ETV Bharat / state

"कोरोना काळात ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, त्यांच्यापासून सावध राहा"-एकनाथ शिंदे - Eknath Shinde On Maha Vikas Aghadi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 9:08 PM IST

Eknath Shinde On Maha Vikas Aghadi : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून उद्या होणारा बंद मागे घेण्यात आला आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. ते आज महिला सक्षमीकरण कार्यक्रमादरम्यान नाशिकमध्ये बोलत होते.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा (Etv Bharat Reporter)

नाशिक Eknath Shinde On Maha Vikas Aghadi : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा दिली होती. मात्र विरोधकांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. न्यायालयानंही हा बंद बेकायदेशीर असून त्याला परवानगी ​​नाकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

विरोधकांवर कडाडून टीका : नाशिकच्या तपोवन येथे महायुतीकडून महिला सशक्तिकरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह हजारोंच्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. तसंच ही योजना बंद पडेल, असं म्हणणाऱ्या विरोधकांचादेखील समाचार घेतला.

योजना बंद होणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " राज्यात आतापर्यंत 1 कोटी 40 बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय. त्यापैकी एक कोटी 25 हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले. इतर बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत." बहिणीच्या खात्यात 1 हजार 500 हजार रुपये जमा झाल्यामुळं विरोधकांच्या पोटात दुखतंय. मात्र बहिणी सावत्र भावाला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत," असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. "हा जनतेचा पैसा आहे. ही योजना बंद होणार नाही. ही देना बँक आहे," असंही ते म्हणाले.


बंद करणं बेकायदेशीर : "आमचं सरकार संवेदनशील सरकार आहे. बदलापूर घटनेतील केस आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहोत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, विरोधक त्याचं राजकारण करत आहेत. त्यांच राजकारण म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणे सुरक्षित बहीण असणारं राज्य विरोधकांना नकोय. त्यांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण थांबवावं. कोर्टानं बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. बंदला न्यायालयानं परवानगी दिली नाही. कोरोना काळात ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, त्यांच्यापासून सावध राहा," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.




विरोधकांनी चांगला योजनेच्या आड येऊ नये : "सरकारनं सर्वांना मदतीचा हात दिलाय. महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत सव्वा कोटी महिलांच्या खात्यात पैसे पोहचले. 2 कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे पाऊल मागे घेतलं जाणार नाही. योजना बंद होणार नाही. विरोधकांनी चांगल्या योजनांच्या आड येऊ नये. बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. नराधमाला फाशी दिली पाहिजे", असं यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.



लाडकी बहीण योजनेपासून एकही बहीण वंचित राहणार नाही. बदलापूर घटनेतून विरोधक राजकीय पोळी शेकण्याचं काम करत आहेत. काही जण सांगतात महाराष्ट्र बंद करायचा आहे. त्यांच्या काळात अनेक बलात्कार झाले. तेव्हा महाराष्ट्र बंद केला नाही. कोविड सेंटरमध्ये बलात्कार, कोलकतामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला. तेव्हा विरोधक कुठे होते?-उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

विरोधक राज्यात अराजकता पसरवत आहे : "महिलांसाठी अनेक योजना सरकारनं सुरू केल्या आहेत. विरोधक चुकीचे आरोप करत आहेत. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. एक ताई म्हणतात माझी सुरक्षा काढून महिलांना द्या. निर्भया पथकाच्या गाड्या तुमच्या ताफ्यात होत्या, त्याचं काय? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. "विरोधक राज्यात अराजकता पसरवत आहे. हे तुम्ही थांबवा. अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

हे वाचलंत का :

  1. महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News
  2. "आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदात रस नाही", मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य - Sharad Pawar
  3. उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, बंदमध्ये पोलिसांनी आडकाठी आणू नये - उद्धव ठाकरे - Maharashtra Band

नाशिक Eknath Shinde On Maha Vikas Aghadi : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा दिली होती. मात्र विरोधकांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. न्यायालयानंही हा बंद बेकायदेशीर असून त्याला परवानगी ​​नाकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

विरोधकांवर कडाडून टीका : नाशिकच्या तपोवन येथे महायुतीकडून महिला सशक्तिकरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह हजारोंच्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. तसंच ही योजना बंद पडेल, असं म्हणणाऱ्या विरोधकांचादेखील समाचार घेतला.

योजना बंद होणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " राज्यात आतापर्यंत 1 कोटी 40 बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय. त्यापैकी एक कोटी 25 हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले. इतर बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत." बहिणीच्या खात्यात 1 हजार 500 हजार रुपये जमा झाल्यामुळं विरोधकांच्या पोटात दुखतंय. मात्र बहिणी सावत्र भावाला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत," असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. "हा जनतेचा पैसा आहे. ही योजना बंद होणार नाही. ही देना बँक आहे," असंही ते म्हणाले.


बंद करणं बेकायदेशीर : "आमचं सरकार संवेदनशील सरकार आहे. बदलापूर घटनेतील केस आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहोत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, विरोधक त्याचं राजकारण करत आहेत. त्यांच राजकारण म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणे सुरक्षित बहीण असणारं राज्य विरोधकांना नकोय. त्यांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण थांबवावं. कोर्टानं बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. बंदला न्यायालयानं परवानगी दिली नाही. कोरोना काळात ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, त्यांच्यापासून सावध राहा," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.




विरोधकांनी चांगला योजनेच्या आड येऊ नये : "सरकारनं सर्वांना मदतीचा हात दिलाय. महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत सव्वा कोटी महिलांच्या खात्यात पैसे पोहचले. 2 कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे पाऊल मागे घेतलं जाणार नाही. योजना बंद होणार नाही. विरोधकांनी चांगल्या योजनांच्या आड येऊ नये. बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. नराधमाला फाशी दिली पाहिजे", असं यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.



लाडकी बहीण योजनेपासून एकही बहीण वंचित राहणार नाही. बदलापूर घटनेतून विरोधक राजकीय पोळी शेकण्याचं काम करत आहेत. काही जण सांगतात महाराष्ट्र बंद करायचा आहे. त्यांच्या काळात अनेक बलात्कार झाले. तेव्हा महाराष्ट्र बंद केला नाही. कोविड सेंटरमध्ये बलात्कार, कोलकतामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला. तेव्हा विरोधक कुठे होते?-उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

विरोधक राज्यात अराजकता पसरवत आहे : "महिलांसाठी अनेक योजना सरकारनं सुरू केल्या आहेत. विरोधक चुकीचे आरोप करत आहेत. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. एक ताई म्हणतात माझी सुरक्षा काढून महिलांना द्या. निर्भया पथकाच्या गाड्या तुमच्या ताफ्यात होत्या, त्याचं काय? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. "विरोधक राज्यात अराजकता पसरवत आहे. हे तुम्ही थांबवा. अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

हे वाचलंत का :

  1. महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News
  2. "आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदात रस नाही", मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य - Sharad Pawar
  3. उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, बंदमध्ये पोलिसांनी आडकाठी आणू नये - उद्धव ठाकरे - Maharashtra Band
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.