ETV Bharat / state

'त्या' प्रकरणी शरद पवार, उद्धव ठाकरे गप्प का? अबू आझमींचा सवाल, छत्रपती घराण्याला केलं आवाहन - MLA Abu Azmi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 8:24 AM IST

MLA Abu Azmi : विशाळगड गजापूर येथे काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला होता. या प्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे आक्रमक होत शरद पवार, उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले.

abu azmi
अबू आझमी, शरद पवार, उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)

कोल्हापूर MLA Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी गजापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. "नुकसानग्रस्त लोकांना दररोज 1 हजार रुपये भरपाई द्यावी. राज्य सरकारनं या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करावेत," अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडं केली.

शरद पवार, उद्धव ठाकरे गप्प का? : "शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात 14 जुलै रोजी हिंसाचार झाला. या घटनेला महिना होत आला तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे विशाळगडाजवळील गजापूर गावात झालेल्या हिंसाचार प्रकरणी गप्प का?" असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. "हिंसाचार प्रकरणी संशयित आरोपींवर दहशतवाद विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा. तसेच पोलीस अधीक्षकांना तत्काळ बडतर्फ करा," अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : "विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाची चौकशी व्हावी, तसेच अजूनही यातील काही संशयित आरोपी मोकाट आहेत, यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 12 ऑगस्टला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांची सभा होणार असून त्यांना रोखलं पाहिजं," असं आवाहन त्यांनी केलं. "गजापूर येथील नुकसानग्रस्त लोकांना दररोज 1 हजार रुपये भरपाई द्यावी, येथील जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करावे," अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

राज ठाकरेंनी द्वेषाचं राजकारण बंद करावं : "राज्यातील अनेक नेत्यांना राज ठाकरेंचा भाईचारा नकोय. त्यामुळे त्यांनी आता तरी द्वेषाचं राजकारण बंद करून विकासाचं राजकारण करावं," असं आवाहन अबू आझमी यांनी केलं.

छत्रपती घराण्यानं पुढाकार घ्यावा : "कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या अनेक घटना घडल्या. छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी केलेलं काम देशाला दिशादर्शक आहे. मात्र, अशा घटनांनी कोल्हापूर बदनाम होत आहे. गजापूर हिंसाचारात समाविष्ट असलेले लोक जिल्ह्याच्या बाहेरील होते, अशी आमची माहिती आहे. मात्र अशा घटना टाळण्यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील सदस्यांनी पुढाकार घ्यावा," असं आवाहनही अबू आझमी यांनी यावेळी केलं.

हेही वाचा

  1. "लाडका मतदार योजना आणा म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे..." राज ठाकरेंची सरकारवर खोचक टीका - Raj Thackeray on Mahayuti
  2. अनिल देशमुखांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग; भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊतांवर गुन्हा दाखल, नेमका वाद काय ? - Anil Deshmukh Hoarding
  3. विधानसभेसाठी मनसेचे दोन शिलेदार जाहीर; बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे मैदानात - MNS Candidate List
  4. अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh

कोल्हापूर MLA Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी गजापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. "नुकसानग्रस्त लोकांना दररोज 1 हजार रुपये भरपाई द्यावी. राज्य सरकारनं या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करावेत," अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडं केली.

शरद पवार, उद्धव ठाकरे गप्प का? : "शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात 14 जुलै रोजी हिंसाचार झाला. या घटनेला महिना होत आला तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे विशाळगडाजवळील गजापूर गावात झालेल्या हिंसाचार प्रकरणी गप्प का?" असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. "हिंसाचार प्रकरणी संशयित आरोपींवर दहशतवाद विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा. तसेच पोलीस अधीक्षकांना तत्काळ बडतर्फ करा," अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : "विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाची चौकशी व्हावी, तसेच अजूनही यातील काही संशयित आरोपी मोकाट आहेत, यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 12 ऑगस्टला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांची सभा होणार असून त्यांना रोखलं पाहिजं," असं आवाहन त्यांनी केलं. "गजापूर येथील नुकसानग्रस्त लोकांना दररोज 1 हजार रुपये भरपाई द्यावी, येथील जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करावे," अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

राज ठाकरेंनी द्वेषाचं राजकारण बंद करावं : "राज्यातील अनेक नेत्यांना राज ठाकरेंचा भाईचारा नकोय. त्यामुळे त्यांनी आता तरी द्वेषाचं राजकारण बंद करून विकासाचं राजकारण करावं," असं आवाहन अबू आझमी यांनी केलं.

छत्रपती घराण्यानं पुढाकार घ्यावा : "कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या अनेक घटना घडल्या. छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी केलेलं काम देशाला दिशादर्शक आहे. मात्र, अशा घटनांनी कोल्हापूर बदनाम होत आहे. गजापूर हिंसाचारात समाविष्ट असलेले लोक जिल्ह्याच्या बाहेरील होते, अशी आमची माहिती आहे. मात्र अशा घटना टाळण्यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील सदस्यांनी पुढाकार घ्यावा," असं आवाहनही अबू आझमी यांनी यावेळी केलं.

हेही वाचा

  1. "लाडका मतदार योजना आणा म्हणजे सगळ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मोकळे..." राज ठाकरेंची सरकारवर खोचक टीका - Raj Thackeray on Mahayuti
  2. अनिल देशमुखांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग; भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊतांवर गुन्हा दाखल, नेमका वाद काय ? - Anil Deshmukh Hoarding
  3. विधानसभेसाठी मनसेचे दोन शिलेदार जाहीर; बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे मैदानात - MNS Candidate List
  4. अनिल देशमुखांची चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Fadnavis Vs Deshmukh
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.