ETV Bharat / politics

राजन साळवींचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र', आज करणार शिवसेनेत प्रवेश; भास्कर जाधव म्हणाले, "नाराजी दूर...." - RAJAN SALVI JOIN SHIVSENA

शिवसेनेचे (उबाठा) निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला रामराम ठोकला असून आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

former mla rajan salvi joins Eknath Shinde Shivsena today 13 february 2025
उद्धव ठाकरे, राजन साळवी, एकनाथ शिंदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2025, 11:21 AM IST

Updated : Feb 13, 2025, 11:35 AM IST

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी अखेर शिवसेनेला (उबाठा) धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आता आज (13 फेब्रुवारी) साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोकणात ‘ऑपरेशन टायगर’? : विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election) पराभवानंतर नाराज असलेले राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, त्यांनी शिवसेनेची कास धरण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणात शिवसेनेला (उबाठा) हा मोठा धक्का मानला जात असून, यामुळं कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागलीय.

राजन साळवी यांचा राजकीय प्रवास : १९९३ -९४ च्या सुमारास राजन साळवी हे शिवसेनेत (उबाठा) सक्रिय झाले. इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे (उबाठा) नगराध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदं भूषवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेनेचे (उबाठा) तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या सहकार्यानं त्यांनी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख पदही (१९९५-२००४) मिळवलं होतं. त्यानंतर २००६ मध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र, २००९ मध्ये याच मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा ते शिवसेना (उबाठा) पक्षातून आमदार झाले. शिवसेनेत फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचं (उबाठा) उपनेता केलं होतं. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी पराभव केला होता. त्यानंतर राजन साळवी पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.

भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया : राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना (उबाठा) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. "राजन साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. तसंच साळवींचा भाजपा प्रवेश कोणी थांबवला, कोणी खोडा घातला याची मला कल्पना नाही. मात्र, आता सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं मला वाटतं," असा टोला जाधव यांनी लगावला.

हेही वाचा -

  1. शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मी काँग्रेसमध्येच..."
  2. Rajan Salvi : "माझ्या कुटुंबियांना...", एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया
  3. आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अन् मुलाला दिलासा, 21 फेब्रुवारी पर्यंत कारवाई नाही

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी अखेर शिवसेनेला (उबाठा) धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आता आज (13 फेब्रुवारी) साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोकणात ‘ऑपरेशन टायगर’? : विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election) पराभवानंतर नाराज असलेले राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, त्यांनी शिवसेनेची कास धरण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणात शिवसेनेला (उबाठा) हा मोठा धक्का मानला जात असून, यामुळं कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागलीय.

राजन साळवी यांचा राजकीय प्रवास : १९९३ -९४ च्या सुमारास राजन साळवी हे शिवसेनेत (उबाठा) सक्रिय झाले. इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे (उबाठा) नगराध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदं भूषवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेनेचे (उबाठा) तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या सहकार्यानं त्यांनी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख पदही (१९९५-२००४) मिळवलं होतं. त्यानंतर २००६ मध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र, २००९ मध्ये याच मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा ते शिवसेना (उबाठा) पक्षातून आमदार झाले. शिवसेनेत फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचं (उबाठा) उपनेता केलं होतं. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी पराभव केला होता. त्यानंतर राजन साळवी पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.

भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया : राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना (उबाठा) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. "राजन साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. तसंच साळवींचा भाजपा प्रवेश कोणी थांबवला, कोणी खोडा घातला याची मला कल्पना नाही. मात्र, आता सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं मला वाटतं," असा टोला जाधव यांनी लगावला.

हेही वाचा -

  1. शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मी काँग्रेसमध्येच..."
  2. Rajan Salvi : "माझ्या कुटुंबियांना...", एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया
  3. आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अन् मुलाला दिलासा, 21 फेब्रुवारी पर्यंत कारवाई नाही
Last Updated : Feb 13, 2025, 11:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.