ETV Bharat / politics

"शिवद्रोही सरकारला 'गेट आऊट' म्हणायची वेळ आलीय"; महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल - MVA Protest Mumbai

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 1:48 PM IST

Updated : Sep 1, 2024, 4:59 PM IST

महाविकास आघाडीनं मुंबईत जोडे मारो आंदोलन करत महायुती सरकारचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महायुती सरकारवर कडाडून टीका केली.

mva jodo maro protest
महाविकास आघाडीचं आंदोलन (Source- ETV Bharat Reporter)

मुंबई MVA Protest Mumbai : महाविकास आघाडीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, शेवटच्या क्षणी आंदोलनाला परवानगी दिली. या मोर्चात महाविकास आघाडीनं मोठे शक्ती प्रदर्शन दाखवले. आंदोलनाचा समारोप गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.

महाविकास आघाडीचे नेते सहभागी : महाविकास आघाडीच्या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना सरकारवर घणाघाती टीका केली. "या सरकारला आता गेट आउट म्हणण्याची वेळ आली आहे," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले.

मोदी कुणा-कुणाची माफी मागणार? : उद्धव ठाकरे म्हणाले, " आम्ही या शिवद्रोही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. सध्या जे सुरू आहे, त्याला मी राजकारण मानायला तयार नाही. महाराजांचा पुतळा पडल्याचे आम्ही राजकारण करत असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत. पण ते राजकारण नाही, गजकर्ण करत आहेत. बाळासाहेब म्हणायचे की, राजकारण हे गजकर्ण आहे. खाजवू दे त्यांना. पण या चुकीला माफी नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनतेच्या मनात संताप आहे."

ठाकरेंचा मोदींवर निशाणा : "मोदी तुम्ही माफी कुणा कुणाची मागणार आहात? ज्यांनी पुतळा बनवला आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची माफी मागणार? संसद भवनाची मागणार? कुणा कुणाची माफी मागणार? हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. शिवरायांचा अपमान आहे. आम्ही गेट ऑफ इंडियावर जमलो आहोत. आता या घटनाबाह्य सरकारला गेट आउट इंडिया म्हणण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली. पण त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. पण महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं माफी मागितली आहे. आता बस्स झालंय. तुम्हाला निवडून देऊन महाराष्ट्राची चूक झाली," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.

शरद पवारांची टीका : "महाराजांचा पुतळा हवेच्या वेगानं पडला असं मुख्यमंत्री म्हणतात. पण हा पुतळा बनवताना यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. 'गेट वे ऑफ इंडिया'च्या बाहेर मागील 50 वर्षापासून छत्रपतींचा पुतळा खंबीरपणे उभा आहे. हा पुतळा सागरी किनाऱयाजवळ उभा आहे. मालवणमधील महाराजांचा पुतळा म्हणजे एक भ्रष्टाचाराचा नमुना आहे. तो पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला. हा संपूर्ण देशातील शिवप्रेमीचा अपमान आहे. हा अपमान या सरकारनं केला असून, त्याचा सक्त निषेध आम्ही करण्यासाठी येथे जमलो आहोत," अशी टीका शरद पवारांनी सरकारवर केली.

"सत्ताधारी म्हणाताहेत की, आम्ही राजकारण करतोय. पण महाराष्ट्राच्या जनतेनं महाराजांचा पुतळा पडला त्याच दिवशी महाराजांची माफी मागितली आहे. चुकून या सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात निवडून दिलं म्हणून त्यांनी माफी मागतली आहे. महाराजांच्या अपमान केलेल्या या माफीवीरांना निवडणुकीच्या काळामध्ये घरचा रस्ता दाखवला पाहिजे." - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

घरचा रस्ता दाखवण्याची गरज : "राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आलेलं आहे. महाराजांच्या नावानं हे राजकारण करतात. पेशवाईसारखा महाराजांचा अपमान करत आहेत. कमिशन आणि भ्रष्टाचार लाटायचं हे या सरकारचं सुरू आहे. केंद्रानं आणि राज्य सरकारनं महाराजांचा अवमान केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत," असं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा-

  1. पोलिसांनी परवानगी नाकारुनही महाविकास आघाडीचे महायुतीविरोधात जोडे मारो आंदोलन - MVA Jode Maro protest
  2. महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवरायांचा सन्मान करत नाही, देवेंद्र फडवणवीसांचा हल्लाबोल - Devendra Fadnavis On MVA Protest

मुंबई MVA Protest Mumbai : महाविकास आघाडीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, शेवटच्या क्षणी आंदोलनाला परवानगी दिली. या मोर्चात महाविकास आघाडीनं मोठे शक्ती प्रदर्शन दाखवले. आंदोलनाचा समारोप गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.

महाविकास आघाडीचे नेते सहभागी : महाविकास आघाडीच्या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना सरकारवर घणाघाती टीका केली. "या सरकारला आता गेट आउट म्हणण्याची वेळ आली आहे," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले.

मोदी कुणा-कुणाची माफी मागणार? : उद्धव ठाकरे म्हणाले, " आम्ही या शिवद्रोही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. सध्या जे सुरू आहे, त्याला मी राजकारण मानायला तयार नाही. महाराजांचा पुतळा पडल्याचे आम्ही राजकारण करत असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत. पण ते राजकारण नाही, गजकर्ण करत आहेत. बाळासाहेब म्हणायचे की, राजकारण हे गजकर्ण आहे. खाजवू दे त्यांना. पण या चुकीला माफी नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनतेच्या मनात संताप आहे."

ठाकरेंचा मोदींवर निशाणा : "मोदी तुम्ही माफी कुणा कुणाची मागणार आहात? ज्यांनी पुतळा बनवला आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची माफी मागणार? संसद भवनाची मागणार? कुणा कुणाची माफी मागणार? हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. शिवरायांचा अपमान आहे. आम्ही गेट ऑफ इंडियावर जमलो आहोत. आता या घटनाबाह्य सरकारला गेट आउट इंडिया म्हणण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली. पण त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. पण महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं माफी मागितली आहे. आता बस्स झालंय. तुम्हाला निवडून देऊन महाराष्ट्राची चूक झाली," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.

शरद पवारांची टीका : "महाराजांचा पुतळा हवेच्या वेगानं पडला असं मुख्यमंत्री म्हणतात. पण हा पुतळा बनवताना यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. 'गेट वे ऑफ इंडिया'च्या बाहेर मागील 50 वर्षापासून छत्रपतींचा पुतळा खंबीरपणे उभा आहे. हा पुतळा सागरी किनाऱयाजवळ उभा आहे. मालवणमधील महाराजांचा पुतळा म्हणजे एक भ्रष्टाचाराचा नमुना आहे. तो पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला. हा संपूर्ण देशातील शिवप्रेमीचा अपमान आहे. हा अपमान या सरकारनं केला असून, त्याचा सक्त निषेध आम्ही करण्यासाठी येथे जमलो आहोत," अशी टीका शरद पवारांनी सरकारवर केली.

"सत्ताधारी म्हणाताहेत की, आम्ही राजकारण करतोय. पण महाराष्ट्राच्या जनतेनं महाराजांचा पुतळा पडला त्याच दिवशी महाराजांची माफी मागितली आहे. चुकून या सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात निवडून दिलं म्हणून त्यांनी माफी मागतली आहे. महाराजांच्या अपमान केलेल्या या माफीवीरांना निवडणुकीच्या काळामध्ये घरचा रस्ता दाखवला पाहिजे." - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

घरचा रस्ता दाखवण्याची गरज : "राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आलेलं आहे. महाराजांच्या नावानं हे राजकारण करतात. पेशवाईसारखा महाराजांचा अपमान करत आहेत. कमिशन आणि भ्रष्टाचार लाटायचं हे या सरकारचं सुरू आहे. केंद्रानं आणि राज्य सरकारनं महाराजांचा अवमान केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत," असं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा-

  1. पोलिसांनी परवानगी नाकारुनही महाविकास आघाडीचे महायुतीविरोधात जोडे मारो आंदोलन - MVA Jode Maro protest
  2. महाविकास आघाडी कधीच छत्रपती शिवरायांचा सन्मान करत नाही, देवेंद्र फडवणवीसांचा हल्लाबोल - Devendra Fadnavis On MVA Protest
Last Updated : Sep 1, 2024, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.