ETV Bharat / state

"राजकोट किल्ल्यावर मोदी शाहांचे दलाल, शिवद्रोही..."; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 3:13 PM IST

Updated : Aug 28, 2024, 4:27 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्यानं महाविकास आघाडी आक्रमक झालीय. सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिलाय. पुतळा उभारण्यात सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. "राज्य सरकार भ्रष्टाचारी असून, या सरकारनं भ्रष्टाचाराचा कळस आणि कारभाराचा कीळस गाठलाय. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारच्या विरोधात येत्या एक सप्टेंबरला महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन करण्यात येईल," अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबईत करणार आंदोलन : सिंधुदुर्गातील मालवण राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मालवण राजकोट परिसराची पाहणी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हुतात्मा चौकात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.

मोदी शाहांचे दलाल, शिवद्रोही आडवे : "सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचा कळस आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आलं. मात्र, तिथं मोदी शाहांचे दलाल आणि शिवद्रोही आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह राज्य सरकारवर प्रहार केला.

आंदोलन करणार : "माजी राज्यपाल कोष्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता. या सरकारच्या विरोधात 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनाला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावं," असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

कोकणातील जनतेला भुलवायचं काम : "कामाचं श्रेय मिळावं यासाठी महाराजांचा पुतळा अत्यंत घिसाटघाईनं सरकारकडून उभा करण्यात आला. पुतळ्याच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार या सरकारनं केलाय. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटला होता, मात्र त्यामागे केवळ भ्रष्टाचार होता, हे आता उघड झालं. लवकरात लवकर उद्घाटन करून कोकणातील जनतेला भुलवायचं काम या सरकारचं होतं," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केलाय.

हेही वाचा

  1. आठ महिन्यात पुतळा पडतोच कसा, न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांची मागणी - Shivaji Maharaj Statue Incident
  2. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आशिष शेलारांनी मागितली माफी, तर फडणवीस म्हणाले, "कोथळा बाहेर काढू" - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. "नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला", सिंधुदुर्गातील घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. "राज्य सरकार भ्रष्टाचारी असून, या सरकारनं भ्रष्टाचाराचा कळस आणि कारभाराचा कीळस गाठलाय. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारच्या विरोधात येत्या एक सप्टेंबरला महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन करण्यात येईल," अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबईत करणार आंदोलन : सिंधुदुर्गातील मालवण राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मालवण राजकोट परिसराची पाहणी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हुतात्मा चौकात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.

मोदी शाहांचे दलाल, शिवद्रोही आडवे : "सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचा कळस आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आलं. मात्र, तिथं मोदी शाहांचे दलाल आणि शिवद्रोही आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह राज्य सरकारवर प्रहार केला.

आंदोलन करणार : "माजी राज्यपाल कोष्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता. या सरकारच्या विरोधात 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनाला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावं," असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

कोकणातील जनतेला भुलवायचं काम : "कामाचं श्रेय मिळावं यासाठी महाराजांचा पुतळा अत्यंत घिसाटघाईनं सरकारकडून उभा करण्यात आला. पुतळ्याच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार या सरकारनं केलाय. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटला होता, मात्र त्यामागे केवळ भ्रष्टाचार होता, हे आता उघड झालं. लवकरात लवकर उद्घाटन करून कोकणातील जनतेला भुलवायचं काम या सरकारचं होतं," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केलाय.

हेही वाचा

  1. आठ महिन्यात पुतळा पडतोच कसा, न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांची मागणी - Shivaji Maharaj Statue Incident
  2. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आशिष शेलारांनी मागितली माफी, तर फडणवीस म्हणाले, "कोथळा बाहेर काढू" - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. "नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला", सिंधुदुर्गातील घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Last Updated : Aug 28, 2024, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.