ETV Bharat / politics

भाजपाविरोधात 21 जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन; नाना पटोले यांची घोषणा - Nana Patole On BJP

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 10:55 PM IST

Nana Patole On BJP : राज्यातील बेरोजगारी, महागाई, पेपरफुटीचे प्रकरण, महिला सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी, (21 जून) रोजी राज्यभरात ‘चिखल फेको’ आंदोलनाची घोषणा काँग्रेसनं केलीय. (Mud Throw Protest) चिखल फेको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

Nana Patole On BJP
नाना पटोले ‘चिखल फेको’ आंदोलन (File Photo)

पालघर Nana Patole On BJP : भारतीय जनता पक्षाच्या गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतकरी युवक आत्महत्या करत आहेत. युवतींवर हल्ले होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. महिलांची नग्नधिंड काढली जात आहे. या सर्व प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमांना चिखल फासण्याचं आंदोलन (Mud Throw Protest) हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (ETV BHARAT Reporter)


उद्धव ठाकरेंवर भाष्य करण्यास दिला नकार : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पटोले पालघर येथे आले होते. यावेळी त्यांनी कोकण पदवीधर मतदार, मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघ या चारही विधान परिषदेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्ताचे उदाहरण देऊन फुले पडती शेजारी असे विधान केलं होते. त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.



भाजपाचे मगरीचे अश्रू : गेल्या एक वर्षापासून मणिपूर जळत आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. भारत मातेला वेदना होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र या विषयावर मौन बाळगून आहेत. एक वर्षानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोन्ही समाज घटकांची बैठक घेण्याचं सुचत, अशी टीका करून पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे हे मगरीचे अश्रू असल्याचा आरोप केलाय.


लालकृष्ण अडवाणींनी केलं होतं राहुल यांचं कौतुक : माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली होती. त्यांना महानायक म्हटलं होतं. त्या राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा करून देश जोडला. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणलं, ज्या मणिपूरमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी अजून गेले नाहीत. त्या मणिपूरमधून राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ न्याय यात्रेला सुरुवात केली. ते या युगाचे जननायक आहेत, असं पटोले यांनी सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांचा ५४ वा वाढदिवस पालघरमध्ये साजरा करण्यात आला.



राज्यात सुशिक्षित तानाशाहीच्या विरोधात : राज्यातील सुशिक्षित वर्ग तानाशाहीच्या विरोधात असून तो आता भाजपाच्या विरोधात गेला असून महाराष्ट्रातील चारही विधान परिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात दहा वर्षात दहा पिढ्या बरबाद करण्यात आल्या. बेरोजगारी प्रचंड वाढली. सुशिक्षितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं, ही निवडणूक शिक्षक, पदवीधर मतदारांपुरत मर्यादित नाही, तर ती अन्यायाच्या विरोधात आहे, असं ही पटोले म्हणाले.



गुजरातच्या हितासाठी वाढवण बंदर : स्थानिक नागरिकांचा वाढवण बंदराला विरोध असतानाही केवळ गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार वाढवण बंदराचा विकास करत आहे. भाजपाच्या खासदाराचा वाढवण बंदराला लोकमान्यता असल्याचा गैरसमज झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार केल्याचं पटोले यांनी सांगितलं. बुलेट ट्रेन, वाढवण, बंदर मुंबई-वडोदरा महामार्ग अशी कितीही पायाभूत विकासाची कामे केली तरी, ती खासगीकरणातून असल्यानं पालघर जिल्ह्यातील एकालाही रोजगार मिळाला नाही, असे निदर्शनास आणले. वाढवण बंदराबाबत आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वाढवण बंदराचा विकास करणार म्हणजे काय करणार, किती लोकांना रोजगार देणार अशी विचारणा त्यावेळी मी केली होती. परंतु सरकारनं त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नव्हतं. लोकांचा विरोध असताना निसर्ग आणि मच्छीमारांचे नुकसान करून वाढवण बदंर निर्मितीसाठी सरकार हिटलरशाहीनं वागत असेल, तर या सरकारला विधान परिषदेच्या निवडणुकीतच धडा शिकवावा लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला.


महायुतीची वाजवली पिपाणी : शिवसेनेचे धनुष्यबाण घेतले, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेतले, परंतु आमच्याकडे मशाल आणि तुतारी आली आणि त्यांच्या मदतीने आम्ही महायुतीची पिपाणी वाजवली, अशी टीका पटोले यांनी केली. महाराष्ट्रात पुढचे सरकार महाविकास आघाडीचे येणार असून पूर्ण बहुमताने हे सरकार असेल, असा दावा त्यांनी केलाय. कोकणातील मुले, युवक हुशार आहेत. त्यांच्याकडं बुद्धिमत्ता आहे. त्यांना दिशा दिली पाहिजे, असे ते म्हणाले.



युवकांची लढण्याची भूमिका संपवली : गेल्या दहा वर्षात खोटे बोलून भाजपा सत्तेत आला. जनतेची लूट केली. संघटनेत त्यांनी काय बदल करावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु देशात मात्र त्यांनी अदानी यांना मोठं करण्याचं काम केलंय. खासगीकरणामुळं बेरोजगारी वाढली आहे. अग्नीवीर योजना आणून युवकांची देशासाठी लढण्याची भूमिका संपवली असल्याची टीका त्यांनी केली. मोदी यांच्या दहा वर्षाच्या काळात त्यांनी आदिवासी संस्कृती संपवली. शेतकरी वर्ग संपवला.



उपाध्ये तोंडाला येईल ते बडबडतात : भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लोकसभेच्या यशातून पटोले बाहेर आले नाहीत, अशी टीका केली होती. त्यावर पटोले म्हणाले, की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे वातानुकूलित खोल्यात राहत नाही. मी मातीतला आहे. यशाचा अभिमान आणि गर्व बाळगण्याची आमची संस्कृती नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. भाजपा मात्र अजूनही पराभवातून सावरलेला नाही. त्यामुळं ते तोंडाला येईल ते बडबडत असतात.



दलालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई : गुजरातच्या भल्यासाठी बुलेट ट्रेनचं काम करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बरबाद केलं जात आहे. दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र भरपाई दिली जात आहे. राज्य सरकारनं गुजरातच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेनचा उद्योग सुरू करून, पालघर मधल्या शेतकऱ्यांच्या शेतीवर नांगर फिरवला आहे. येथील शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळण्यासाठी आम्ही आग्रह धरू असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या उद्योगात होणारे स्फोट आणि तेथील दुर्घटना त्याचा उल्लेख करून पटोले यांनी या उद्योगांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी केली. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले असेल. तर त्याची अंमलबजावणी होते का, अंमलबजावणी न करणाऱ्यांवर काय कारवाई केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


पालघरची निर्मिती काँग्रेसच्या काळात : पालघर जिल्ह्याची निर्मिती पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झाली. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून आदिवासीबहुल पालघर जिल्हा निर्माण केला. परंतु या पालघर जिल्ह्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करण्याचं पाप राज्य सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.



मोदींनी राजीनामा द्यावा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या योजनेनुसार महिलांना एक लाख रुपये व दरमहा साडेआठ हजार रुपये मिळाले नसल्याचं सांगितलं होतं. याकडं लक्ष वेधता पटोले म्हणाले, की अजूनही वेळ गेलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी घोषित केलेल्या योजनेनुसार महिलांच्या खात्यावर एक लाख रुपये व दरमहा साडेआठ हजार रुपये भरण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी चपराक त्यांनी लगावली.

हेही वाचा -

  1. 'माझे पाय दिवसाढवळ्या कार्यकर्त्यानं धुतले, पण राज्य सरकारमध्ये...'; त्या प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले? - Nana Patole
  2. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ? - Tensions in MVA Over MLC polls
  3. राष्ट्रपती राजवटीची काँग्रेसकडून राज्यपालांकडे मागणी, राज्यातील 'या' मुद्द्यांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित - NANA PATOLE News

पालघर Nana Patole On BJP : भारतीय जनता पक्षाच्या गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतकरी युवक आत्महत्या करत आहेत. युवतींवर हल्ले होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. महिलांची नग्नधिंड काढली जात आहे. या सर्व प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमांना चिखल फासण्याचं आंदोलन (Mud Throw Protest) हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (ETV BHARAT Reporter)


उद्धव ठाकरेंवर भाष्य करण्यास दिला नकार : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पटोले पालघर येथे आले होते. यावेळी त्यांनी कोकण पदवीधर मतदार, मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघ या चारही विधान परिषदेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्ताचे उदाहरण देऊन फुले पडती शेजारी असे विधान केलं होते. त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.



भाजपाचे मगरीचे अश्रू : गेल्या एक वर्षापासून मणिपूर जळत आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. भारत मातेला वेदना होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र या विषयावर मौन बाळगून आहेत. एक वर्षानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोन्ही समाज घटकांची बैठक घेण्याचं सुचत, अशी टीका करून पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे हे मगरीचे अश्रू असल्याचा आरोप केलाय.


लालकृष्ण अडवाणींनी केलं होतं राहुल यांचं कौतुक : माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली होती. त्यांना महानायक म्हटलं होतं. त्या राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा करून देश जोडला. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणलं, ज्या मणिपूरमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी अजून गेले नाहीत. त्या मणिपूरमधून राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ न्याय यात्रेला सुरुवात केली. ते या युगाचे जननायक आहेत, असं पटोले यांनी सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांचा ५४ वा वाढदिवस पालघरमध्ये साजरा करण्यात आला.



राज्यात सुशिक्षित तानाशाहीच्या विरोधात : राज्यातील सुशिक्षित वर्ग तानाशाहीच्या विरोधात असून तो आता भाजपाच्या विरोधात गेला असून महाराष्ट्रातील चारही विधान परिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात दहा वर्षात दहा पिढ्या बरबाद करण्यात आल्या. बेरोजगारी प्रचंड वाढली. सुशिक्षितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं, ही निवडणूक शिक्षक, पदवीधर मतदारांपुरत मर्यादित नाही, तर ती अन्यायाच्या विरोधात आहे, असं ही पटोले म्हणाले.



गुजरातच्या हितासाठी वाढवण बंदर : स्थानिक नागरिकांचा वाढवण बंदराला विरोध असतानाही केवळ गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार वाढवण बंदराचा विकास करत आहे. भाजपाच्या खासदाराचा वाढवण बंदराला लोकमान्यता असल्याचा गैरसमज झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार केल्याचं पटोले यांनी सांगितलं. बुलेट ट्रेन, वाढवण, बंदर मुंबई-वडोदरा महामार्ग अशी कितीही पायाभूत विकासाची कामे केली तरी, ती खासगीकरणातून असल्यानं पालघर जिल्ह्यातील एकालाही रोजगार मिळाला नाही, असे निदर्शनास आणले. वाढवण बंदराबाबत आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वाढवण बंदराचा विकास करणार म्हणजे काय करणार, किती लोकांना रोजगार देणार अशी विचारणा त्यावेळी मी केली होती. परंतु सरकारनं त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नव्हतं. लोकांचा विरोध असताना निसर्ग आणि मच्छीमारांचे नुकसान करून वाढवण बदंर निर्मितीसाठी सरकार हिटलरशाहीनं वागत असेल, तर या सरकारला विधान परिषदेच्या निवडणुकीतच धडा शिकवावा लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला.


महायुतीची वाजवली पिपाणी : शिवसेनेचे धनुष्यबाण घेतले, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेतले, परंतु आमच्याकडे मशाल आणि तुतारी आली आणि त्यांच्या मदतीने आम्ही महायुतीची पिपाणी वाजवली, अशी टीका पटोले यांनी केली. महाराष्ट्रात पुढचे सरकार महाविकास आघाडीचे येणार असून पूर्ण बहुमताने हे सरकार असेल, असा दावा त्यांनी केलाय. कोकणातील मुले, युवक हुशार आहेत. त्यांच्याकडं बुद्धिमत्ता आहे. त्यांना दिशा दिली पाहिजे, असे ते म्हणाले.



युवकांची लढण्याची भूमिका संपवली : गेल्या दहा वर्षात खोटे बोलून भाजपा सत्तेत आला. जनतेची लूट केली. संघटनेत त्यांनी काय बदल करावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु देशात मात्र त्यांनी अदानी यांना मोठं करण्याचं काम केलंय. खासगीकरणामुळं बेरोजगारी वाढली आहे. अग्नीवीर योजना आणून युवकांची देशासाठी लढण्याची भूमिका संपवली असल्याची टीका त्यांनी केली. मोदी यांच्या दहा वर्षाच्या काळात त्यांनी आदिवासी संस्कृती संपवली. शेतकरी वर्ग संपवला.



उपाध्ये तोंडाला येईल ते बडबडतात : भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लोकसभेच्या यशातून पटोले बाहेर आले नाहीत, अशी टीका केली होती. त्यावर पटोले म्हणाले, की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे वातानुकूलित खोल्यात राहत नाही. मी मातीतला आहे. यशाचा अभिमान आणि गर्व बाळगण्याची आमची संस्कृती नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. भाजपा मात्र अजूनही पराभवातून सावरलेला नाही. त्यामुळं ते तोंडाला येईल ते बडबडत असतात.



दलालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई : गुजरातच्या भल्यासाठी बुलेट ट्रेनचं काम करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बरबाद केलं जात आहे. दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र भरपाई दिली जात आहे. राज्य सरकारनं गुजरातच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेनचा उद्योग सुरू करून, पालघर मधल्या शेतकऱ्यांच्या शेतीवर नांगर फिरवला आहे. येथील शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळण्यासाठी आम्ही आग्रह धरू असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या उद्योगात होणारे स्फोट आणि तेथील दुर्घटना त्याचा उल्लेख करून पटोले यांनी या उद्योगांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी केली. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले असेल. तर त्याची अंमलबजावणी होते का, अंमलबजावणी न करणाऱ्यांवर काय कारवाई केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


पालघरची निर्मिती काँग्रेसच्या काळात : पालघर जिल्ह्याची निर्मिती पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झाली. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून आदिवासीबहुल पालघर जिल्हा निर्माण केला. परंतु या पालघर जिल्ह्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करण्याचं पाप राज्य सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.



मोदींनी राजीनामा द्यावा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या योजनेनुसार महिलांना एक लाख रुपये व दरमहा साडेआठ हजार रुपये मिळाले नसल्याचं सांगितलं होतं. याकडं लक्ष वेधता पटोले म्हणाले, की अजूनही वेळ गेलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी घोषित केलेल्या योजनेनुसार महिलांच्या खात्यावर एक लाख रुपये व दरमहा साडेआठ हजार रुपये भरण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी चपराक त्यांनी लगावली.

हेही वाचा -

  1. 'माझे पाय दिवसाढवळ्या कार्यकर्त्यानं धुतले, पण राज्य सरकारमध्ये...'; त्या प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले? - Nana Patole
  2. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ? - Tensions in MVA Over MLC polls
  3. राष्ट्रपती राजवटीची काँग्रेसकडून राज्यपालांकडे मागणी, राज्यातील 'या' मुद्द्यांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित - NANA PATOLE News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.