ETV Bharat / state

विशाळगडावर तणावपूर्ण शांतता; शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना दिला आधार - Vishalgad Violence Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 8:07 PM IST

Shahu Chhatrapati Maharaj : विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात जमावानं अनेक घरांना लक्ष करत जाळपोळ केली. प्रचंड तणावाखाली असलेल्या नागरिकांना आज कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आधार दिला.

MP Shahu Chhatrapati Maharaj
खासदार शाहू छत्रपती महाराज (ETV Bharat Repoter)

कोल्हापूर Shahu Chhatrapati Maharaj : जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात रविवारी हिंसक जमावानं काही घरांची मोडतोड केली. येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीच्या नेते खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पांढरे पाणी या ठिकाणी रोखलं. तसंच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळं जिल्हा प्रशासन, पोलिसांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. गेले दोन दिवस भीतीच्या छायेखाली असलेल्या नागरिकांना शासनानं सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केली.

शाहू छत्रपती महाराज यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Repoter)

नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा : किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रविवारी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला होता, मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागलं. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात अनेक घरांना जमावणं लक्ष करून प्रार्थनास्थळासह दुकानांची नासधूस केली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं काही साहित्यासह जेवणाची पाकिटे घेऊन कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विशाळगडाकडे जाणाऱ्या पांढरे पाणी या ठिकाणी रोखण्यात आलं.

पत्रकारांना रोखलं : यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय गेरडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, पोलिसांकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वाद घालण्याचे प्रकार घडले. यामुळं आक्रमक झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी गजापूरकडं जाण्याचा प्रयत्न केला, या घटनेमुळं पांढरपाणी या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून माध्यम प्रतिनिधींना गजापूर गावाकडं सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंडिया आघाडीच्या 15 प्रतिनिधींनाही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोडण्यात आलं.

नुकसानग्रस्त नागरिकांना शाहू महाराजांकडून आधार : गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील अनेक घरांवर जमावानं हल्ला केला. आक्रमक जमाव पाहून नागरिकांनी जंगलात आश्रय घेतला. त्यामुळं आज कोल्हापूरचे शाहू महाराजांनी नागरिकांना जेवणाची पाकिटे देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.

'हे' वाचलंत का :

  1. विशाळगड हिंसाचार प्रकरण; 21 जण ताब्यात तर 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेंबाबत पोलिसांचं मौन - Vishalgarh Violence Case
  2. विशाळगड अतिक्रमण मुद्दा; हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, संभाजीराजेंनी पिळले कान - Sambhaji Raje Warns Hasan Mushrif
  3. विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण, जमावाकडून घरांची तोडफोड - Vishalgad Encroachment issue

कोल्हापूर Shahu Chhatrapati Maharaj : जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात रविवारी हिंसक जमावानं काही घरांची मोडतोड केली. येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीच्या नेते खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पांढरे पाणी या ठिकाणी रोखलं. तसंच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळं जिल्हा प्रशासन, पोलिसांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. गेले दोन दिवस भीतीच्या छायेखाली असलेल्या नागरिकांना शासनानं सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केली.

शाहू छत्रपती महाराज यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Repoter)

नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा : किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रविवारी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला होता, मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागलं. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात अनेक घरांना जमावणं लक्ष करून प्रार्थनास्थळासह दुकानांची नासधूस केली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं काही साहित्यासह जेवणाची पाकिटे घेऊन कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विशाळगडाकडे जाणाऱ्या पांढरे पाणी या ठिकाणी रोखण्यात आलं.

पत्रकारांना रोखलं : यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय गेरडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, पोलिसांकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वाद घालण्याचे प्रकार घडले. यामुळं आक्रमक झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी गजापूरकडं जाण्याचा प्रयत्न केला, या घटनेमुळं पांढरपाणी या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून माध्यम प्रतिनिधींना गजापूर गावाकडं सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंडिया आघाडीच्या 15 प्रतिनिधींनाही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोडण्यात आलं.

नुकसानग्रस्त नागरिकांना शाहू महाराजांकडून आधार : गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील अनेक घरांवर जमावानं हल्ला केला. आक्रमक जमाव पाहून नागरिकांनी जंगलात आश्रय घेतला. त्यामुळं आज कोल्हापूरचे शाहू महाराजांनी नागरिकांना जेवणाची पाकिटे देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.

'हे' वाचलंत का :

  1. विशाळगड हिंसाचार प्रकरण; 21 जण ताब्यात तर 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेंबाबत पोलिसांचं मौन - Vishalgarh Violence Case
  2. विशाळगड अतिक्रमण मुद्दा; हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, संभाजीराजेंनी पिळले कान - Sambhaji Raje Warns Hasan Mushrif
  3. विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला हिंसक वळण, जमावाकडून घरांची तोडफोड - Vishalgad Encroachment issue
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.