ETV Bharat / state

मेळघाटातील धाडसी 'जिगर' : रोजगारासाठी कुटुंब गेलं दूर शहरात; शिक्षक, मित्र, आत्याच्या आधारावर घरात राहतो एकटा चिमुकला जीव - Melghat Tribal Boy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 9:56 AM IST

Updated : Sep 5, 2024, 12:55 PM IST

Melghat Tribal Boy : मेळघाटातील आदिवासी बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात शहरात धाव घेतात. मात्र त्यांची चिमुकली मुलं एकटीच घरी राहत असल्याचं वास्तव पुढं आलं आहे. मेळघाटातील जैतादेही या गावातील असाच एक जिगर शाळेत जाण्यासाठी घरी एकटा राहून शिकण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याची कहाणी खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी.

Melghat Tribal Boy
मेळघाटातील धाडसी 'जिगर' (Reporter)
मेळघाटातील धाडसी 'जिगर' (Reporter)

अमरावती Melghat Tribal Boy : रोज सकाळी उठून दुरुन पाणी भरुन आणणं, घर झाडणं, आवरणं, घराच्या अंगणात असणाऱ्या झाडांची काळजी घेणं, स्वतःचे कपडे धुण्यासह भांडी घासणं अशी घरातील सर्व कामं आटोपल्यावर तयारी करुन शाळेत जाणं. गत दोन वर्षांपासून अवघं तेरा वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या जिगरचा हा नित्यक्रम. त्याचं घर सर्वसाधारण गावातलं नाही, तर मेळघाटच्या जंगलात वसलेल्या जैतादेही या अतिशय छोट्या गावातील आहे. गावात रोजगार उपलब्ध नसल्यानं त्याचे आई, वडील आणि दोन बहिणी मेळघाटपासून लांब नाशिक आणि पुण्याकडं कामाला गेलेत. दिवाळीला किंवा थेट होळीलाच ते सारे घरी परतणार. इतके दिवस जिगर मात्र घरी एकटाच. या चिमुकल्या जीवाला त्याच्या शाळेतील शिक्षक, गावातच राहणारी आत्या आणि त्याच्यासारखेच चिमुकले मित्र यांचा बऱ्यापैकी आधार. मेळघाटच्या जैतादेही सारख्या इतर अनेक गावात अशी अनेक लहान मुलं आई-वडील रोजगारानिमित्त बाहेर असल्यामुळे घरात एकटीच असतात. अतिशय दुर्गम भागात आणि घनदाट जंगलात एकटं राहण्यासाठी खरंच मोठी 'जिगर' हवी. या जिगरबाज चिमुकल्यांच्या संघर्षावर 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

अशी आहे जिगरची कहाणी : जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या जिगर धिकर असं या धाडसी चिमुकल्याचं नाव आहे. जिगरला तीन मोठ्या बहिणी आहेत. सर्वात मोठी बहीण ही आश्रम शाळेत शिकायला आहे, तर इयत्ता आठवीत असणाऱ्या दोघी जुळ्या बहिणी या गावात असणाऱ्या एका संस्थेच्या शाळेत आहेत. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन्ही बहिणी आई-वडिलांसोबत शाळा सोडून कामासाठी गेल्या आहेत. जिगर हा घरी सध्या एकटाच राहतो. गावातच राहणारी त्याची आत्या त्याची काळजी घेते. जिगर शाळेतून आल्यावर दिवसभर त्याच्या घरात असतो. शाळेत दुपारी दोन वाजता मिळणारं मध्यान भोजन हा जिगरसाठी मोठा आधार. 'रविवारी शाळेला सुट्टी असली की मी स्वतः घरी खिचडी वगैरे चुलीवर शिजवतो, तर कधी आत्याकडं जेवायला जातो' असं जिगर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला.

मित्रांची लाभत आहे साथ : शाळेत सोबत शिकणारे गावातील मित्र जिगरच्या घरी येतात. सायंकाळी सर्व मित्र मस्त खेळतात. त्यांच्यात चांगल्या गप्पा देखील रंगतात. जिगर सारखीच परिस्थिती त्यांच्या मित्रांची देखील आहे. सध्या एक दोन मित्रांचे आई-वडील गावात असले, तरी दिवाळीनंतर ते देखील कामानिमित्त बाहेर जाणार आहेत. अनेक चिमुकल्यांचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यावर त्यांच्यासोबत आजी -आजोबा घरात असतात. जिगर सारखी मोजकी मुलं मात्र आई, वडील हे दोघंही कामानिमित्त दूर गेल्यावर आपलं घर आणि स्वतःला एकटेच सांभाळतात. विशेष म्हणजे या चिमुकल्यांना अगदी लहान वयातच चुलीवर स्वयंपाक देखील करता येतो.

गावात अशी अनेक चिमुकली : जैतादेही या छोट्याशा गावात सध्या जिगर हा चिमुकला घरी एकटाच असला, तरी इयत्ता सहावीत शिकणारी इशिका ही लहान भावासह काका आणि काकूसोबत राहते. तिची आई कामानिमित्त औरंगाबादला गेली आहे. कामावर असतानाच वडिलांचं निधन झालं. त्यामुळे इशिका आणि तिच्या लहान भावाची जबाबदारी तिच्या आईवर असून आई घरी नसताना लहान भावाची काळजी घेणं ही जबाबदारी सध्या इशिकावर आहे. तिचे काका काकू तिला आपली मुलगी म्हणूनच सांभाळतात. जिगर आणि इशिकाप्रमाणं अनेक मुलांचे आई-वडील हे दिवाळीनंतर बाहेर दूरवर कामानिमित्त जातात. सलग चार ते पाच महिने काम करुन चांगले पैसे घेऊन मेळघाटातील आदिवासी बांधव होळी या मेळघाटातील सर्वात मोठ्या सणाच्यानिमित्तानं आपल्या गावातील घरी परत येतात.

शाळेतील शिक्षक घेतात काळजी : शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक पालक कामानिमित्त बाहेरगावी जात असल्यामुळे या मुलांकडं लक्ष देण्याची जरा अधिक जबाबदारी ही शिक्षकांवर येते. जैतादेही या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामूनकर, सहाय्यक शिक्षक जितेंद्र राठी आणि शुभांगी येवले हे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडं योग्य लक्ष देतात. पालक रोजगारानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे घरात एकट्या राहणाऱ्या चिमुकल्यांना नेमक्या काय अडचणी आहेत आणि त्यावर कशी मात करता येईल, यावर तोडगा देखील काढतात. शाळेतील मध्यान भोजन योजनेमुळे घरात एकट्याच राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था होते. जे चिमुकले घरात एकटेच आहेत, अशांना शाळेतील मध्यान जेवण रात्रीसाठी देखील दिल्या जाते. अनेकदा शिक्षक घरुन दोन पोळ्या जास्त आणतात आणि या मुलांना देतात. गावात असणाऱ्या या मुलांच्या नातेवाईकांशी देखील शिक्षक नियमित संवाद साधून आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

हेही वाचा :

  1. मेळघाटात रानभाजी महोत्सव : शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मारला 'आरा' भाज्यांवर ताव - Ranbhaji festival in Melghat
  2. लुप्त झालेला रानपिंगळा 117 वर्षानंतर आला जगासमोर, मेळघाटात रानपिंगळ्याचा 'फालतू' शोध! - Amravati Ranpingla
  3. अंडी उबवण्यासाठी मेळघाटात केला जातो 'या' खास पारंपरिक पद्धतीचा उपयोग - Egg Hatching System In Melghat

मेळघाटातील धाडसी 'जिगर' (Reporter)

अमरावती Melghat Tribal Boy : रोज सकाळी उठून दुरुन पाणी भरुन आणणं, घर झाडणं, आवरणं, घराच्या अंगणात असणाऱ्या झाडांची काळजी घेणं, स्वतःचे कपडे धुण्यासह भांडी घासणं अशी घरातील सर्व कामं आटोपल्यावर तयारी करुन शाळेत जाणं. गत दोन वर्षांपासून अवघं तेरा वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या जिगरचा हा नित्यक्रम. त्याचं घर सर्वसाधारण गावातलं नाही, तर मेळघाटच्या जंगलात वसलेल्या जैतादेही या अतिशय छोट्या गावातील आहे. गावात रोजगार उपलब्ध नसल्यानं त्याचे आई, वडील आणि दोन बहिणी मेळघाटपासून लांब नाशिक आणि पुण्याकडं कामाला गेलेत. दिवाळीला किंवा थेट होळीलाच ते सारे घरी परतणार. इतके दिवस जिगर मात्र घरी एकटाच. या चिमुकल्या जीवाला त्याच्या शाळेतील शिक्षक, गावातच राहणारी आत्या आणि त्याच्यासारखेच चिमुकले मित्र यांचा बऱ्यापैकी आधार. मेळघाटच्या जैतादेही सारख्या इतर अनेक गावात अशी अनेक लहान मुलं आई-वडील रोजगारानिमित्त बाहेर असल्यामुळे घरात एकटीच असतात. अतिशय दुर्गम भागात आणि घनदाट जंगलात एकटं राहण्यासाठी खरंच मोठी 'जिगर' हवी. या जिगरबाज चिमुकल्यांच्या संघर्षावर 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

अशी आहे जिगरची कहाणी : जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या जिगर धिकर असं या धाडसी चिमुकल्याचं नाव आहे. जिगरला तीन मोठ्या बहिणी आहेत. सर्वात मोठी बहीण ही आश्रम शाळेत शिकायला आहे, तर इयत्ता आठवीत असणाऱ्या दोघी जुळ्या बहिणी या गावात असणाऱ्या एका संस्थेच्या शाळेत आहेत. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन्ही बहिणी आई-वडिलांसोबत शाळा सोडून कामासाठी गेल्या आहेत. जिगर हा घरी सध्या एकटाच राहतो. गावातच राहणारी त्याची आत्या त्याची काळजी घेते. जिगर शाळेतून आल्यावर दिवसभर त्याच्या घरात असतो. शाळेत दुपारी दोन वाजता मिळणारं मध्यान भोजन हा जिगरसाठी मोठा आधार. 'रविवारी शाळेला सुट्टी असली की मी स्वतः घरी खिचडी वगैरे चुलीवर शिजवतो, तर कधी आत्याकडं जेवायला जातो' असं जिगर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला.

मित्रांची लाभत आहे साथ : शाळेत सोबत शिकणारे गावातील मित्र जिगरच्या घरी येतात. सायंकाळी सर्व मित्र मस्त खेळतात. त्यांच्यात चांगल्या गप्पा देखील रंगतात. जिगर सारखीच परिस्थिती त्यांच्या मित्रांची देखील आहे. सध्या एक दोन मित्रांचे आई-वडील गावात असले, तरी दिवाळीनंतर ते देखील कामानिमित्त बाहेर जाणार आहेत. अनेक चिमुकल्यांचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यावर त्यांच्यासोबत आजी -आजोबा घरात असतात. जिगर सारखी मोजकी मुलं मात्र आई, वडील हे दोघंही कामानिमित्त दूर गेल्यावर आपलं घर आणि स्वतःला एकटेच सांभाळतात. विशेष म्हणजे या चिमुकल्यांना अगदी लहान वयातच चुलीवर स्वयंपाक देखील करता येतो.

गावात अशी अनेक चिमुकली : जैतादेही या छोट्याशा गावात सध्या जिगर हा चिमुकला घरी एकटाच असला, तरी इयत्ता सहावीत शिकणारी इशिका ही लहान भावासह काका आणि काकूसोबत राहते. तिची आई कामानिमित्त औरंगाबादला गेली आहे. कामावर असतानाच वडिलांचं निधन झालं. त्यामुळे इशिका आणि तिच्या लहान भावाची जबाबदारी तिच्या आईवर असून आई घरी नसताना लहान भावाची काळजी घेणं ही जबाबदारी सध्या इशिकावर आहे. तिचे काका काकू तिला आपली मुलगी म्हणूनच सांभाळतात. जिगर आणि इशिकाप्रमाणं अनेक मुलांचे आई-वडील हे दिवाळीनंतर बाहेर दूरवर कामानिमित्त जातात. सलग चार ते पाच महिने काम करुन चांगले पैसे घेऊन मेळघाटातील आदिवासी बांधव होळी या मेळघाटातील सर्वात मोठ्या सणाच्यानिमित्तानं आपल्या गावातील घरी परत येतात.

शाळेतील शिक्षक घेतात काळजी : शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक पालक कामानिमित्त बाहेरगावी जात असल्यामुळे या मुलांकडं लक्ष देण्याची जरा अधिक जबाबदारी ही शिक्षकांवर येते. जैतादेही या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामूनकर, सहाय्यक शिक्षक जितेंद्र राठी आणि शुभांगी येवले हे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडं योग्य लक्ष देतात. पालक रोजगारानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे घरात एकट्या राहणाऱ्या चिमुकल्यांना नेमक्या काय अडचणी आहेत आणि त्यावर कशी मात करता येईल, यावर तोडगा देखील काढतात. शाळेतील मध्यान भोजन योजनेमुळे घरात एकट्याच राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था होते. जे चिमुकले घरात एकटेच आहेत, अशांना शाळेतील मध्यान जेवण रात्रीसाठी देखील दिल्या जाते. अनेकदा शिक्षक घरुन दोन पोळ्या जास्त आणतात आणि या मुलांना देतात. गावात असणाऱ्या या मुलांच्या नातेवाईकांशी देखील शिक्षक नियमित संवाद साधून आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

हेही वाचा :

  1. मेळघाटात रानभाजी महोत्सव : शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मारला 'आरा' भाज्यांवर ताव - Ranbhaji festival in Melghat
  2. लुप्त झालेला रानपिंगळा 117 वर्षानंतर आला जगासमोर, मेळघाटात रानपिंगळ्याचा 'फालतू' शोध! - Amravati Ranpingla
  3. अंडी उबवण्यासाठी मेळघाटात केला जातो 'या' खास पारंपरिक पद्धतीचा उपयोग - Egg Hatching System In Melghat
Last Updated : Sep 5, 2024, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.