ETV Bharat / sports

भारत आणि इंग्लड यांच्यात आज चुरशीची लढत; कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 7:45 AM IST

Updated : Jun 27, 2024, 7:58 AM IST

T20 World Cup 2024 : टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता रंगतदार झाली आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज संध्याकाळी होणार आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (ETV Bharat)

T20 World Cup IND vs ENG Semi Final : सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता भारत या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.

भारत-इंग्लंड किती वेळा आमने सामने : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळं टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी इंग्लंडपेक्षा चांगली राहिली आहे. भारतानं यंदाच्या टी-20 विश्वचषकात 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळं अनिर्णित राहिला आहे. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारत जिंकेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा आहे.

पावसामुळं सामना रद्द झाला तर? : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाचं सावट आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, या सामन्यात पाऊस होण्याची 70 टक्के शक्यता आहे. यासोबतच सामन्यादरम्यान जोरदार वादळी वाऱ्याचीही अपेक्षा आहे. या सामन्यादरम्यान गयानामध्ये तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. Accuweather.com च्या मते, गयानामध्ये सकाळी 10 वाजता 66%, सकाळी 11 वाजता 75% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच दुपारी 12 वाजता 49%, दुपारी 1 वाजता 34% आणि 2 वाजता 51% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामना रद्द होण्याची शक्यता आहे. पावसामुळं सामना रद्द झाला तर सुपर-8 टप्प्यात अव्वल स्थानी राहिल्यामुळं भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण उपांत्य फेरी-2 साठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

भारताच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर

  • या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फारशी कामगिरी समाधनकारक झाली नाही. त्यांनी कामगिरी चांगली केली तर भारताचा विजय सुकर होऊ शकतो. त्याचवेळी सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. तर गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल.

इंग्लंडच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर

  • इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतात. तर गोलंदाजीत आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन भारतासाठी घातक ठरू शकतात. बटलरनं 191 आणि सॉल्टनं 183 धावा केल्या आहेत. राशिदनं 9, आर्चरनं 9 आणि जॉर्डननं 7 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघांचं संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  • भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
  • इंग्लंडचा संघ : फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.

हेही वाचा

  1. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024
  2. ऑलिम्पियन कविता राऊतसह अनेक खेळाडूंचा पदकं परत करण्याचा राज्य सरकारला इशारा, बेमुदत उपोषणही करणार, कारण काय? - Sportspersons Demands
  3. बापरे बाप! इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजानं एकाच षटकात दिल्या तब्बल 43 धावा, केला लाजिरवाणा विक्रम - Ollie Robinson

T20 World Cup IND vs ENG Semi Final : सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता भारत या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.

भारत-इंग्लंड किती वेळा आमने सामने : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळं टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी इंग्लंडपेक्षा चांगली राहिली आहे. भारतानं यंदाच्या टी-20 विश्वचषकात 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळं अनिर्णित राहिला आहे. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारत जिंकेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा आहे.

पावसामुळं सामना रद्द झाला तर? : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाचं सावट आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, या सामन्यात पाऊस होण्याची 70 टक्के शक्यता आहे. यासोबतच सामन्यादरम्यान जोरदार वादळी वाऱ्याचीही अपेक्षा आहे. या सामन्यादरम्यान गयानामध्ये तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. Accuweather.com च्या मते, गयानामध्ये सकाळी 10 वाजता 66%, सकाळी 11 वाजता 75% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच दुपारी 12 वाजता 49%, दुपारी 1 वाजता 34% आणि 2 वाजता 51% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामना रद्द होण्याची शक्यता आहे. पावसामुळं सामना रद्द झाला तर सुपर-8 टप्प्यात अव्वल स्थानी राहिल्यामुळं भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण उपांत्य फेरी-2 साठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

भारताच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर

  • या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फारशी कामगिरी समाधनकारक झाली नाही. त्यांनी कामगिरी चांगली केली तर भारताचा विजय सुकर होऊ शकतो. त्याचवेळी सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. तर गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल.

इंग्लंडच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर

  • इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतात. तर गोलंदाजीत आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन भारतासाठी घातक ठरू शकतात. बटलरनं 191 आणि सॉल्टनं 183 धावा केल्या आहेत. राशिदनं 9, आर्चरनं 9 आणि जॉर्डननं 7 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संघांचं संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  • भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
  • इंग्लंडचा संघ : फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.

हेही वाचा

  1. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024
  2. ऑलिम्पियन कविता राऊतसह अनेक खेळाडूंचा पदकं परत करण्याचा राज्य सरकारला इशारा, बेमुदत उपोषणही करणार, कारण काय? - Sportspersons Demands
  3. बापरे बाप! इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजानं एकाच षटकात दिल्या तब्बल 43 धावा, केला लाजिरवाणा विक्रम - Ollie Robinson
Last Updated : Jun 27, 2024, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.