ETV Bharat / sports

IND vs BAN: दुसऱ्या दिवसावर भारताचं वर्चस्व; मात्र रोहित-कोहली पुन्हा अपयशी - Chennai Test Day 2

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 3 hours ago

IND vs BAN 1st Test Day 2 : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारताच्या नावावर होता. जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळं भारतानं बांगलादेशवर मोठी आघाडी मिळवली.

IND vs BAN 1st Test Day 2
IND vs BAN 1st Test Day 2 (IANS Photo)

चेन्नई IND vs BAN 1st Test Day 2 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (20 सप्टेंबर) खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 81 धावा केल्या होत्या. सध्या शुभमन गिल 33 आणि ऋषभ पंत 12 धावांवर नाबाद आहे. भारताची एकूण आघाडी 308 धावांची असून त्यांच्या सात विकेट शिल्लक आहेत.

भारताचं टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी : भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताला पहिला धक्का तिसऱ्याच षटकातच बसला, जेव्हा कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या चेंडूवर झाकीर हसनकरवी झेलबाद झाला. रोहितनं केवळ 5 धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद झाली. त्यानंतर भारतानं 67 धावांवर विराट कोहलीचीही विकेट गमावली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहलीनं 37 चेंडूंचा सामना करत 17 धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. यानंतर पंत आणि शुभमननं आणखी विकेट पडू दिली नाही.

बुमराहचे चार बळी : बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांच्याकडून शाकिब अल हसननं सर्वाधिक 32 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बुमराहशिवाय आकाश दीप, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

हेही वाचा :

  1. ऋषभ पंतनं लाईव्ह सामन्यात रोहित आणि सिराजची मागितली माफी, चेन्नई कसोटीदरम्यान नेमकं काय घडलं? - Rishabh Pant Apologises
  2. IND vs BAN: भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज चारीमुंड्या चीत; भारताकडे भक्कम आघाडी - Chennai TEST DAY 2

चेन्नई IND vs BAN 1st Test Day 2 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (20 सप्टेंबर) खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 81 धावा केल्या होत्या. सध्या शुभमन गिल 33 आणि ऋषभ पंत 12 धावांवर नाबाद आहे. भारताची एकूण आघाडी 308 धावांची असून त्यांच्या सात विकेट शिल्लक आहेत.

भारताचं टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी : भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताला पहिला धक्का तिसऱ्याच षटकातच बसला, जेव्हा कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या चेंडूवर झाकीर हसनकरवी झेलबाद झाला. रोहितनं केवळ 5 धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद झाली. त्यानंतर भारतानं 67 धावांवर विराट कोहलीचीही विकेट गमावली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहलीनं 37 चेंडूंचा सामना करत 17 धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. यानंतर पंत आणि शुभमननं आणखी विकेट पडू दिली नाही.

बुमराहचे चार बळी : बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांच्याकडून शाकिब अल हसननं सर्वाधिक 32 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बुमराहशिवाय आकाश दीप, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

हेही वाचा :

  1. ऋषभ पंतनं लाईव्ह सामन्यात रोहित आणि सिराजची मागितली माफी, चेन्नई कसोटीदरम्यान नेमकं काय घडलं? - Rishabh Pant Apologises
  2. IND vs BAN: भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज चारीमुंड्या चीत; भारताकडे भक्कम आघाडी - Chennai TEST DAY 2
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.