महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी जप्त केली 1 कोटी 32 लाख रुपयांची रोकड, 5 जण ताब्यात

पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मुंबईच्या भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

Police seized Rs 1 crore 32 lakh cash during blockade at Bhuleshwar in Mumbai, 5 people detained
भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. अशातच काही गोष्टींवर निर्बंध येतात. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे रोख रक्कम बाळगण्याबाबतचा आहे. निवडणुकीच्या काळात मते मिळविण्यासाठी मतदारांना रोख रक्कम दिली जात असल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. या बाबींना आळा घालण्यासाठी आयकर विभाग, मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे गस्त घालत असतात. तसेच छापेमारी करत असतात. अशाच एका छापेमारीत मुंबईतील भुलेश्वर येथे आयकर विभागाला करोडो रुपयांची रोख रक्कम हाती लागली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? : या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तसंच रोख रकमेची तस्करी होऊ नये, यासाठी रात्रीची गस्त, नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. याच नाकाबंदी दरम्यान पोलिसांना पाच जण मोठ्या बॅगा घेऊन जाताना आढळले. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी या पाचही जणांची तपासणी केली. या तपासणी वेळी पोलिसांना त्यांच्या बॅगेमध्ये एक कोटी 32 लाख रुपयांची रोकड असल्याचं निदर्शनास आलं. या रोख रकमेसह पोलिसांनी या पाचही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याबाबतची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती आयकर विभाग आणि पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात 5 कोटी जप्त : मुंबईतील भुलेश्वर प्रमाणेच या आधी पुण्यातील खेड शिवापूरमधून 5 कोटी तर हडपसरमधून 22 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांची असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी पैसे सापडत असल्यानं निवडणूक आयोग काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

हेही वाचा -

  1. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 18.75 लाख किमतीचा मद्यसाठा जप्त
  2. पाच कोटी जप्त प्रकरणावरुन राजकारण तापलं; पोलीस अधीक्षक म्हणाले...
  3. विधानसभा निवडणुकीची इन्स्टॉलमेंट 25-25 कोटी; एक गाडी पकडली, चार गाड्या कुठं आहेत, रोहित पवारांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details