ETV Bharat / state

परस्परविरोधी आंदोलनामुळं शेजाशेजारची दोन गावं राज्यभर चर्चेत; मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनामुळं वाद पेटण्याची शक्यता - Maratha vs OBC reservation

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 5:28 PM IST

Updated : Jun 22, 2024, 7:43 PM IST

Maratha Vs OBC Reservation : मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनामुळं राज्यात वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. त्याविरोधात आठ दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील वडीगोद्री गावात उपोषण करत होते. त्यामुळं ही गावं राज्यात चर्चेचा विषय होती.

Laxman Hake, Manoj Jarange Patil
लक्ष्मण हाके - मनोज जरांगे पाटील (ETV BHARAT MH Desk)

छत्रपती संभाजीनगर Maratha Vs OBC Reservation : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण झाली. दहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. कालांतरानं ओबीसी तसंच मराठा, असा संघर्ष पेटत असताना छगन भुजबळांनी केलेल्या टीकेमुळं आंदोलन कुठल्या दिशेनं जाईल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके तसंच नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं होतं. दोनही आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू होती. आता दोन्ही आंदोलनं चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय.

मराठा-ओबीसी आंदोलन समोरासमोर : अंतरवाली सराटी गाव गेल्या वर्षभरापासून चांगलंच चर्चेत आलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यात वेगळीच दिशा पाहायला मिळाली. त्यामुळं अगदी दुर्लक्षित असलेलं छोटसं गाव देशभर चांगलंच चर्चेत आलंय. गेल्या दहा महिन्यांपासून या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य तसंच केंद्र सरकारांना घ्यावी लागली. अद्याप मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नसला, तरी मात्र गावात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाचे परिणाम दिसून येताय. विशेषतः नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चांगलाच दणका बसलाय. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या दोन दिग्गज नेत्यांसह इतर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अचानक ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. संभाजीनगर सोलापूर महामार्गावर उजव्या बाजूला आंतरवाली सराटी, तर डाव्या बाजूला वडीगोद्री ही दोन गाव आहेत. महामार्गावर जाताना या दोन गावांकडे कोणाचं लक्षही नव्हतं, मात्र आता ही दोन्ही गाव परस्परविरोधी आंदोलनामुळं चांगलीच चर्चेत आली आहेत. कारण अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरू असून दुसरीकडं वडीगोद्रीत ओबीसी आंदोलन सुरू आहे. त्यामुळं दोन्ही गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन समाजातील घटक समोरासमोर आल्यानं राज्यात चांगलाच परिणामकारक ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणुकीनंतर सोशल वॉर रंगला : मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही, असं सर्वच राजकीय पक्ष सांगत होते. मात्र, निवडणुकीत मोठा परिणाम पाहायला मिळाला. अनेक दिग्गजांना पायउतार व्हावं लागलंय. त्यानंतर सोशल मीडियावर वाद आणखीच चिघळला आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असताना सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ते आक्रमक नव्हते. मात्र, चार जूननंतर अवघ्या दहाच दिवसांनी ओबीसी समाजातर्फे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जातोय. त्यातच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी वडीगोद्री येथे सुरू असलेलं आंदोलन आदर्श आंदोलन असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर मराठा समाजाकडून चांगलीच टीका केली जात आहे. त्यात ओबीसी नेते छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात मध्यस्थी करत असल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूमिकांमुळं सामाजिक तेढ : उपोषण करून शांततेच्या मार्गानं आपले प्रश्न सोडवता येतात, असं म्हटलं जातं. राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करत देश स्वतंत्र केला. मात्र शांततेत सुरू असलेल्या आंदोलनांमधील वक्तव्यांमुळं सामाजिक अशांतता वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यात आंदोलनात आम्ही नाही, असा दावा करणारे राजकीय नेते त्यात वेगवेगळे वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे. त्यामुळं काही महिन्यांपूर्वी शांतपणे सुरू असलेलं आंदोलन चिघळण्याची शक्यता अधिक आहे. त्यात आता दोन्ही समाजाचे सामान्य नागरिक शांत राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. लोकसभेच्या एका जागेवर भाजपा, शिंदेंनी दरोडा टाकला - संजय राऊत - Sanjay Raut
  2. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' माहिती - BJP Core Committee Meeting
  3. अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam

छत्रपती संभाजीनगर Maratha Vs OBC Reservation : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण झाली. दहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. कालांतरानं ओबीसी तसंच मराठा, असा संघर्ष पेटत असताना छगन भुजबळांनी केलेल्या टीकेमुळं आंदोलन कुठल्या दिशेनं जाईल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके तसंच नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं होतं. दोनही आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू होती. आता दोन्ही आंदोलनं चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय.

मराठा-ओबीसी आंदोलन समोरासमोर : अंतरवाली सराटी गाव गेल्या वर्षभरापासून चांगलंच चर्चेत आलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यात वेगळीच दिशा पाहायला मिळाली. त्यामुळं अगदी दुर्लक्षित असलेलं छोटसं गाव देशभर चांगलंच चर्चेत आलंय. गेल्या दहा महिन्यांपासून या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य तसंच केंद्र सरकारांना घ्यावी लागली. अद्याप मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नसला, तरी मात्र गावात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाचे परिणाम दिसून येताय. विशेषतः नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चांगलाच दणका बसलाय. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या दोन दिग्गज नेत्यांसह इतर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अचानक ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. संभाजीनगर सोलापूर महामार्गावर उजव्या बाजूला आंतरवाली सराटी, तर डाव्या बाजूला वडीगोद्री ही दोन गाव आहेत. महामार्गावर जाताना या दोन गावांकडे कोणाचं लक्षही नव्हतं, मात्र आता ही दोन्ही गाव परस्परविरोधी आंदोलनामुळं चांगलीच चर्चेत आली आहेत. कारण अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरू असून दुसरीकडं वडीगोद्रीत ओबीसी आंदोलन सुरू आहे. त्यामुळं दोन्ही गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन समाजातील घटक समोरासमोर आल्यानं राज्यात चांगलाच परिणामकारक ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणुकीनंतर सोशल वॉर रंगला : मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही, असं सर्वच राजकीय पक्ष सांगत होते. मात्र, निवडणुकीत मोठा परिणाम पाहायला मिळाला. अनेक दिग्गजांना पायउतार व्हावं लागलंय. त्यानंतर सोशल मीडियावर वाद आणखीच चिघळला आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असताना सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ते आक्रमक नव्हते. मात्र, चार जूननंतर अवघ्या दहाच दिवसांनी ओबीसी समाजातर्फे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जातोय. त्यातच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी वडीगोद्री येथे सुरू असलेलं आंदोलन आदर्श आंदोलन असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर मराठा समाजाकडून चांगलीच टीका केली जात आहे. त्यात ओबीसी नेते छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात मध्यस्थी करत असल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूमिकांमुळं सामाजिक तेढ : उपोषण करून शांततेच्या मार्गानं आपले प्रश्न सोडवता येतात, असं म्हटलं जातं. राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करत देश स्वतंत्र केला. मात्र शांततेत सुरू असलेल्या आंदोलनांमधील वक्तव्यांमुळं सामाजिक अशांतता वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यात आंदोलनात आम्ही नाही, असा दावा करणारे राजकीय नेते त्यात वेगवेगळे वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचं काम करत आहे. त्यामुळं काही महिन्यांपूर्वी शांतपणे सुरू असलेलं आंदोलन चिघळण्याची शक्यता अधिक आहे. त्यात आता दोन्ही समाजाचे सामान्य नागरिक शांत राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. लोकसभेच्या एका जागेवर भाजपा, शिंदेंनी दरोडा टाकला - संजय राऊत - Sanjay Raut
  2. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' माहिती - BJP Core Committee Meeting
  3. अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam
Last Updated : Jun 22, 2024, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.