समस्तीपूर स्टेशन, आरा स्टेशन, वैशाली स्टेशन, बेतिया स्टेशन, दानापूर स्टेशन, वैशाली स्टेशन, मुझफ्फरपूर स्टेशन, दानापूर स्टेशन, खगरिया स्टेशन या रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. संतप्त तरुणांनी काहीही न पाहता मोठी तोडफोड केली.

किती अटक आणि गुन्हे दाखल - आराहमध्ये १६ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. तसेच ६५५ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुझफ्फरपूरमध्ये पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीचार्ज केला. 5 जणांना अटक करण्यात आली. सीतामढीत २ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

कोणत्या नेत्यावर हल्ला झाला - भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या बेतिया येथील घरावर हल्ला करण्यात आला. बेतिया येथील उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावरही तरुणांनी हल्ला केला. बेतियाचे लॉरियाचे आमदार विनय बिहारी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. सरकारी योजनेवर येवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण नाराज झाल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.

हेल्पलाइन क्रमांक जारी - ECR झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या झोनमधील रेल्वेचे मुख्य विभाग धनबाद, दानापूर, मुघलसराय, समस्तीपूर, सोनपूर इ. हे मार्ग रेल्वेच्या या झोनशी जोडलेल्या सर्व भागांना आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांना प्रभावित करतात. अशा परिस्थितीत सुमारे 105 जिल्ह्यांतील लोकांना या हेल्पलाइन क्रमांकाची मदत मिळणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली नव्या नियमाने भरतीची घोषणा- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारपासून निदर्शनास सुरुवात झाली. आज तिसऱ्या दिवशीही अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळ अडविले आहेत. 14 जून रोजी केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्यासाठी अग्निपथ भरती योजना सुरू केली. ज्या अंतर्गत तरुणांना संरक्षण दलात फक्त 4 वर्षे सेवा करावी लागणार आहे. पगार आणि पेन्शनचे बजेट कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या योजनेमुळे संतप्त विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, या योजनेमुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल.

पुरुष आणि महिला दोघांचीही भरती होणार- अग्निपथ योजनेअंतर्गत पुरुष आणि महिला दोघांनाही अग्निवीर बनण्याची संधी दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. या सेवेत सामील होण्यासाठी 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण पात्र असणार आहे. भरतीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असणार आहेत 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले तरुण अग्निवीर होऊ शकतात. अग्निपथ योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे ४५ हजार तरुणांची सैन्यात भरती केली जाणार आहे.

असा मिळेल पगार - अग्निपथ योजनेत पहिल्या वर्षी भारत सरकारकडून दरमहा 21 हजार रुपये पगार म्हणून दिले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी दरमहा 23 हजार 100 रुपये आणि तिसऱ्या महिन्यात 25 हजार 580 रुपये आणि चौथ्या वर्षी 28 हजार रुपये पगारवाढ करून त्या तरुणांना सेवानिवृत्त केले जाणार आहे. मात्र, या योजनेबाबत बिहारमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.

हेही वाचा-अग्निपथ योजनेतील जवानांचे 4 वर्षानंतर काय, केंद्रासह विविध राज्यांची योजनांची खैरात

हेही वाचा-Rahul Gandhi: ईडी'कडून राहुल गांधींचा चौकशीच्या मुदतीचा अर्ज मंजूर; आता 20 जुनला होणार चौकशी

हेही वाचा-अग्निपथ योजनेसाठी सैन्य भरती प्रक्रिया पूर्वीसारखीच असेल -लेफ्टनंट जनरल

Last Updated : Jun 17, 2022, 11:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.