महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

जागावाटपाचा घोळ असताना संजय राऊत झाले मवाळ; म्हणाले,"देवेंद्र फडणवीस यांच्याशी..."

"देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही," असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shivsena UBT Leader Sanjay Raut says Devendra Fadnavis is not our enemy he is our political opponent
देवेंद्र फडणवीस, संजय राऊत (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 5 hours ago

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंय तापलंय. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं बघायला मिळतंय. मात्र, असं असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंय. “देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही", असं संजय राऊत म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : संजय राऊत यांनी आज (27 ऑक्टोबर) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राजकीय नेत्यांवर करण्यात येणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांविषयी विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले की, "राजकारणात विचारांची लढाई विचारानं व्हावी. कोणीही वैयक्तिक दुश्मनी करू नये. महाराष्ट्रात हा वारसा पूर्वीपासून सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या हातात सत्ता गेल्यापासून कौटुंबिक दुश्मनी वाढली. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन’, हे वक्तव्य फक्त राजकारणापुरतंच मर्यादित होतं. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत", असंही राऊत म्हणाले.

रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या स्वप्नात :मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एक येथे गर्दीत प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. यावरुन केंद्र सरकारवर टीका करत राऊत म्हणाले, "देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्याची धुरा अश्विनी वैष्णव यांच्याकडं देण्यात आली. आतापर्यंत 25 पेक्षा जास्त रेल्वे अपघात झालेत. यामध्ये अनेकांनी जीव गमावला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हवेमध्ये बस चालवण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, वास्तविक जमिनीवरची हकीगत काय आहे? हे आजच्या चेंगराचेंगरीमधून दिसून येतं. सर्वाधिक प्रवासी हे मुंबईत आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या बाबतीत सुविधा करायला कोणी तयार नाही. रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या स्वप्नात आहेत. आपले प्रवासी इथं चेंगरुन मरत आहेत. रेल्वे मंत्र्यांनी आतापर्यंत रेल्वेसाठी काय केलं? हे त्यांनी सांगावं."

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्रिपदासाठीच उद्धव ठाकरेंनी दिल्लीवाऱ्या केल्याची चर्चा; आता संजय राऊत म्हणतात...
  2. शिवसेना सेंचुरी मारणार अन् त्यासाठी दोन षटकार ठोकणार; संजय राऊतांचा विश्वास
  3. रावणालाही धनुष्य पेलता आलं नाही; संजय राऊत असं का म्हणाले? जाणून घ्या...
Last Updated : 5 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details