ETV Bharat / state

राजू शेट्टी महाविकास आघाडीसह महायुतीला देणार आव्हान, विधानसभा निवडणुकीकरिता काय आखलीय रणनीती? - Raju Shetti News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 9:45 AM IST

Updated : Jul 31, 2024, 1:39 PM IST

Raju Shetti News राज्यात महाविकास आघाडीनंतर आता नवीन आघाडी अस्तित्वात येणार आहे. चळवळीतील घटक असलेल्या पक्ष संघटनांना एकत्र घेऊन राज्याला परिवर्तन आघाडीचा पर्याय देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजु शेट्टी यांनी दिली. ते मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.

Raju Shetti News
माध्यमांशी बोलताना रोजू शेट्टी (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Raju Shetti News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली मोठ्या वेगानं घडत आहेत. "शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं. परंतु सर्वसामान्यांचा या आघाड्यांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे 'परिवर्तन आघाडी' तयार करण्यात आली," अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी संवाद साधताना राजु शेट्टी (ETV Bharat Reporter)

24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे बैठक: माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले "दोन्ही आघाड्यांच्या भांडणात शेतकऱ्यांचा विचार कुणीही करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र काम करणाऱ्याा चळवळीतील संघटना एकत्र आल्या आहेत. एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळा पर्याय लोकांना देणार आहोत. सत्तेत असलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी देणं-घेणं राहिलं नाही. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जिव्हाळा निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांना समोर ठेवून निवडणूक लढली पाहिजे. त्यामुळे छोट्या समविचारी संघटना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. त्यासाठी 24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे महत्त्वाची बैठक घेणार आहोत. त्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना, बी. आर.एस. आणि शेतकरी संघटना अशा छोट्या घटकांना एकत्र घेणार आहोत."

अनेकांशी बोलणी झाली: परिवर्तन आघाडीत कोण येणार? याबाबत राजू शेट्टी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "आम्ही आमचं काम करत असून चळवळ सोडली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये 288 जागा लढवणार आहोत. या आघाडीत मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा झाली आहे. समविचारी असलेले घटक आम्ही सोबत घेणार आहोत. बच्चू कडू यांनी आमच्यासोबत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते आले तर त्यांचा स्वागतच आहे. आमची दोन वेळा बैठकदेखील झाली आहेत. भविष्यात ते आमच्यासोबत येऊ शकतात. तर रविकांत तुपकर जरी आले तरी त्यांचं स्वागत असेल. ते आमचे शत्रू नाहीत."



छोटे पक्ष संपवण्याचा सर्वांचा कट: "सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या मोठ्या पक्षांना छोटे घटक पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी किंवा सत्ताधारी यांच्यासोबत जाणार नाही. आतापर्यंत विनायक मेटे, महादेव जानकर आणि माझ्यासह इतर छोट्या घटक पक्षांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. मतांसाठी जवळ घ्यायचं आणि नंतर त्यांना संपवायचं, हे काम केलं जातंय. त्यामुळे चळवळ जिवंत राहावी, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. परिवर्तनाची लाट आली तर लोक उभे राहतात. त्याच संधीचा फायदा घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत'. आता लोक दोघांनाही (महाविकास आघाडी आणि महायुती) त्यांची जागा नक्कीच दाखवतील. आमच्या आघाडीत आमदारांचे मतदान घेऊन मुख्यमंत्री कोण होईल हे आम्ही ठरवू. मात्र सध्या राज्यात अनेक संधीसाधू लोक आहेत," अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.



आरक्षणाची मागणी सर्वात आधी केली होती: राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा मुद्दा मी सर्वात आधी लोकसभेमध्ये उपस्थित केला होता. मराठा समाज प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा आहे. आतापर्यंत शेती व्यवसायाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यानं आज ही परिस्थिती उद्भवली आहे."

हेही वाचा

  1. राज्यात 'अद्रक' उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; एकाच दराने होणार खरेदी, मंत्री अब्दुल सत्तारांची माहिती - Raju Shetty And Abdul Sattar
  2. राजू शेट्टींचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? राज्यव्यापी बैठकीत 'स्वाभिमानी' करणार विचारमंथन - Swabhimani Shetkari Sanghtana

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Raju Shetti News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली मोठ्या वेगानं घडत आहेत. "शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं. परंतु सर्वसामान्यांचा या आघाड्यांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे 'परिवर्तन आघाडी' तयार करण्यात आली," अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी संवाद साधताना राजु शेट्टी (ETV Bharat Reporter)

24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे बैठक: माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले "दोन्ही आघाड्यांच्या भांडणात शेतकऱ्यांचा विचार कुणीही करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र काम करणाऱ्याा चळवळीतील संघटना एकत्र आल्या आहेत. एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळा पर्याय लोकांना देणार आहोत. सत्तेत असलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी देणं-घेणं राहिलं नाही. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जिव्हाळा निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांना समोर ठेवून निवडणूक लढली पाहिजे. त्यामुळे छोट्या समविचारी संघटना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. त्यासाठी 24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे महत्त्वाची बैठक घेणार आहोत. त्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना, बी. आर.एस. आणि शेतकरी संघटना अशा छोट्या घटकांना एकत्र घेणार आहोत."

अनेकांशी बोलणी झाली: परिवर्तन आघाडीत कोण येणार? याबाबत राजू शेट्टी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "आम्ही आमचं काम करत असून चळवळ सोडली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये 288 जागा लढवणार आहोत. या आघाडीत मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा झाली आहे. समविचारी असलेले घटक आम्ही सोबत घेणार आहोत. बच्चू कडू यांनी आमच्यासोबत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते आले तर त्यांचा स्वागतच आहे. आमची दोन वेळा बैठकदेखील झाली आहेत. भविष्यात ते आमच्यासोबत येऊ शकतात. तर रविकांत तुपकर जरी आले तरी त्यांचं स्वागत असेल. ते आमचे शत्रू नाहीत."



छोटे पक्ष संपवण्याचा सर्वांचा कट: "सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या मोठ्या पक्षांना छोटे घटक पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी किंवा सत्ताधारी यांच्यासोबत जाणार नाही. आतापर्यंत विनायक मेटे, महादेव जानकर आणि माझ्यासह इतर छोट्या घटक पक्षांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. मतांसाठी जवळ घ्यायचं आणि नंतर त्यांना संपवायचं, हे काम केलं जातंय. त्यामुळे चळवळ जिवंत राहावी, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. परिवर्तनाची लाट आली तर लोक उभे राहतात. त्याच संधीचा फायदा घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत'. आता लोक दोघांनाही (महाविकास आघाडी आणि महायुती) त्यांची जागा नक्कीच दाखवतील. आमच्या आघाडीत आमदारांचे मतदान घेऊन मुख्यमंत्री कोण होईल हे आम्ही ठरवू. मात्र सध्या राज्यात अनेक संधीसाधू लोक आहेत," अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.



आरक्षणाची मागणी सर्वात आधी केली होती: राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा मुद्दा मी सर्वात आधी लोकसभेमध्ये उपस्थित केला होता. मराठा समाज प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा आहे. आतापर्यंत शेती व्यवसायाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यानं आज ही परिस्थिती उद्भवली आहे."

हेही वाचा

  1. राज्यात 'अद्रक' उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; एकाच दराने होणार खरेदी, मंत्री अब्दुल सत्तारांची माहिती - Raju Shetty And Abdul Sattar
  2. राजू शेट्टींचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? राज्यव्यापी बैठकीत 'स्वाभिमानी' करणार विचारमंथन - Swabhimani Shetkari Sanghtana
Last Updated : Jul 31, 2024, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.