महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईव्हीएम विरोधात आंदोलन पेटणार? शरद पवारांनंतर आता राहुल गांधीही मारकडवाडीला जाणार - ANTI EVM PROTEST

सत्ताधारी महायुतीनं ईव्हीएममध्ये छेडछाड करून जनादेशाची 'चोरी' केल्याचा महाविकास आघाडीनं आरोप केला. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

Congress Leader Rahul Gandhi likely to join Anti EVM protest of MVA in maharashtra today dec 9
राहुल गांधी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 9:01 AM IST

नवी दिल्ली : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून (MVA) ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर रविवारी (8 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार मारकडवाडीत आले होते. पवारांच्या पाठोपाठ आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आज (9 डिसेंबर) मारकडवाडीत मविआच्या ईव्हीएमविरोधातील आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव सध्या प्रसिद्धीच्या झोतात आलंय. इथून ईव्हीएमद्वारे निवडणूक जिंकलेले राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) स्थानिक आमदार उत्तमराव जानकर यांनी राजीनामा देऊन पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळं हा मुद्दा अजूनच पेटून उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल गांधी काढणार लॉंग मार्च? : यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणसिंग सप्रा म्हणाले की, "महाविकास आघाडीकडून राज्यभरात ईव्हीएमच्या विरोधात तीव्र निषेध केला जाईल. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना 9 डिसेंबर रोजी मारकवाडी येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय." राहुल गांधी आज गावात ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याची शक्यता आहे.

नाना पटोले काय म्हणाले? : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की, “मतदार या निवडणूक प्रक्रियेबाबत साशंक आहेत. त्यांना वाटतं की त्यांनी एका पक्षाला मत दिलंय. पण तो जिंकला नाही. निकाल खरं चित्र दाखवत नाहीत. त्यामुळं भविष्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना मारकटवाडीमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी दौरा निश्चित केल्यानंतर माहिती दिली जाईल. "

काँग्रेसनं काय दिली प्रतिक्रिया-विधानसभेच्या निकालावर महाविकास आघाडीने शंका घेण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे महायुतीला मिळालेला दणदणीत विजय आहे. याविषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना एआयसीसीचे महाराष्ट्राचे प्रभारी सचिव बी.एम. संदीप म्हणाले की, " लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात लाट होती. तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांच्या बाजूनंच लागला. विधानसभा निवडणुकीच्या यशासाठी लाडकी बहीण योजना कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, एका योजनेमुळं राजकीय पक्षाला निवडणुकीत विजय मिळेल, असे मला वाटत नाही. निवडणुकीबाबत आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आणि निवडणुकीचा निकाल यात कमालीची तफावत आहे".

हेही वाचा -

  1. “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये", चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
  2. "ईव्हीएम हटाव चळवळ सुरू ठेवून न्यायालयीन लढा देणं महत्त्वाचं"- शरद पवार
  3. "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान

ABOUT THE AUTHOR

...view details