ETV Bharat / sports

विश्वविजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव; खेळाडू होणार मालामाल, बीसीसीआयनं केली मोठी घोषणा - Prize Money For Team India

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 8:04 PM IST

Updated : Jun 30, 2024, 11:03 PM IST

Prize Money For Team India : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Prize Money For Team India
बीसीसीआयनं केली मोठी घोषणा (BCCI)

मुंबई Prize Money For Team India : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं जय शाहंनी सांगितलं आहे.

काय म्हणाले जय शाह : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय संघाचं टी 20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. तसंच टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांचं बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, "संपूर्ण स्पर्धेत संघाने असामान्य प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन."

भारतीय संघानं जिंकला चौथा आयसीसी विश्वचषक : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं इतिहास रचला. या संघानं इतिहासात चौथ्यांदा विश्वचषक (एकदिवसीय, टी 20) जिंकला आहे. भारतीय संघानं शनिवारी (29 जून) टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयामुळं 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. भारतीय संघानं दोनदा (1983, 2011) एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तर त्यांनी फक्त दोनदा (2007, 2024) टी 20 विश्वचषक जिंकला आहे. संघानं शेवटचा विश्वचषक (एकदिवसीय मध्ये) 2011 मध्ये जिंकला होता. आता 13 वर्षांनंतर कोणथातरी विश्वचषक (टी 20 मध्ये) जिंकला आहे.

दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं इतिहास रचला आहे. भारतीय संघानं तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2007 मध्ये भारतीय संघानं प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघाचा विजय : बार्बाडोसमधील या विजयात भारतीय संघानं नाणेफेक नाकारून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना कोहलीनं 76 धावा केल्या. त्यानं अक्षर पटेलसोबत 72 धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या चेंडूवर 20 भारतीय संघानं 171 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 7 धावानं पराभव केला. यासह भारतीय संघानं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं.

हे वाचलंत का :

  1. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता 'सर'ही टी20 क्रिकेटमधून निवृत्त - Ravindra Jadeja Retirement
  2. 'हिटमॅन' रोहित शर्मा...! भारतीय संघाला विश्वविजेता बनवताच कर्णधार रोहितनं केले अनेक विक्रम - Rohit Sharma Records
  3. 'भारत माता की जय'च्या घोषणा देत क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष, पाहा व्हिडिओ - T20 World Cup 2024

मुंबई Prize Money For Team India : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं जय शाहंनी सांगितलं आहे.

काय म्हणाले जय शाह : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय संघाचं टी 20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. तसंच टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांचं बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, "संपूर्ण स्पर्धेत संघाने असामान्य प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन."

भारतीय संघानं जिंकला चौथा आयसीसी विश्वचषक : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं इतिहास रचला. या संघानं इतिहासात चौथ्यांदा विश्वचषक (एकदिवसीय, टी 20) जिंकला आहे. भारतीय संघानं शनिवारी (29 जून) टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयामुळं 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. भारतीय संघानं दोनदा (1983, 2011) एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तर त्यांनी फक्त दोनदा (2007, 2024) टी 20 विश्वचषक जिंकला आहे. संघानं शेवटचा विश्वचषक (एकदिवसीय मध्ये) 2011 मध्ये जिंकला होता. आता 13 वर्षांनंतर कोणथातरी विश्वचषक (टी 20 मध्ये) जिंकला आहे.

दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं इतिहास रचला आहे. भारतीय संघानं तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2007 मध्ये भारतीय संघानं प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघाचा विजय : बार्बाडोसमधील या विजयात भारतीय संघानं नाणेफेक नाकारून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना कोहलीनं 76 धावा केल्या. त्यानं अक्षर पटेलसोबत 72 धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या चेंडूवर 20 भारतीय संघानं 171 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 7 धावानं पराभव केला. यासह भारतीय संघानं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं.

हे वाचलंत का :

  1. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता 'सर'ही टी20 क्रिकेटमधून निवृत्त - Ravindra Jadeja Retirement
  2. 'हिटमॅन' रोहित शर्मा...! भारतीय संघाला विश्वविजेता बनवताच कर्णधार रोहितनं केले अनेक विक्रम - Rohit Sharma Records
  3. 'भारत माता की जय'च्या घोषणा देत क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष, पाहा व्हिडिओ - T20 World Cup 2024
Last Updated : Jun 30, 2024, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.