ETV Bharat / state

महाराष्ट्रातून भाजपा घालवा, मग दिल्लीतील मोदी सरकार घालवायला वेळ लागणार नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल - Jayant Patil On BJP

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 7:50 AM IST

Jayant Patil On BJP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला. "महाराष्ट्रातून भाजपा घालवल्यानंतर केंद्रातून मोदी सरकार घालवण्यास वेळ लागणार नाही," असा विश्वास जयंत पाटील यांनी पाटस इथं बोलताना व्यक्त केला.

Jayant Patil On BJP
संपादित छायाचित्र (ETV Bhaart)

पुणे Jayant Patil On BJP : "आगामी विधानसभा निवडणूक 2024 ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आता सत्ताधारी पक्षात राम राहिला नाही. आता राम आपल्या बाजूला आहे. जिथं राम आहे, तिथं त्यांचे उमेदवार पडले आहेत. त्यामुळे ही विधानसभा जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातून भाजपा घालवा, एकदा महाराष्ट्र आपण जिंकला की दिल्लीतील मोदी सरकार घालवायला वेळ लागणार नाही," असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रेत दौंड तालुक्यातील पाटस इथं सभा झाली, यावेळी ते बोलत होते.

Jayant Patil On BJP
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी (Reporter)

कूटनीती करुन अनेक नेत्यांना कारागृहात डांबण्याचं राजकारण : "आमची लढाई भाजपा सोबत आहे. महाराष्ट्रात कूटनीती करुन अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण सूरु आहे. या कूटनीती विरोधात आम्ही आहोत. इथल्या जनतेनं 32 खासदार भाजपा विरोधात निवडून दिले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना घेऊन सरकार स्थापन करायची वेळ आली. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आता एनडीए सरकार म्हणायला लागले आहेत," अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. "गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवस्वराज्य यात्रा काढली, तेव्हा लोक म्हणायचे 20 आमदार येतील. मात्र आमचे 54 आमदार निवडून आले. आता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला समजलं आहे की शरद पवार नावाची जादू काय आहे. सगळे पुढारी होते, तेव्हा 4 खासदार होते. आता सगळे झाडून निघून गेले. हे गेलेले सगळे म्हणायचे यांचा 1-2 खासदार निवडून येईल, परंतु 8 खासदार निवडून आले. शरद पवार यांना फसवल्याची भावना जनेतेत आहे. 2 मराठी माणसांचे पक्ष यांनी फोडले. यामुळे जनतेत रोष आहे," असंही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं.

लोकसभेत सगळे नेते विरोधात, मात्र मतदार राजा सोबत होता : या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, "लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सगळे नेते विरोधात होते, परंतु फक्त स्वाभिमानी मतदार राजा सोबत राहिला. फक्त नेते सोबत असून निवडणूक जिंकता येत नाही, तर त्यासाठी कार्यकर्ते, मतदार सोबत असला तरच निवडणूक जिकता येते. आपण सर्वांनी एकत्र काम केलं हे मी कधीच विसरणार नाही," असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट करत मतदारांचे आभार व्यक्त केले. "सर्वांना विचारत घेऊनच विधानसभेचं तिकीट जाहीर केलं जाईल. उमेदवारीही लवकरच जाहीर केली जाईल," असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपावर टीका केली. "भाजपा नेते दोन पक्ष फोडून आलो असं सागंतात. मात्र त्यांनी तरुणांचे रोजगार पळवले," अशी टीका कोल्हे यांनी केली. तर बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

हेही वाचा :

  1. "मी कधीच असं सांगितलं नाही", परमबीर सिंग यांच्या आरोपावर जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर - Jayant Patil On Param Bir Singh
  2. शिवनेरीच्या पायरीला अभिवादन करून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात; जयंत पाटील म्हणाले,"जनतेपुढे भ्रष्टाचाराचा.." - Jayant Patil On Shivswarajya Yatra
  3. "मोदी है तो मुमकिन है", विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा - Jayant Patil on vinesh phogat

पुणे Jayant Patil On BJP : "आगामी विधानसभा निवडणूक 2024 ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आता सत्ताधारी पक्षात राम राहिला नाही. आता राम आपल्या बाजूला आहे. जिथं राम आहे, तिथं त्यांचे उमेदवार पडले आहेत. त्यामुळे ही विधानसभा जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातून भाजपा घालवा, एकदा महाराष्ट्र आपण जिंकला की दिल्लीतील मोदी सरकार घालवायला वेळ लागणार नाही," असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रेत दौंड तालुक्यातील पाटस इथं सभा झाली, यावेळी ते बोलत होते.

Jayant Patil On BJP
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी (Reporter)

कूटनीती करुन अनेक नेत्यांना कारागृहात डांबण्याचं राजकारण : "आमची लढाई भाजपा सोबत आहे. महाराष्ट्रात कूटनीती करुन अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण सूरु आहे. या कूटनीती विरोधात आम्ही आहोत. इथल्या जनतेनं 32 खासदार भाजपा विरोधात निवडून दिले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना घेऊन सरकार स्थापन करायची वेळ आली. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आता एनडीए सरकार म्हणायला लागले आहेत," अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. "गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवस्वराज्य यात्रा काढली, तेव्हा लोक म्हणायचे 20 आमदार येतील. मात्र आमचे 54 आमदार निवडून आले. आता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला समजलं आहे की शरद पवार नावाची जादू काय आहे. सगळे पुढारी होते, तेव्हा 4 खासदार होते. आता सगळे झाडून निघून गेले. हे गेलेले सगळे म्हणायचे यांचा 1-2 खासदार निवडून येईल, परंतु 8 खासदार निवडून आले. शरद पवार यांना फसवल्याची भावना जनेतेत आहे. 2 मराठी माणसांचे पक्ष यांनी फोडले. यामुळे जनतेत रोष आहे," असंही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं.

लोकसभेत सगळे नेते विरोधात, मात्र मतदार राजा सोबत होता : या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, "लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सगळे नेते विरोधात होते, परंतु फक्त स्वाभिमानी मतदार राजा सोबत राहिला. फक्त नेते सोबत असून निवडणूक जिंकता येत नाही, तर त्यासाठी कार्यकर्ते, मतदार सोबत असला तरच निवडणूक जिकता येते. आपण सर्वांनी एकत्र काम केलं हे मी कधीच विसरणार नाही," असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट करत मतदारांचे आभार व्यक्त केले. "सर्वांना विचारत घेऊनच विधानसभेचं तिकीट जाहीर केलं जाईल. उमेदवारीही लवकरच जाहीर केली जाईल," असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपावर टीका केली. "भाजपा नेते दोन पक्ष फोडून आलो असं सागंतात. मात्र त्यांनी तरुणांचे रोजगार पळवले," अशी टीका कोल्हे यांनी केली. तर बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

हेही वाचा :

  1. "मी कधीच असं सांगितलं नाही", परमबीर सिंग यांच्या आरोपावर जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर - Jayant Patil On Param Bir Singh
  2. शिवनेरीच्या पायरीला अभिवादन करून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात; जयंत पाटील म्हणाले,"जनतेपुढे भ्रष्टाचाराचा.." - Jayant Patil On Shivswarajya Yatra
  3. "मोदी है तो मुमकिन है", विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा - Jayant Patil on vinesh phogat
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.