नवी दिल्ली :अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2025 चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक विशेष घोषणा केल्या. अणुऊर्जेच्या क्षेत्रातबाबतही त्यांनी मोठी घोषणा केलीय. लहान मॉड्यूलर रिॲक्टर्सच्या संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी 20,000 कोटी रुपयांच्या बजेटसह अणुऊर्जा अभियानाची घोषणा केलीय. हे भारत सरकारने सुरू केलेले एक नवीन अभियान आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, या मोहिमेअंतर्गत, 2047 पर्यंत किमान 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्माण केली जाईल. तसंच 2033 पर्यंत किमान पाच स्वदेशी लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या कार्यान्वित केल्या जातील.
अणुऊर्जेच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा प्रवेश
संसद भवनात 2025 चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अणुऊर्जेच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश केला जाईल. लहान मॉड्यूलर रिॲक्टर्सवर (एसएमआर) विशेष लक्ष दिलं जाईल. गेल्या वर्षी सरकारनं 18 नवीन अणुभट्ट्या जोडण्याची घोषणा केली होती, ज्यामुळं 13,800 मेगावॅट वीज निर्माण होईल.
किती असेल ऊर्जा क्षमता?