ETV Bharat / state

आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीतून माघार, राज ठाकरेंच्या 'मनसे'ला अधिक महत्त्व

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 10:15 PM IST

Updated : Mar 21, 2024, 1:02 PM IST

Lok Sabha Elections : आम आदमी पक्षानं राज्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. राज्यात त्यांचा एकही उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी म्हटलं आहे. त्यामुळं राज्यात मनसेला अधिक महत्व मिळण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections

मुंबई Lok Sabha Elections : 2024 लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असताना दिल्लीतील आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुतीसह महाविकास आघाडी छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन आपली ताकद मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. महायुतीनं राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा न करता 'इंडिया आघाडी'ला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचा निर्णय महाविकास आघाडीसाठी किती फायद्याचा ठरणार, हे येणारा काळचं ठरवणार आहे.

भाजपाला कुठलीही रिस्क नको : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अबकी बार 400 'पार'चा नारा देणारा भाजपा संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील याकडं कटाक्षानं लक्ष देऊन आहे. महाराष्ट्रात महायुती मजबूत असतानासुद्धा भाजपानं राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच राज ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. वास्तविक राज ठाकरे यांच्या पक्षाचं महाराष्ट्रासह मुंबईतील वजन पाहता त्यांची फार काही जास्त महायुतीला मदत होईल, असं चित्र दिसत नाही. मागील निवडणुकीतील त्यांच्या मतांची टक्केवारी जेमतेम अडीच टक्के होती. परंतु सध्याच्या घडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी भाजपा कुठलीही कसर ठेवताना दिसत नाहीये. या अनुषंगानं महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसेला विरोध असतानाही राज ठाकरे यांना भाजपानं साथीला घेतलं आहे.

महाराष्ट्रात नाही पण इतर राज्यात जोरकस प्रयत्न : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला महायुतीकडून इतकं महत्त्व दिलं जातं?, आम आदमी पक्षानं निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात आम आदमी पक्ष लोकसभेची एकही जागा लढणार नाही. कारण आम आदमी पक्षानं इंडिया आघाडीला राज्यात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाची ताकद त्यामानानं राज्यात कमी नाही. परंतु सध्याच्या घडीला पक्षानं 2024 च्या विधानसभा, त्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जास्त लक्ष दिलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदी पक्षाच्या उमेदवारानं अनेक ठिकाणी 50 ते 70 हजार मतांचा टप्पा पार केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आम आदमी पक्ष उतरला नव्हता. त्याचप्रमाणं यंदाही आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हरियाणा, दिल्ली, गुजरात, पंजाब या ठिकाणी आम आदमी पक्षानं पूर्ण ताकतीनिशी उमेदवार उभे केले आहेत.

मनसेची टक्केवारी कमी, पण महत्त्वाची : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मनसेने 10 जागा लढवल्या होत्या. परंतु त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. त्यातील 9 मनसे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला 1.5 टक्के मतं मिळाली होती. 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्या मनसेनं 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 101 जागा लढवल्या होत्या. त्यातील एक जागा मनसेला जिंकता आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 10 उमेदवार दुसऱ्या, तर 25 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीमध्ये मनसेला 2.3 टक्के मते मिळाली होती. परंतु हीच मते महायुतीसाठी लाखमोलाची ठरणार आहेत.

राज ठाकरे संधी साधू राजकारणी : आम आदमी पक्षाप्रमाणे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेनंसुद्धा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. तेव्हा, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपाविरोधामध्ये "लाव रे तो व्हिडिओ" असं करत जोरदार प्रचार केला होता. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलल्यानं राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. याच कारणानं राज ठाकरे आता भाजपाच्या मदतीला धावून गेले आहेत. याबाबत बोलताना आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्या प्रीती मेनन म्हणाल्या, 'राज ठाकरे संधी साधू राजकारणी आहेत. त्या पद्धतीचं राजकारण आमचा आम आदमी पक्ष करत नाही. आम्ही महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आम्हाला मोदींविरोधात इंडिया आघाडीला मजबूत करायचं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकद लावत आमचे उमेदवार उभे करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला पक्षापेक्षा देश मोठा असून आम्ही या देशातून मोदींचं सरकार घालवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. राज ठाकरेंसारखं संधी साधू राजकारण आम्हाला करता येत नाही. महायुतीतील नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या सर्वांची ताकद राज्यात कमी झाली आहे. त्यांच्या सभांना गर्दी होणार नाही. एक परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हणून राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता भाजपानं त्यांना सोबत घेतल्याचा निर्णय घेतला आहे', अशी टीकाही प्रीती मेनन यांनी केली आहे.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पहिला अर्ज नागपुरात दाखल, 'या' उमेदवारानं ठोकला गडकरींविरोधात शड्डू?
  2. Mahua Moitra Cash For Query Case : तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या; लोकपालांनी दिले सीबीआय चौकशीचे आदेश
  3. MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत

मुंबई Lok Sabha Elections : 2024 लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असताना दिल्लीतील आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुतीसह महाविकास आघाडी छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन आपली ताकद मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. महायुतीनं राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा न करता 'इंडिया आघाडी'ला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचा निर्णय महाविकास आघाडीसाठी किती फायद्याचा ठरणार, हे येणारा काळचं ठरवणार आहे.

भाजपाला कुठलीही रिस्क नको : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अबकी बार 400 'पार'चा नारा देणारा भाजपा संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील याकडं कटाक्षानं लक्ष देऊन आहे. महाराष्ट्रात महायुती मजबूत असतानासुद्धा भाजपानं राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच राज ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. वास्तविक राज ठाकरे यांच्या पक्षाचं महाराष्ट्रासह मुंबईतील वजन पाहता त्यांची फार काही जास्त महायुतीला मदत होईल, असं चित्र दिसत नाही. मागील निवडणुकीतील त्यांच्या मतांची टक्केवारी जेमतेम अडीच टक्के होती. परंतु सध्याच्या घडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी भाजपा कुठलीही कसर ठेवताना दिसत नाहीये. या अनुषंगानं महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसेला विरोध असतानाही राज ठाकरे यांना भाजपानं साथीला घेतलं आहे.

महाराष्ट्रात नाही पण इतर राज्यात जोरकस प्रयत्न : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला महायुतीकडून इतकं महत्त्व दिलं जातं?, आम आदमी पक्षानं निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात आम आदमी पक्ष लोकसभेची एकही जागा लढणार नाही. कारण आम आदमी पक्षानं इंडिया आघाडीला राज्यात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाची ताकद त्यामानानं राज्यात कमी नाही. परंतु सध्याच्या घडीला पक्षानं 2024 च्या विधानसभा, त्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जास्त लक्ष दिलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदी पक्षाच्या उमेदवारानं अनेक ठिकाणी 50 ते 70 हजार मतांचा टप्पा पार केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आम आदमी पक्ष उतरला नव्हता. त्याचप्रमाणं यंदाही आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हरियाणा, दिल्ली, गुजरात, पंजाब या ठिकाणी आम आदमी पक्षानं पूर्ण ताकतीनिशी उमेदवार उभे केले आहेत.

मनसेची टक्केवारी कमी, पण महत्त्वाची : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मनसेने 10 जागा लढवल्या होत्या. परंतु त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. त्यातील 9 मनसे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला 1.5 टक्के मतं मिळाली होती. 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्या मनसेनं 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 101 जागा लढवल्या होत्या. त्यातील एक जागा मनसेला जिंकता आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 10 उमेदवार दुसऱ्या, तर 25 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीमध्ये मनसेला 2.3 टक्के मते मिळाली होती. परंतु हीच मते महायुतीसाठी लाखमोलाची ठरणार आहेत.

राज ठाकरे संधी साधू राजकारणी : आम आदमी पक्षाप्रमाणे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेनंसुद्धा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. तेव्हा, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपाविरोधामध्ये "लाव रे तो व्हिडिओ" असं करत जोरदार प्रचार केला होता. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलल्यानं राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. याच कारणानं राज ठाकरे आता भाजपाच्या मदतीला धावून गेले आहेत. याबाबत बोलताना आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्या प्रीती मेनन म्हणाल्या, 'राज ठाकरे संधी साधू राजकारणी आहेत. त्या पद्धतीचं राजकारण आमचा आम आदमी पक्ष करत नाही. आम्ही महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आम्हाला मोदींविरोधात इंडिया आघाडीला मजबूत करायचं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकद लावत आमचे उमेदवार उभे करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला पक्षापेक्षा देश मोठा असून आम्ही या देशातून मोदींचं सरकार घालवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. राज ठाकरेंसारखं संधी साधू राजकारण आम्हाला करता येत नाही. महायुतीतील नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या सर्वांची ताकद राज्यात कमी झाली आहे. त्यांच्या सभांना गर्दी होणार नाही. एक परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हणून राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता भाजपानं त्यांना सोबत घेतल्याचा निर्णय घेतला आहे', अशी टीकाही प्रीती मेनन यांनी केली आहे.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पहिला अर्ज नागपुरात दाखल, 'या' उमेदवारानं ठोकला गडकरींविरोधात शड्डू?
  2. Mahua Moitra Cash For Query Case : तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या; लोकपालांनी दिले सीबीआय चौकशीचे आदेश
  3. MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत
Last Updated : Mar 21, 2024, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.