ETV Bharat / technology

२०२७ मध्ये चंद्रयान ४ लाँच होणार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती - CHANDRAYAAN 4 LAUNCHED IN 2027

चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुनं गोळा करण्यासाठी चांद्रयान ४ मोहिमे 2027 मध्ये लॉंच करण्यात येणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय.

Representative photo
प्रातिनिधिक फोटो (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 6, 2025, 3:25 PM IST

हैदराबाद : २०२७ मध्ये भारताची चंद्रयान मोहीम लॉंच होणार आहे. या मोहिमेचं नाव चंद्रयान ४ असं असणार आहे. चंद्राच्या खडकांचं नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी भारत चांद्रयान ४ मोहीम सुरू करेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. चांद्रयान ४ मध्ये जड-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचं दोन वेळा वेगवेगळं प्रक्षेपण केलं जाईल. "चांद्रयान-४ मोहिमेचं उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुनं गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणं असं," सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ते म्हणाले की, गगनयान मोहीमेमध्ये भारतीय अंतराळवीरांना विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून कमी-पृथ्वीच्या कक्षेत पाठवणं आणि त्यांना सुरक्षितपणं परत आणणे समाविष्ट आहे, ही मोहिम पुढील वर्षी लाँच केलं जाईल. २०२६ मध्ये, भारत समुद्रयान मोहिम देखील लॉंच करणार आहे, ज्यामध्ये समुद्राच्या तळाशी ६,००० मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून तीन शास्त्रज्ञ समुद्रतळाचा शोध घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात समुद्रयान मोहिमेवर प्रकाश टाकलाय. समुद्राच्या प्रचंड संसाधनांचा शोध घेण्यावर देखील मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रकाश टाकलाय. ज्यामध्ये महत्त्वाची खनिजे, दुर्मिळ धातू आणि न सापडलेलं सागरी जैवविविधता यांचा समावेश आहे. हे संसाधनं सर्व देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी महत्त्वाचं आहेत.

गगनयान प्रकल्पातील 'व्योमित्र' या रोबोटला घेऊन जाणारी पहिली नॉन-क्रू मोहीम देखील या वर्षी होईल. सिंह म्हणाले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ची स्थापना १९६९ मध्ये झाली असली तरी, १९९३ मध्ये पहिलं लाँच पॅड स्थापित करण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला. दुसरा लाँच पॅड २००४ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. गेल्या १० वर्षांत, भारताच्या अंतराळ क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या दोन्ही बाबतीत अभूतपूर्व विस्तार झाला आहे, असं ते म्हणाले.

"आम्ही आता प्रथमच जड रॉकेटसाठी तिसरं प्रक्षेपण पॅड बांधत आहोत. लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यात एक नवीन प्रक्षेपण स्थळाचं काम सुरू असल्याचं" सिंह म्हणाले. भारताची अंतराळ अर्थव्यवस्थेचं मूल्य ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. हे पुढील दशकात ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे जागतिक अंतराळ महासत्ता म्हणून भारताची भूमिका आणखी मजबूत होईल.

हे वाचलंत का :

  1. NVS 02 उपग्रह थ्रस्टर्समुळं ISRO ची चिंता वाढली, इस्रोच्या नेव्हिगेशन मोहिमेला धक्का

हैदराबाद : २०२७ मध्ये भारताची चंद्रयान मोहीम लॉंच होणार आहे. या मोहिमेचं नाव चंद्रयान ४ असं असणार आहे. चंद्राच्या खडकांचं नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी भारत चांद्रयान ४ मोहीम सुरू करेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. चांद्रयान ४ मध्ये जड-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचं दोन वेळा वेगवेगळं प्रक्षेपण केलं जाईल. "चांद्रयान-४ मोहिमेचं उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुनं गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणं असं," सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ते म्हणाले की, गगनयान मोहीमेमध्ये भारतीय अंतराळवीरांना विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून कमी-पृथ्वीच्या कक्षेत पाठवणं आणि त्यांना सुरक्षितपणं परत आणणे समाविष्ट आहे, ही मोहिम पुढील वर्षी लाँच केलं जाईल. २०२६ मध्ये, भारत समुद्रयान मोहिम देखील लॉंच करणार आहे, ज्यामध्ये समुद्राच्या तळाशी ६,००० मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून तीन शास्त्रज्ञ समुद्रतळाचा शोध घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात समुद्रयान मोहिमेवर प्रकाश टाकलाय. समुद्राच्या प्रचंड संसाधनांचा शोध घेण्यावर देखील मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रकाश टाकलाय. ज्यामध्ये महत्त्वाची खनिजे, दुर्मिळ धातू आणि न सापडलेलं सागरी जैवविविधता यांचा समावेश आहे. हे संसाधनं सर्व देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी महत्त्वाचं आहेत.

गगनयान प्रकल्पातील 'व्योमित्र' या रोबोटला घेऊन जाणारी पहिली नॉन-क्रू मोहीम देखील या वर्षी होईल. सिंह म्हणाले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ची स्थापना १९६९ मध्ये झाली असली तरी, १९९३ मध्ये पहिलं लाँच पॅड स्थापित करण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला. दुसरा लाँच पॅड २००४ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. गेल्या १० वर्षांत, भारताच्या अंतराळ क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या दोन्ही बाबतीत अभूतपूर्व विस्तार झाला आहे, असं ते म्हणाले.

"आम्ही आता प्रथमच जड रॉकेटसाठी तिसरं प्रक्षेपण पॅड बांधत आहोत. लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यात एक नवीन प्रक्षेपण स्थळाचं काम सुरू असल्याचं" सिंह म्हणाले. भारताची अंतराळ अर्थव्यवस्थेचं मूल्य ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. हे पुढील दशकात ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे जागतिक अंतराळ महासत्ता म्हणून भारताची भूमिका आणखी मजबूत होईल.

हे वाचलंत का :

  1. NVS 02 उपग्रह थ्रस्टर्समुळं ISRO ची चिंता वाढली, इस्रोच्या नेव्हिगेशन मोहिमेला धक्का
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.