ETV Bharat / state

भास्कर भगरे यांनी कसा भेदला चक्रव्यूह: काय आहेत यशाची वैशिष्ट्यं? जाणून घ्या सविस्तर - Lok Sabha Election 24

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 5:45 PM IST

Lok Sabha Election 24 - गेल्या २० वर्षापासून भाजपाचा गड असलेला दिंडोरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी खेचून आणला. विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांनी धोबीपछाड देत भास्कर भगरे जायंट किलर ठरले आहेत. या निवडणुकीत दुसऱ्याच भगरेंनीही प्रचंड मतं खाल्ली.

Bhaskar Bhagare Win
भास्कर भगरे याचं स्वागत करताना कार्यकर्ते (ETV Bharat Reporter)

मनमाड Lok Sabha Election 2024: २० वर्षापासून भाजपाचा गड असलेल्या दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार भास्कर भगरे यांचा पराभव व्हावा याकरिता अनेक खेळ्या खेळण्यात आल्या. पराभवाच्या भीतीनं चक्क भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला बाबू भगरे नावाचा उमेदवार उभा करण्यात आला. ईव्हीएम मशीनमध्ये एका नावाचे दोन उमेदवार असल्यामुळं ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी दुसऱ्या भगरे यांना मतदान केलं. याचा परिणाम भगरे यांच्या लीडवर झाला असून देखील त्यांनी भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार यांना तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांनी धोबीपछाड देत भास्कर भगरे जायंट किलर ठरले आहेत.

विजयाचा जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते (ETV Bharat Reporter)

धनशक्तिविरुद्ध जनशक्ती : दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा परिवर्तन झालं असून भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी खेचून आणला. धनशक्तिविरुद्ध जनशक्ती अशा चुरशीच्या लढतीत भास्कर भगरे यांनी विजय आपल्या नावे केला. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या विजयाची आणि परिवर्तनाची चर्चा सुरू होती आणि ती सत्यात उतरली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डॉ. भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. विरोधकांपेक्षा स्वपक्षीय भाजपातून त्यांना मोठा विरोध होता. शहरात भाजपामध्ये राजकारण बघायला मिळत होतं. भाजपाचे प्रमुख नेते डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीमुळं नाराज होते.

महायुतीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचं आवाहन : महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचा सुरुवातीपासूनच जोर होता. नांदगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे आहेत. लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही कांदे यांच्यावर होती. मात्र, जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा पराभव दिसायला लागल्यानं मतांची विभागणी व्हावी, या उदेशानं महाविकास आघाडीतर्फे दलित मुस्लिम मतदारसंघात संभ्रम पसरविण्यात आला. तुम्ही भाजपाला मत नाही देत ना? मग किमान वंचित बहुजन आघाडीला तरी मतदान करा असं आवाहन करताना शिंदे गटाचे अनेक नेते मनमाड शहर आणि तालुक्यात बघायला मिळाले.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी : केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना मतदारसंघाकडे झालेलं दुर्लक्ष, त्यांच्या पीए संस्कृतीने नागरिकांच्या प्रश्नाकडं केलेलं दुर्लक्ष, शेतकऱ्यांची कांदा निर्यात बाबतीत असलेली नाराजी, रेल्वेच्या माध्यमातून नाराज असलेला कामगार वर्ग, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं बेरोजगार युवक, महागाईच्या विळख्यात अडकलेल्या महिला यासह आरोग्याच्या दृष्टीनं असलेले अनेक प्रश्न या सगळ्यांचा फटका विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) नवीन चेहरा असलेले भास्कर भगरे यांच्याकडून त्यांना कडवे आवाहन देण्यात आले. भाजपा नेते सुरवातीपासूनच दोन ते अडीच लाख मतांनी आम्ही निवडून येऊ असा दावा करत होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपाचा दारुण पराभव झालेला आहे. भास्कर भगरे हे नवखे उमेदवार जायंट किलर ठरले असून त्यांनी डॉ. भारती पवार यांचा तब्बल एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला आहे. महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी जोर लावला होता. तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी नेतृत्व केलं आणि तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भास्कर भगरे यांना प्रमोट करत विजयश्री खेचून आणली, अस सांगितलं जात आहे.

हेही वाचा

  1. 'सत्तासोपान' गाठण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीए नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या संसदेमधील पक्षनिहाय बलाबल - INDIA Bloc Vs NDA
  2. सत्तास्थापन करण्याकरिता इंडिया आघाडी आज ठरविणार रणनीती, शरद पवारांसह सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना - INDIA Bloc meeting today

मनमाड Lok Sabha Election 2024: २० वर्षापासून भाजपाचा गड असलेल्या दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार भास्कर भगरे यांचा पराभव व्हावा याकरिता अनेक खेळ्या खेळण्यात आल्या. पराभवाच्या भीतीनं चक्क भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला बाबू भगरे नावाचा उमेदवार उभा करण्यात आला. ईव्हीएम मशीनमध्ये एका नावाचे दोन उमेदवार असल्यामुळं ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी दुसऱ्या भगरे यांना मतदान केलं. याचा परिणाम भगरे यांच्या लीडवर झाला असून देखील त्यांनी भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार यांना तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांनी धोबीपछाड देत भास्कर भगरे जायंट किलर ठरले आहेत.

विजयाचा जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते (ETV Bharat Reporter)

धनशक्तिविरुद्ध जनशक्ती : दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा परिवर्तन झालं असून भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी खेचून आणला. धनशक्तिविरुद्ध जनशक्ती अशा चुरशीच्या लढतीत भास्कर भगरे यांनी विजय आपल्या नावे केला. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या विजयाची आणि परिवर्तनाची चर्चा सुरू होती आणि ती सत्यात उतरली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डॉ. भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. विरोधकांपेक्षा स्वपक्षीय भाजपातून त्यांना मोठा विरोध होता. शहरात भाजपामध्ये राजकारण बघायला मिळत होतं. भाजपाचे प्रमुख नेते डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीमुळं नाराज होते.

महायुतीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचं आवाहन : महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचा सुरुवातीपासूनच जोर होता. नांदगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे आहेत. लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही कांदे यांच्यावर होती. मात्र, जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा पराभव दिसायला लागल्यानं मतांची विभागणी व्हावी, या उदेशानं महाविकास आघाडीतर्फे दलित मुस्लिम मतदारसंघात संभ्रम पसरविण्यात आला. तुम्ही भाजपाला मत नाही देत ना? मग किमान वंचित बहुजन आघाडीला तरी मतदान करा असं आवाहन करताना शिंदे गटाचे अनेक नेते मनमाड शहर आणि तालुक्यात बघायला मिळाले.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी : केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना मतदारसंघाकडे झालेलं दुर्लक्ष, त्यांच्या पीए संस्कृतीने नागरिकांच्या प्रश्नाकडं केलेलं दुर्लक्ष, शेतकऱ्यांची कांदा निर्यात बाबतीत असलेली नाराजी, रेल्वेच्या माध्यमातून नाराज असलेला कामगार वर्ग, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं बेरोजगार युवक, महागाईच्या विळख्यात अडकलेल्या महिला यासह आरोग्याच्या दृष्टीनं असलेले अनेक प्रश्न या सगळ्यांचा फटका विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) नवीन चेहरा असलेले भास्कर भगरे यांच्याकडून त्यांना कडवे आवाहन देण्यात आले. भाजपा नेते सुरवातीपासूनच दोन ते अडीच लाख मतांनी आम्ही निवडून येऊ असा दावा करत होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपाचा दारुण पराभव झालेला आहे. भास्कर भगरे हे नवखे उमेदवार जायंट किलर ठरले असून त्यांनी डॉ. भारती पवार यांचा तब्बल एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला आहे. महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी जोर लावला होता. तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी नेतृत्व केलं आणि तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भास्कर भगरे यांना प्रमोट करत विजयश्री खेचून आणली, अस सांगितलं जात आहे.

हेही वाचा

  1. 'सत्तासोपान' गाठण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीए नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या संसदेमधील पक्षनिहाय बलाबल - INDIA Bloc Vs NDA
  2. सत्तास्थापन करण्याकरिता इंडिया आघाडी आज ठरविणार रणनीती, शरद पवारांसह सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना - INDIA Bloc meeting today
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.