महाराष्ट्र

maharashtra

Farooq Abdullah : इंडिया आघाडीचे सरकार येताच EVM हटवणार - फारूक अब्दुल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 10:51 PM IST

Updated : Mar 17, 2024, 11:03 PM IST

Farooq Abdullah : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर पासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप मुंबईतील चैत्यभूमी येथे झाला. इंडिया आघाडीचे सरकार येताच EVM हटवणार असल्याचं इंडिया आघाडीच्या सभेतून काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Farooq Abdullah
फारूक अब्दुल्ला

फारूक अब्दुल्ला यांचे भाषण

मुंबईFarooq Abdullah :देशासाठी स्वातंत्र्य सेनानी देणाऱ्या भूमीला नमन करतो असं म्हणत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी सभेला संबोधित केले. आपला देशात सर्वधर्म समाजाचे लोक राहत आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी तसेच मणिपूर ते मुंबई या मार्गे काढली. हा आपला भारत आहे. भारताला, लोकशाही वाचवायची आहे. तसेच ईव्हीएम मशीन चोर आहे. तसेच जेव्हा आपण ईव्हीएमवर मतदान करणार त्यावेळी आपण मत नेमकं कोणाला टाकले ते तपासून पहावे.

निवडणूक आयोगाला स्वतंत्र करणार :देशात इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर EVM पासून मुक्ती करू. त्यासोबतच निवडणूक आयोगाला देखील स्वतंत्र करणार असल्याचे ते म्हणाले. इंडिया आघाडी मजबूत ठेवून देशाला वाचवायचे आहे. राहुल गांधी दिल्लीत बसून भारत बघत नाही तर गावात जाऊन पाहतात. मोदी सरकारने इंधन दर कमी केले. त्याला कारण फक्त डोळ्या समोर असलेल्या निवडणुका आहेत, असं फारूक अब्दुल्ला म्हणाले.



मोदी खोटं बोलण्याची फॅक्ट्री - तेजस्वी यादव :भारत जोडो न्याय यात्रा काढल्याबद्दल तेजस्वी यादव यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांना धन्यवाद दिले. एका बाजूला नफरत पसरविली जातेय. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांना केंद्रीय एजन्सी मार्फत पाडले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी नफरत संपविण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून काम केले. मोहब्बत की दुकान सुरू केले. लोकांना घाबरवले जातेय. आमचं लक्ष मोदींना हरविणे नाही तर त्यांच्या विचारधारा हरविण्याचे काम करायचे. आम्ही मोदींच्या धमक्यांना घाबरणार नाही. सत्तेत असो किंवा नसो आपल्याला लोकात जाऊन काम करावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन लोटस झाले. त्यानंतर आता सत्तेत असलेले कोणी लोक लीडर नाही डीलर दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत बिहार राज्यात धक्का देणारा निकाल देणार, असं तेजस्वी यादव म्हणाले.


17 महिने मी उपमुख्यमंत्री राहिलो :5 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आपण किती दिली असा सवाल मोदी यांना विचारला आहे.भाजपा भगाव देश बचाव असा नारा देखील त्यांनी यावेळी दिला


राजाचा जीव ईव्हीएममध्ये :यावेळी दिल्ली सरकारमधील सौरभ भारद्वाज म्हणाले की, निवडणूक जाहीर झाली. आम्ही सर्व सोबत राहून सामोरे जाणार आहोत. तुरुंगात जाण्यासाठी आम्ही घाबरत नाही. आपल्या देशाच्या राजाचा जीव ईव्हीएममध्ये असल्याचं म्हणत भारद्वाज यांनी मोदींना टोला लगावला आहे. तसेच सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर पडावे, असंही आवाहन केलं.

हेही वाचा :

  1. Lok Sabha Elections : "शरद पवारांचा पराभव एवढं एकच ध्येय...", नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? वाचा सविस्तर
  2. Devendra Fadnavis : अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो - देवेंद्र फडणवीस
  3. Rahul Gandhi : देशाच्या राजाचा आत्मा EVM, ईडी, सीबीआयमध्ये, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
Last Updated : Mar 17, 2024, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details