ETV Bharat / bharat

Amit Shah Interview : अदानी वादावर अमित शाहंचे मोठे वक्तव्य ; म्हणाले, लपवण्यासारखे काहीच नाही

author img

By

Published : Feb 14, 2023, 10:24 AM IST

Updated : Feb 14, 2023, 10:49 AM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देशातील चालू घडामोडींवर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, पीएफआय देशात धर्मांधतेला चालना देत असे. आम्ही पीएफआयवर यशस्वीपणे बंदी आणली. तसेच बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी बंडखोरी संपली आहे.

Amit Shah
अमित शाह
अमित शाह

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी आज हिंडेनबर्ग-अदानी वाद, 2023 मधील विधानसभेच्या निवडणुका, पीएफआय बंदी आणि लोकसभा निवडणुका 2024 बाबत विधान केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सर्व विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. अदानी वादावर ते म्हणाले की, सरकारकडे लपवण्यासारखे काहीच नाही.

अदानी वाद : अदानीशी संबंधित मुद्द्यावर म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याने या विषयावर मी यावेळी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण भाजपसाठी यामध्ये लपवण्यासारखे काहीही नाही. संसदेच्या अर्थसंकल्पावरही ते भरभरून बोलले. संसदेतील अनावश्यक टिप्पण्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यावर अमित शाह म्हणाले, 'संसदेचे कामकाज निष्कासित वाक्यांनी भरलेले आहे. संसदेत संसदीय भाषेत चर्चा व्हावी. अमित शाह 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर म्हणाले, '2024 मध्ये कोणतीही स्पर्धा नाही, देश एकासुराने मोदींच्या पाठीशी आहे. जनतेने विरोधकांना लोकसभेत विरोधी पक्षाचे पदही मिळू दिले नाही.

पीएफआयवर यशस्वीपणे बंदी आणली : 2023 च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीवर ते म्हणाले, 'आम्ही त्रिपुरातील परिस्थिती बदलण्यासाठी 'चलो पलटाई'चा नारा दिला होता आणि आज आम्ही परिस्थिती बदलली आहे. आम्ही राज्याचे बजेट चांगले केले आहे. आम्ही हिंसाचार संपवला आहे. अमली पदार्थांच्या व्यापारावर कडक कारवाई केली आहे. देशातील पीएफआय बंदीबाबत ते म्हणाले, 'पीएफआय कॅडरवर अनेक आरोप होते. त्यांना वाचवण्याचे काम काँग्रेसने केले होते, ज्याला कोर्टाने थांबवले. आम्ही पीएफआयवर यशस्वीपणे बंदी आणली. पीएफआय ही संघटना देशात धर्मांधता वाढवत होती. दहशतवादाला एक प्रकारे चालना देण्याचे काम ते करत होते.

बिहार-झारखंडमधील नक्षलवाद संपुष्टात : अमित शाह म्हणाले, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. मला खात्री आहे की आम्ही छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ. जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकारची आकडेवारी उत्तम स्थितीत आहे. गृहमंत्री पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी ईशान्य आणि उर्वरित भारतातील अंतर संपवले आहे. आज देशाच्या इतर भागांतील लोकांच्या मनात ईशान्येतील लोकांच्या प्रती आदर आहे. इतर राज्यांतील लोक ईशान्येकडे गेले तर त्यांचाही आदर केला जातो.

जगात भारताचा दबदबा : शहरांच्या नामांतरावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'असे एकही शहर नाही ज्याचे जुने नाव नाही आणि ते बदलले गेले आहे. आपल्या सरकारने यावर खूप विचार करून निर्णय घेतले आहेत. प्रत्येक सरकारला हा कायदेशीर अधिकार आहे. भारताच्या परदेशी संबंधांवरही त्यांनी प्रकाश टाकला. अमित शाह म्हणाले की, 'मोदींच्या काळात भारताला G-20 चे नेतृत्व मिळाले आहे. याचे श्रेय मोदींकडे जायला हवे.

हेही वाचा : Cracks In Agra Fort : आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आमचे संगीतामुळे नुकसान, भिंती आणि छताला गेले तडे

अमित शाह

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी आज हिंडेनबर्ग-अदानी वाद, 2023 मधील विधानसभेच्या निवडणुका, पीएफआय बंदी आणि लोकसभा निवडणुका 2024 बाबत विधान केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सर्व विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. अदानी वादावर ते म्हणाले की, सरकारकडे लपवण्यासारखे काहीच नाही.

अदानी वाद : अदानीशी संबंधित मुद्द्यावर म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याने या विषयावर मी यावेळी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण भाजपसाठी यामध्ये लपवण्यासारखे काहीही नाही. संसदेच्या अर्थसंकल्पावरही ते भरभरून बोलले. संसदेतील अनावश्यक टिप्पण्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यावर अमित शाह म्हणाले, 'संसदेचे कामकाज निष्कासित वाक्यांनी भरलेले आहे. संसदेत संसदीय भाषेत चर्चा व्हावी. अमित शाह 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर म्हणाले, '2024 मध्ये कोणतीही स्पर्धा नाही, देश एकासुराने मोदींच्या पाठीशी आहे. जनतेने विरोधकांना लोकसभेत विरोधी पक्षाचे पदही मिळू दिले नाही.

पीएफआयवर यशस्वीपणे बंदी आणली : 2023 च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीवर ते म्हणाले, 'आम्ही त्रिपुरातील परिस्थिती बदलण्यासाठी 'चलो पलटाई'चा नारा दिला होता आणि आज आम्ही परिस्थिती बदलली आहे. आम्ही राज्याचे बजेट चांगले केले आहे. आम्ही हिंसाचार संपवला आहे. अमली पदार्थांच्या व्यापारावर कडक कारवाई केली आहे. देशातील पीएफआय बंदीबाबत ते म्हणाले, 'पीएफआय कॅडरवर अनेक आरोप होते. त्यांना वाचवण्याचे काम काँग्रेसने केले होते, ज्याला कोर्टाने थांबवले. आम्ही पीएफआयवर यशस्वीपणे बंदी आणली. पीएफआय ही संघटना देशात धर्मांधता वाढवत होती. दहशतवादाला एक प्रकारे चालना देण्याचे काम ते करत होते.

बिहार-झारखंडमधील नक्षलवाद संपुष्टात : अमित शाह म्हणाले, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. मला खात्री आहे की आम्ही छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ. जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकारची आकडेवारी उत्तम स्थितीत आहे. गृहमंत्री पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी ईशान्य आणि उर्वरित भारतातील अंतर संपवले आहे. आज देशाच्या इतर भागांतील लोकांच्या मनात ईशान्येतील लोकांच्या प्रती आदर आहे. इतर राज्यांतील लोक ईशान्येकडे गेले तर त्यांचाही आदर केला जातो.

जगात भारताचा दबदबा : शहरांच्या नामांतरावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'असे एकही शहर नाही ज्याचे जुने नाव नाही आणि ते बदलले गेले आहे. आपल्या सरकारने यावर खूप विचार करून निर्णय घेतले आहेत. प्रत्येक सरकारला हा कायदेशीर अधिकार आहे. भारताच्या परदेशी संबंधांवरही त्यांनी प्रकाश टाकला. अमित शाह म्हणाले की, 'मोदींच्या काळात भारताला G-20 चे नेतृत्व मिळाले आहे. याचे श्रेय मोदींकडे जायला हवे.

हेही वाचा : Cracks In Agra Fort : आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आमचे संगीतामुळे नुकसान, भिंती आणि छताला गेले तडे

Last Updated : Feb 14, 2023, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.